शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

आभाळच फाटलया, ठिगाळ कुठं लावायचं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:26 IST

शीतल पाटील लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पुराच्या पाण्यात बुडालेला संसार... घराच्या दारात पडलेला चिखल... भांडीकुंड्यासह अस्ताव्यस्त साहित्य पाहून ...

शीतल पाटील

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : पुराच्या पाण्यात बुडालेला संसार... घराच्या दारात पडलेला चिखल... भांडीकुंड्यासह अस्ताव्यस्त साहित्य पाहून पूरग्रस्त नागरिक, महिलांच्या डोळ्यात अश्रू दाटले होते. आभाळच फाटलंय, कुठं-कुठं ठिगाळ लावायचं, अशी व्यथा सांगलीतील मगरमच्छ काॅलनी, सूर्यवंशी प्लाॅट, दत्त नगर, काका नगर परिसरातील पूरग्रस्तांनी व्यक्त केली. या भागातील पूरग्रस्त आता घरी परतले असून, स्वच्छतेसाठी अगदी लहान मुलांपासून संपूर्ण कुटुंबच कामाला लागले आहे.

गेले चार दिवस निवारा केंद्रात आश्रय घेतलेल्या शहरातील सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनी, दत्त नगर, काका नगर परिसरातील पूरग्रस्तांनी घराची वाट धरली आहे. या परिसरातील पुराचे पाणी कमी झाले आहे. पूरग्रस्तांना घराची दुर्दशा पाहून, काय करावे, हेच कळत नव्हते. सूर्यवंशी प्लाॅट, मगरमच्छ काॅलनी, दत्त नगर, काका नगर परिसराला पुराचा नेहमीच फटका बसतो. मोलमजुरी करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. कच्च्या-पक्क्या घरांची वस्ती असलेल्या या भागातील नागरिक २०१९च्या महापुराच्या कटू आठवणी विसरून आता कुठे सावरले होते. त्यात पुन्हा महापुराने या परिसरात होत्याचे नव्हते केले आहे.

पुरात पत्र्याचीच घरे नव्हे, तर पक्की घरेही पूर्णत: बुडाली होती. आता पूर ओसरल्यानंतर या परिसरातील विदारक चित्र समोर येत आहे. रस्त्यावर, घरात मोठ्या प्रमाणात चिखल आहे. पुराच्या पाण्यातच घराची स्वच्छता सुरू आहे. महापालिकेचा पाणी पुरवठा सुरू झाल्याने थोडाफार दिलासा मिळाला आहे. परंतु, घरातील मोडलेला संसार पाहून महिलांना अश्रू अनावर होत नव्हते. प्रशासनाने ५२ फुटापर्यंत पाणी पातळीची शक्यता वर्तवली होती. त्यानुसार अनेकांनी साहित्य हलवले. पण सारेच साहित्य घराबाहेर नेणे शक्य नव्हते. त्यात ५५ फुट पाणी आल्याने सुरक्षित ठिकाणी ठेवलेले साहित्यही पुरात बुडाले. भांड्याकुंड्यांवर चिखलाचा थर होता. घरातील लाकडी कपाटांचेही नुकसान झाले आहे. अजूनही अनेक पूरग्रस्त नागरिक निवारा केंद्रातच आहेत. घराची स्वच्छता करून ते पुन्हा निवारा केंद्रात परतत आहेत.

चौकट

स्वच्छतेचे आव्हान

शेरीनाला, नदीकाठच्या सखल भागात पाण्याने मोठ्या प्रमाणात चिखल तयार झाला आहे. मगरमच्छ काॅलनीत फूटभर चिखल आहे. तो हटविण्याचे काम करावे लागेल. दोन दिवसांपासून रस्त्यावर खराब झालेले साहित्य पडले आहे. ते उचलण्यासाठी कोणीच तिकडे फिरकलेले नाही. त्यामुळे तातडीने रस्त्यावर पडलेले साहित्य उचलावे, अशी मागणी पूरग्रस्तांनी केली. काही गल्ल्यांत महापालिकेने औषध फवारणी केली होती.