शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडणाऱ्यांना चाबकाने फोडू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:24 IST

देशात शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून शासनाने काही काळ कृषिपंपांना मोफत ...

देशात शेतीमालाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्याने उत्पादन वाढीसाठी प्रोत्साहन म्हणून शासनाने काही काळ कृषिपंपांना मोफत वीज दिली. २००५ नंतर सवलतीच्या दरात शेती पंपांना वीज पुरवठा सुरू केला. शासन महावितरण कंपनीला अनुदानापोटी कोट्यवधी रुपये देत आहे; मात्र महावितरणने शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज तोडण्यात सुरुवात केल्यामुळे २०१० मध्ये उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली. उच्च न्यायालयाने तीन ते पाचपेक्षा जास्त अश्वशक्तीसाठी दर ठरवून दिले. पाच अश्वशक्तीपेक्षा जास्त पंपासाठी कंपनीने १२ महिने २४ तास विद्युत पुरवठ्यासाठी नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या रुपये २८२० प्रति अश्वशक्ती प्रतिवर्ष या रकमेपैकी शेतकऱ्यांनी फक्त ९०० रुपये प्रति अश्वशक्ती प्रतिवर्ष द्यावयाचे आहेत. बाकी १९२० रुपये शासन महावितरणला अनुदान देते. मात्र महावितरण २४ तासांऐवजी फक्त ८ तास वीज पुरवठा करीत असल्याने शेतकऱ्यांचे विजेअभावी नुकसान होत आहे. मात्र महावितरण शासनाकडून १६ तासांचे अनुदान घेत आहे. शेतकऱ्यांची खोटी थकबाकी दाखवून वीज कनेक्शन तोडणे, केबल तोडणे, ट्रान्सफाॅर्मर बंद करणे याचा शेतकरी संघटनेतर्फे निषेध करण्यात येत आहे. जबरदस्तीने वीज पुरवठा तोडल्यास त्या आधिकाऱ्यांना चाबकाने फोडून त्यांची शेतकरी संघटना धिंड काढेल, असा इशारा अशोकराव माने यांनी दिला आहे.

चाैकट

वीज कायद्यातील तरतुदीनुसार वीजबिल थकबाकीदारांना वसुलीसाठी १५ दिवस अगोदर नोटीस देऊन, त्याचे लेखी म्हणणे घेतल्याशिवाय व शेतात उभे पीक असेल, तर त्या पिकाचा वीजपुरवठा खंडित करू नये, असे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आहेत. महावितरणने न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे, असेही माने यांनी म्हटले आहे.