शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय दलित तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
7
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
10
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
11
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
12
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
13
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
14
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
15
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
16
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
17
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
18
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
19
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
20
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडणाऱ्यांना चाबकाने फोडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:24 IST

देशात शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून शासनाने काही काळ कृषिपंपांना मोफत ...

देशात शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून शासनाने काही काळ कृषिपंपांना मोफत वीज दिली. २००५ नंतर सवलतीच्या दरात शेती पंपांना वीज पुरवठा सुरू केला. शासन महावितरण कंपनीला अनुदानापोटी कोट्यवधी रुपये देत आहे; मात्र महावितरणने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज तोडण्यात सुरुवात केल्यामुळे २०१० मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने तीन ते पाचपेक्षा जास्त अश्वशक्तीसाठी दर ठरवून दिले. पाच अश्वशक्तीपेक्षा जास्त पंपासाठी कंपनीने १२ महिने २४ तास विद्युत पुरवठ्यासाठी नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या रुपये २८२० प्रति अश्वशक्ती प्रतिवर्ष या रकमेपैकी शेतकऱ्यांनी फक्त ९०० रुपये प्रति अश्वशक्ती प्रतिवर्ष द्यावयाचे आहेत. बाकी १९२० रुपये शासन महावितरणला अनुदान देते. मात्र महावितरण २४ तासांऐवजी फक्त ८ तास वीज पुरवठा करीत असल्याने शेतकऱ्यांचे विजेअभावी नुकसान होत आहे. मात्र महावितरण शासनाकडून १६ तासांचे अनुदान घेत आहे. शेतकऱ्यांची खोटी थकबाकी दाखवून वीज कनेक्शन तोडणे, केबल तोडणे, ट्रान्सफाॅर्मर बंद करणे याचा शेतकरी संघटनेतर्फे निषेध करण्यात येत आहे. जबरदस्तीने वीज पुरवठा तोडल्यास त्या आधिकाऱ्यांना चाबकाने फोडून त्यांची शेतकरी संघटना धिंड काढेल, असा इशारा अशोकराव माने यांनी दिला आहे.

चाैकट

वीज कायद्यातील तरतुदीनुसार वीजबिल थकबाकीदारांना वसुलीसाठी १५ दिवस अगोदर नोटीस देऊन, त्याचे लेखी म्हणणे घेतल्याशिवाय व शेतात उभे पीक असेल, तर त्या पिकाचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. महावितरणने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असेही माने यांनी म्हटले आहे.