शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

'करेक्ट कार्यक्रम' नेमका कोण कोणाचा करतंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : नगरसेवक, उमेदवार पळवापळवीचे राजकारण सांगलीकरांना नवे नाही. महापालिका क्षेत्रात राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांना याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : नगरसेवक, उमेदवार पळवापळवीचे राजकारण सांगलीकरांना नवे नाही. महापालिका क्षेत्रात राजकारण करणाऱ्या सर्वच पक्षांना याचा अनुभवसुद्धा आहे. त्यामुळे प्रत्येक राजकीय घटनेनंतर होणारे आरोप-प्रत्यारोप म्हणजे राजकीय औपचारिकता व जनतेच्या डोळ्यात धूळफेक करण्याचा प्रकार बनला आहे. दूषित राजकारण स्वच्छ करण्याऐवजी त्याच प्रवाहात न्हाऊन घेण्याचा आनंद सर्वजण लुटत आहेत. त्यामुळे 'करेक्ट कार्यक्रम' नेमका कोण कोणाचा करीत आहे, असा प्रश्न सर्वांना सतावत आहे.

महापौर, उपमहापौर निवडीत राष्ट्रवादी व काँग्रेसने 'करेक्ट कार्यक्रम' करीत भाजपला शह दिला. त्यानंतर राज्याच्या राजकीय पटलावर या खेळ्या चर्चेत आल्या. आरोप-प्रत्यारोपाचे रान पेटले. राष्ट्रवादी आणि भाजप यामुळे आमने-सामने आले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीवर गुंडगिरी, पैसा व सत्तेचा गैरवापर केल्याची टीका केली, तर राष्ट्रवादीने आमच्याच गेलेल्या लाेकांना आम्ही परत पक्षाकडे आणल्याचा दावा केला.

महापालिकेच्या २०१८ मधील निवडणुकीनंतर नेमकी परिस्थिती उलटी होती. त्यावेळी चंद्रकांत पाटील यांनी पराभवानंतर विरोधकांकडून ईव्हीएम मशीनचे कारण व पैशाचा वापर झाल्याची टीका केली जाईल, असे मत मांडले होते, तर जयंत पाटील यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीतून भाजपने आयात केलेल्या नगरसेवकांबद्दल टीकास्त्र सोडले होते.

कोणतीही राजकीय घटना घडली तर सत्ताधारी व विरोधक अशा दोन घटकांमधील आरोप ठरलेलेच असतात. फरक फक्त पराभूत कोण व विजयी काेण, इतकाच असतो. राजकारणात कोणीही धुतल्या तांदळासारखे नाही. प्रत्येक राजकीय पक्षाने वाहत्या गंगेत हात धुण्याची परंपरा जपली आहे. भाजपसुद्धा याला अपवाद ठरला नाही. भाजपने गेल्या काही वर्षांत सांगलीतील राजकीय परंपरेच्या प्रवाहात मनसोक्त पोहण्याचा आनंद लुटला. नगरसेवक आयात करणे, निष्ठावंतांना डावलणे, ज्याचे आर्थिक बळ असेल त्यालाच किंमत व पदांची खैरात वाटणे या गोष्टी त्यांनीही स्वीकारल्या. राष्ट्रवादी, काँग्रेस व अन्य पक्षांमध्ये हा शिष्टाचार बनला आहे.

दोन्हीकडून जुळणीचे आदेश

महापौर, उपमहापौर निवडीत सत्ताधारी व विरोधी अशा दोन्ही बाजूंनी जुळणी करणाऱ्याला उमेदवारी देण्याची सूचना दिली गेली होती. आता ही 'जुळणी' म्हणजे नेमके काय, हे जनतेला कळाले. पक्षातील अनेक सामान्य नगरसेवकांनी महापौर, उपमहापौरपदाचे बाळगलेले स्वप्न केवळ 'जुळणी'च्या अटीने भंगले. ज्याकडे असेल आर्थिक बळ, त्यालाच यापुढे मिळेल पक्षाचे बळ, असे सरळ राजकारण आता जाहीर झाले आहे. राजकारण सुधारण्यापेक्षा बिघडविण्याचा विडाच सर्व पक्षांनी उचलल्याचे यातून दिसून येते.