शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

घाटमाथ्याला जोडणाऱ्या भुयारी रस्त्याचे काम कधी होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:21 IST

बोरगाव : वाळवा तालुक्यातील भवानीनगर ते गणेश खिंडी चिंचणी असा घाटमाथ्याला जोडणारा भुयारी रस्ता अपुरा आहे. या भुयारी मार्गसाठी ...

बोरगाव : वाळवा तालुक्यातील भवानीनगर ते गणेश खिंडी चिंचणी असा घाटमाथ्याला जोडणारा भुयारी रस्ता अपुरा आहे. या भुयारी मार्गसाठी निधीची तरतूद असतानाही गेल्या ६० वर्षांपासून कामे अपूर्ण आहेत. याकडे प्रशासन लक्ष कधी देणार, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

भवानीनगर ते गणेश खिंडी चिंचणी असा घाटमाथ्याला जोडणारा भुयारी रस्ता आजही अपुरा आहे. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होताे. पावसाळ्यात तर या रस्त्यावर कंबरेएवढे पाणी असते. त्यामुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्यांची वाहने बंद पडून त्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तत्कालीन भाजप सरकारने २०१८-१९च्या अर्थसंकल्पात या भुयारी मार्गासाठी तीन कोटी ८० लाख ३२ हजारांची विशेष तरतूद केली आहे. मात्र, निधीची तरतूद असूनही रस्त्याचे काम सुरू केलेले नाही. हा भुयारी मार्ग करण्यासाठी रेल्वेनेही हिरवा कंदील दाखवला आहे. रेल्वे प्रशासनाने राज्य शासनाला व ग्रामपंचायतीला ना हरकतीचे पत्रही दिले आहे. तरीही घाटमाथ्याला जोडणाऱ्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झालेले नाही. पालकमंत्री जयंत पाटील यांनी या प्रलंबित कामात लक्ष घालून कामाला गती देण्याची गरज आहे.

कोट

गेली ६० वर्षे जनता भुयारी मार्गासाठी लढत आहे. यात राजकारण न आणता त्वरित रस्त्याचे काम सुरू करावे. यासाठी ग्रामपंचायतीने सतत पाठपुरावा करुन भुयारी रस्त्याच्या कामाला गती देण्याची गरज आहे.

- राहुल वाकळे, युवक सरचिटणीस, तालुकाध्यक्ष, वाळवा.