शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीला बदनाम कोण करतंय..?

By admin | Updated: February 29, 2016 00:51 IST

इस्लामपूर पालिका : जयंत पाटील यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये झाली खडाजंगी

अशोक पाटील-- इस्लामपूर --गेल्या २५ वर्षांपासून इस्लामपूर पालिकेवर आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांची सत्ता आहे. या सत्ताधाऱ्यांतच नेहमीच अंतर्गत कुरघोड्या सुरूअसतात. त्यामुळे आता पालिकेच्या कामकाजात स्वत: जयंत पाटील यांनी लक्ष घातले आहे. त्यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष संजय कोरे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यामध्ये राष्ट्रवादीला बदनाम कोण करतंय? या विषयावरून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ महिन्यांपासून पालिकेच्या पक्षबैठकीला स्वत: आमदार जयंत पाटील उपस्थित राहत आहेत. पालिकेच्या अर्थसंकल्पाची माहिती घेण्यासाठी जयंत पाटील यांनी दोन बैठका घेतल्या. पहिली बैठक २५ मार्च रोजी ज्ञानप्रबोधिनी येथे झाली. या बैठकीस सर्वच नगरसेवकांना आमंत्रित केले होते. परंतु ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे या बैठकीस उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही चर्चा न होता तयार केलेल्या अर्थसंकल्पाच्या प्रती उपस्थित नगरसेवकांना देण्यात आल्या. यावेळी जयंत पाटील यांनी चर्चा करण्यासाठी २६ रोजी कारखाना कार्यस्थळावर ठराविक नगरसेवकांना आमंत्रित करून दुसऱ्या बैठकीचे नियोजन केले. या बैठकीस पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांच्यासह पालिकेतील संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या समारोपावेळी शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांचा प्रवेश झाला. त्यावेळी जयंत पाटील यांच्यासमोर पालिकेच्या राजकारणात एकदिलाने कार्यरतपणाचा दिखावूपणा करणारे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि उपनगराध्यक्ष संजय कोरे यांच्यामध्ये उपनगरांतील विकास कामांबाबत शाब्दिक चकमक झाली. यामुळे शहाजी पाटील यांनी अचानक संजय कोरे यांना टार्गेट करत, आपण राष्ट्रवादीला बदनाम करताय, असा आरोप केला. यावर संजय कोरे यांनी, आपण शहराध्यक्ष झाल्यापासून राष्ट्रवादी बदनाम होत असल्याचा प्रतिआरोप केला. यामुळे दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावर जयंत पाटील यांनी मौन पाळत बैठकीतून निघून जाणे पसंत केले.याबाबत कोरे आणि पाटील यांना विचारले असता, त्यांनी याला दबकत दबकत दुजोरा दिला.पालिकेत तीन वेगवेगळे गट कार्यरतपालिकेत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांचे वेगवेगळे गट कार्यरत आहेत. अलीकडील काळात तीन भाऊ एकमेकांच्या सल्ल्याने राजकारण करत आहेत, तर एन. ए. गु्रपचे नाना जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे भूमिका बजावत आहेत. या तिघांनीही आपल्या भूतकाळात डोकावून पाहावे, म्हणजे विकास नेमका कोणाचा झाला हे समजेल, अशी चर्चा सर्वसामान्यांतून आहे.गेल्या २५ वर्षांतील पालिकेचे राजकारण पाहता, सभागृहात जवळ-जवळ तेच चेहरे आहेत. जे राजकारणातून बाहेर पडले, त्यांची अवस्था दयनीय आहे. यामध्ये काही कर्जबाजारी झाले, तर काही राजकारणातून हद्दपार झाले आहेत. पालिकेतील प्रशासनाचा अनुभव व अभ्यास असणारे ४ ते ५ नगरसेवक वजा करता, बाकी सर्व नगरसेवक केवळ हात वर करणारे आहेत.