शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

सरकारने कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:27 IST

सांगली : कोरोना रुग्णांबाबत देशात क्रमांक एकवर आलेला महाराष्ट्र आता जगात चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे या सरकारने हा ...

सांगली : कोरोना रुग्णांबाबत देशात क्रमांक एकवर आलेला महाराष्ट्र आता जगात चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्यामुळे या सरकारने हा महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टीका भाजपचे प्रवक्ते गोपीचंद पडळकर यांनी केले.

झरे (ता. आटपाडी) येथे प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेला लॉकडाऊनची धमकी देत आहेत. प्रत्येकवेळी जनतेवर कोरोना संसर्गाचे खापर फोडायचे आणि लॉकडाऊनचा इशारा द्यायचा, इतकेच काम ते करीत आहेत. लोकांच्या जगण्या-मरण्याचा प्रश्न निर्माण झाला असताना, सर्व उद्योग, व्यवसाय बंद करून लोकांना संकटात टाकण्याचे काम हे सरकार करीत आहे.

कोरोनाची सध्याची परिस्थिती ही लोकांमुळे निर्माण झाल्याचे सांगून लोकांनाच ते सूचना देत आहेत. लोकांनीच जर सर्व काही उपाय करायचे असतील, तर सरकार नेमके काय करणार आहे? सरकारची काही जबाबदारी आहे की नाही?

मनमानी निर्णय जनतेला गृहीत धरून लादले जात आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी अन्य काही उपाययोजना सरकारकडे नसल्यासारखे प्रत्येकवेळी लॉकडाऊन हा एकच पर्याय घेऊन सरकार समोर येत आहे. गेल्या काही महिन्यांत सरकारला कोरोना रोखण्यात अपयश आले आहे. हे त्यांनी आता प्रामाणिकपणाने कबूल करावे.

चौकट

राज्यातील अंधाराचे काय

एकीकडे पश्चिम बंगालमधील दिव्यांच्या कामाचे कौतुक करायचे, मात्र राज्यातील सरकारने जो अंध:कार केला आहे, त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करायचे, हा उद्धव ठाकरेंचा दुटप्पीपणा आहे, अशी टीका पडळकरांनी केली.