शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोफत धान्य मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:19 IST

सांगली : कोरोनाचा वाढता कहर आणि संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे. गरजूंच्या रोटीरोटीचा ...

सांगली : कोरोनाचा वाढता कहर आणि संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे. गरजूंच्या रोटीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने मोफत धान्य देण्याची घोषणा केली असलीतरी जिल्ह्यात अद्यापही या धान्याचे वाटप सुरू झालेले नाही. धान्य वाटप सुरू करून दिलासा देण्याची अपेक्षा गरजूंकडून व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने कडक निर्बंधांची घोषणा करताना, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात दिल्यास दिलासा मिळाला आहे. काही घटकांना रोख रक्कम देण्यात आली आहे तर गोरगरीब घटकाला मोफत धान्य देण्यात येणार आहे. घोषणा होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्यापही त्याची अंमलबजावणी सुरू नाही. त्यामुळे धान्य वितरण सुरू करण्याची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाकडून धान्य व इतर आदेश नसल्यानेही तांत्रिक अडचणी येत आहेत.

कडक निर्बंधामुळे लागू केलेल्या संचारबंदीची मुदत संपण्याची वेळी आली तरीही अजूनही धान्याचे वाटप न झाल्याने ग्रामीण भागात लवकर धान्य मिळावी, अशी मागणी होत आहे.

केंद्र सरकारनेही पुन्हा एकदा मोफत धान्याची घोषणा केली असलीतरी त्याचीही अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

चौकट

एकूण कार्डधारकांची संख्या ४०५८७३

अंत्योदय कार्डधारकांची कुटुंब संख्या ३१३६५

प्राधान्य कुटुंब कार्डसंख्या ३७४५०८

चाैकट

गहू,तांदूळ मिळणार मोफत

शासनाने गरजू घटकाला मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार गहू व तांदूळ अंत्योदय लाभार्थ्यांना मिळणार आहे. यात दोन किलो गहू तर तीन किलो तांदूळ देण्यात येणार आहे.

कोट

शासनाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. प्रशासनाला आताच याबाबतचे आदेश मिळाले आहेत. तातडीने यावर कार्यवाही करून धान्याचे वाटप सुरू करण्यात येईल.

वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी

कोट

कोरोनामुळे अगोदरच रोजगाराच्या अडचणी आहेत. त्यामुळे राज्य शासननो आम्हाला दिलासा दिला आहे. आता फक्त मोफत धान्याचे वितरण व्हावे. हीच अपेक्षा आहे. काम नसल्याने लवकरात लवकर ही सुविधा मिळावी.

सिताराम ढोले

कोट

मोफत धान्य मिळणार म्हणून केवळ माहिती मिळाली आहे. मात्र, अद्यापही मिळाले नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग जादा असल्याने आम्हीही गेलो नाही मात्र, लवकर धान्य मिळावे ही मागणी आहे.

तम्माण्णा चौगुले

कोट

गेल्या महिनाभरापासून रोजगार थांबला आहे. आठवड्यात एखाद्या दिवशीच रोजगार मिळत आहे. त्यामुळे शासनाने घोषणा केलेल्या धान्याचे वाटप करून आम्हाला दिलासा द्यावा.

सुदाम खोत