शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडणाऱ्यांना चाबकाने फोडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:24 IST

देशात शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून शासनाने काही काळ कृषिपंपांना मोफत ...

देशात शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून शासनाने काही काळ कृषिपंपांना मोफत वीज दिली. २००५ नंतर सवलतीच्या दरात शेती पंपांना वीज पुरवठा सुरू केला. शासन महावितरण कंपनीला अनुदानापोटी कोट्यवधी रुपये देत आहे; मात्र महावितरणने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज तोडण्यात सुरुवात केल्यामुळे २०१० मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने तीन ते पाचपेक्षा जास्त अश्वशक्तीसाठी दर ठरवून दिले. पाच अश्वशक्तीपेक्षा जास्त पंपासाठी कंपनीने १२ महिने २४ तास विद्युत पुरवठ्यासाठी नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या रुपये २८२० प्रति अश्वशक्ती प्रतिवर्ष या रकमेपैकी शेतकऱ्यांनी फक्त ९०० रुपये प्रति अश्वशक्ती प्रतिवर्ष द्यावयाचे आहेत. बाकी १९२० रुपये शासन महावितरणला अनुदान देते. मात्र महावितरण २४ तासांऐवजी फक्त ८ तास वीज पुरवठा करीत असल्याने शेतकऱ्यांचे विजेअभावी नुकसान होत आहे. मात्र महावितरण शासनाकडून १६ तासांचे अनुदान घेत आहे. शेतकऱ्यांची खोटी थकबाकी दाखवून वीज कनेक्शन तोडणे, केबल तोडणे, ट्रान्सफाॅर्मर बंद करणे याचा शेतकरी संघटनेतर्फे निषेध करण्यात येत आहे. जबरदस्तीने वीज पुरवठा तोडल्यास त्या आधिकाऱ्यांना चाबकाने फोडून त्यांची शेतकरी संघटना धिंड काढेल, असा इशारा अशोकराव माने यांनी दिला आहे.

चाैकट

वीज कायद्यातील तरतुदीनुसार वीजबिल थकबाकीदारांना वसुलीसाठी १५ दिवस अगोदर नोटीस देऊन, त्याचे लेखी म्हणणे घेतल्याशिवाय व शेतात उभे पीक असेल, तर त्या पिकाचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. महावितरणने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असेही माने यांनी म्हटले आहे.