शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

आभाळच फाटलया, ठिगाळ कुठं लावायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:26 IST

शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पुराच्या पाण्यात बुडालेला संसार... घराच्या दारात पडलेला चिखल... भांडीकुंड्यासह अस्ताव्यस्त साहित्य पाहून ...

शीतल पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पुराच्या पाण्यात बुडालेला संसार... घराच्या दारात पडलेला चिखल... भांडीकुंड्यासह अस्ताव्यस्त साहित्य पाहून पूरग्रस्त नागरिक, महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. आभाळच फाटलंय, कुठं-कुठं ठिगाळ लावायचं, अशी व्यथा सांगलीतील मगरमच्छ काॅलनी, सूर्यवंशी प्लाॅट, दत्त नगर, काका नगर परिसरातील पूरग्रस्तांनी व्यक्त केली. या भागातील पूरग्रस्त आता घरी परतले असून, स्वच्छतेसाठी अगदी लहान मुलांपासून संपूर्ण कुटुंबच कामाला लागले आहे.

गेले चार दिवस निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या शहरातील सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनी, दत्त नगर, काका नगर परिसरातील पूरग्रस्तांनी घराची वाट धरली आहे. या परिसरातील पुराचे पाणी कमी झाले आहे. पूरग्रस्तांना घराची दुर्दशा पाहून, काय करावे, हेच कळत नव्हते. सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनी, दत्त नगर, काका नगर परिसराला पुराचा नेहमीच फटका बसतो. मोलमजुरी करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कच्च्या-पक्क्या घरांची वस्ती असलेल्या या भागातील नागरिक २०१९च्या महापुराच्या कटू आठवणी विसरून आता कुठे सावरले होते. त्यात पुन्हा महापुराने या परिसरात होत्याचे नव्हते केले आहे.

पुरात पत्र्याचीच घरे नव्हे, तर पक्की घरेही पूर्णत: बुडाली होती. आता पूर ओसरल्यानंतर या परिसरातील विदारक चित्र समोर येत आहे. रस्त्यावर, घरात मोठ्या प्रमाणात चिखल आहे. पुराच्या पाण्यातच घराची स्वच्छता सुरू आहे. महापालिकेचा पाणी पुरवठा सुरू झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. परंतु, घरातील मोडलेला संसार पाहून महिलांना अश्रू अनावर होत नव्हते. प्रशासनाने ५२ फुटापर्यंत पाणी पातळीची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार अनेकांनी साहित्य हलवले. पण सारेच साहित्य घराबाहेर नेणे शक्य नव्हते. त्यात ५५ फुट पाणी आल्याने सुरक्षित ठिकाणी ठेवलेले साहित्यही पुरात बुडाले. भांड्याकुंड्यांवर चिखलाचा थर होता. घरातील लाकडी कपाटांचेही नुकसान झाले आहे. अजूनही अनेक पूरग्रस्त नागरिक निवारा केंद्रातच आहेत. घराची स्वच्छता करून ते पुन्हा निवारा केंद्रात परतत आहेत.

चौकट

स्वच्छतेचे आव्हान

शेरीनाला, नदीकाठच्या सखल भागात पाण्याने मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला आहे. मगरमच्छ काॅलनीत फूटभर चिखल आहे. तो हटविण्याचे काम करावे लागेल. दोन दिवसांपासून रस्त्यावर खराब झालेले साहित्य पडले आहे. ते उचलण्यासाठी कोणीच तिकडे फिरकलेले नाही. त्यामुळे तातडीने रस्त्यावर पडलेले साहित्य उचलावे, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली. काही गल्ल्यांत महापालिकेने औषध फवारणी केली होती.