शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
4
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
5
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
6
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
7
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
8
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
9
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
10
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
11
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
12
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
13
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
14
ये नया हिंदुस्तान है...! केवळ पुतिनच नाही, झेलेंस्कीसुद्धा भारतात येणार...; तिकडे अमेरिकेचा 'यू-टर्न', इकडे वेगळाच 'पिक्चर' दिसणार?
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी होणार? ज्येष्ठांना सतावतेय चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला शासनाने खो दिल्याने लसीकरणाचा उद्देशच असफल होण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला शासनाने खो दिल्याने लसीकरणाचा उद्देशच असफल होण्याची भीती निर्माण झाली आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचे लसीकरण झाले, पण लस न घेतलेल्या तरुणांमुळे त्यांना संसर्गाची भीती आहे.

लसींच्या टंचाईमुळे लसीकरणाचे घोडे अडले आहे. जिल्ह्यात सुमारे २७ लाख लोकांचे लसीकरण अपेक्षित आहे, आतापर्यंत फक्त सहा लाखजणांना लस मिळाली आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याच्या या काळात लस हीच एकमेव मात्रा तूर्त सुरक्षेचे साधन ठरली होती. तीदेखील आता बंद झाल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. मंगळवारअखेर ६० वर्षांवरील २ लाख ९५ हजार ७६ ज्येष्ठांना लस मिळाली होती. त्या तुलनेत १८ ते ४४ वर्ष वयोगटातील फक्त १६ हजार ५१८ जणच लसीचे लाभार्थी ठरले आहेत.

हा वयोगट नोकरी, व्यवसायानिमित्ताने दिवसभर घराबाहेर असतो. त्यामुळे संसर्गाचा अधिक धोका त्यांना असतो. त्यामुळे त्यांना प्राधान्याने लस मिळणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया ज्येष्ठांमधून व्यक्त होत आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये तरुणवर्गाला संसर्गाचा धोका जास्त असल्याचा शासनाचाच दावा आहे. लसीकरणात मात्र या वयोगटाला मागे ठेवल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा तरुणवर्ग घरात परतल्यानंतर कुटुंबातील अन्य सदस्यांसाठीही कोरोनावाहक ठरण्याची भीती आहे. शासनाने तरुणवर्गाला प्राधान्य द्यायला हवे, अशी त्यांची मागणी आहे.

पॉईंटर्स

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

- ज्येष्ठ - पहिला डोस २,३५,३१०, दुसरा डोस २,९५,०७६

- ४५ ते ६० - पहिला डोस २,२९,२०८, दुसरा डोस २९,२४७

- १८ ते ४४ - पहिला डोस १६,५१८, दुसरा डोस ०००

कोट

ज्येष्ठांना प्राधान्याने लस दिली तरी दुसरा डोस अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे ते १०० टक्के सुरक्षित झालेले नाहीत. या स्थितीत तरुणांना लसीपासून वंचित ठेवल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तरुण मंडळी कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात, पदोपदी कोरोनाच्या धोक्याला सामोरी जात असतात. त्यामुळे शासनाने त्यांचे लसीकरण प्राधान्याने करायला हवे.

- अरुणराज कुलकर्णी, पालक

केंद्र सरकारने लसीचा पुरेसा पुरवठा करायला हवा, तरच तरुणांचे लसीकरण शक्य आहे. ज्येष्ठांचे लसीकरण झाले तरी ते पूर्णत: सुरक्षित झाल्याचे म्हणता येणार नाही. कुटुंबातील सर्व तरुण सदस्यांसह सर्वांचे लसीकरण झाले तरच कोरोनाशी मुकाबला शक्य आहे. त्यामुळे तरुणांना लस मिळायला हवी.

- अस्लम पटेल, पालक

१८ ते ४४ आणि ४५ ते ५९ वयोगटातील सर्वांना किमान पहिला डोस तरी दिलाच पाहिजे, तरच कोरोनापासून संरक्षण मिळेल. सध्या अर्धवट लसीकरणामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात आपण अपयशी ठरत आहोत. विशेषत: तरुणांचे प्राधान्याने लसीकरण झाले तर व्यवसाय, धंदे, नोकऱ्या सुुरू करणे शक्य होईल. गेल्या दोन वर्षांची आर्थिक कोंडी फोडता येईल.

- महादेव साळुंखे, पालक