शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

राष्ट्रवादीला बदनाम कोण करतंय..?

By admin | Updated: February 29, 2016 00:51 IST

इस्लामपूर पालिका : जयंत पाटील यांच्यासमोरच पदाधिकाऱ्यांमध्ये झाली खडाजंगी

अशोक पाटील-- इस्लामपूर --गेल्या २५ वर्षांपासून इस्लामपूर पालिकेवर आमदार जयंत पाटील यांच्या समर्थकांची सत्ता आहे. या सत्ताधाऱ्यांतच नेहमीच अंतर्गत कुरघोड्या सुरूअसतात. त्यामुळे आता पालिकेच्या कामकाजात स्वत: जयंत पाटील यांनी लक्ष घातले आहे. त्यांच्या उपस्थितीत कारखाना कार्यस्थळावर झालेल्या बैठकीत उपनगराध्यक्ष संजय कोरे आणि राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली. यामध्ये राष्ट्रवादीला बदनाम कोण करतंय? या विषयावरून दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.आगामी पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या २ महिन्यांपासून पालिकेच्या पक्षबैठकीला स्वत: आमदार जयंत पाटील उपस्थित राहत आहेत. पालिकेच्या अर्थसंकल्पाची माहिती घेण्यासाठी जयंत पाटील यांनी दोन बैठका घेतल्या. पहिली बैठक २५ मार्च रोजी ज्ञानप्रबोधिनी येथे झाली. या बैठकीस सर्वच नगरसेवकांना आमंत्रित केले होते. परंतु ज्येष्ठ नगरसेवक बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे या बैठकीस उपस्थित नव्हते. त्यामुळे कोणतीही चर्चा न होता तयार केलेल्या अर्थसंकल्पाच्या प्रती उपस्थित नगरसेवकांना देण्यात आल्या. यावेळी जयंत पाटील यांनी चर्चा करण्यासाठी २६ रोजी कारखाना कार्यस्थळावर ठराविक नगरसेवकांना आमंत्रित करून दुसऱ्या बैठकीचे नियोजन केले. या बैठकीस पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष संजय कोरे, बी. ए. पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांच्यासह पालिकेतील संबंधित अधिकारी उपस्थित होते. बैठकीच्या समारोपावेळी शहराध्यक्ष शहाजीबापू पाटील यांचा प्रवेश झाला. त्यावेळी जयंत पाटील यांच्यासमोर पालिकेच्या राजकारणात एकदिलाने कार्यरतपणाचा दिखावूपणा करणारे पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील आणि उपनगराध्यक्ष संजय कोरे यांच्यामध्ये उपनगरांतील विकास कामांबाबत शाब्दिक चकमक झाली. यामुळे शहाजी पाटील यांनी अचानक संजय कोरे यांना टार्गेट करत, आपण राष्ट्रवादीला बदनाम करताय, असा आरोप केला. यावर संजय कोरे यांनी, आपण शहराध्यक्ष झाल्यापासून राष्ट्रवादी बदनाम होत असल्याचा प्रतिआरोप केला. यामुळे दोघांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. यावर जयंत पाटील यांनी मौन पाळत बैठकीतून निघून जाणे पसंत केले.याबाबत कोरे आणि पाटील यांना विचारले असता, त्यांनी याला दबकत दबकत दुजोरा दिला.पालिकेत तीन वेगवेगळे गट कार्यरतपालिकेत पक्षप्रतोद विजयभाऊ पाटील, अ‍ॅड. चिमण डांगे, खंडेराव जाधव यांचे वेगवेगळे गट कार्यरत आहेत. अलीकडील काळात तीन भाऊ एकमेकांच्या सल्ल्याने राजकारण करत आहेत, तर एन. ए. गु्रपचे नाना जशी परिस्थिती असेल त्याप्रमाणे भूमिका बजावत आहेत. या तिघांनीही आपल्या भूतकाळात डोकावून पाहावे, म्हणजे विकास नेमका कोणाचा झाला हे समजेल, अशी चर्चा सर्वसामान्यांतून आहे.गेल्या २५ वर्षांतील पालिकेचे राजकारण पाहता, सभागृहात जवळ-जवळ तेच चेहरे आहेत. जे राजकारणातून बाहेर पडले, त्यांची अवस्था दयनीय आहे. यामध्ये काही कर्जबाजारी झाले, तर काही राजकारणातून हद्दपार झाले आहेत. पालिकेतील प्रशासनाचा अनुभव व अभ्यास असणारे ४ ते ५ नगरसेवक वजा करता, बाकी सर्व नगरसेवक केवळ हात वर करणारे आहेत.