शहरं
Join us  
Trending Stories
1
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
2
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
3
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
4
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
5
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
6
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
7
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
8
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
9
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
10
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
11
Ahmedabad Plane Crash: कॅप्टन सुमित सभरवाल यांच्यावर अंत्यसंस्कार!
12
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
13
Ahmedabad Plane Crash: एअर होस्टेस मैथिली पाटील हिला साश्रुनयनांनी अखेरचा निरोप
14
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
15
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
16
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
18
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
19
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
20
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोफत धान्य मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:19 IST

सांगली : कोरोनाचा वाढता कहर आणि संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे. गरजूंच्या रोटीरोटीचा ...

सांगली : कोरोनाचा वाढता कहर आणि संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे. गरजूंच्या रोटीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने मोफत धान्य देण्याची घोषणा केली असलीतरी जिल्ह्यात अद्यापही या धान्याचे वाटप सुरू झालेले नाही. धान्य वाटप सुरू करून दिलासा देण्याची अपेक्षा गरजूंकडून व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने कडक निर्बंधांची घोषणा करताना, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात दिल्यास दिलासा मिळाला आहे. काही घटकांना रोख रक्कम देण्यात आली आहे तर गोरगरीब घटकाला मोफत धान्य देण्यात येणार आहे. घोषणा होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्यापही त्याची अंमलबजावणी सुरू नाही. त्यामुळे धान्य वितरण सुरू करण्याची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाकडून धान्य व इतर आदेश नसल्यानेही तांत्रिक अडचणी येत आहेत.

कडक निर्बंधामुळे लागू केलेल्या संचारबंदीची मुदत संपण्याची वेळी आली तरीही अजूनही धान्याचे वाटप न झाल्याने ग्रामीण भागात लवकर धान्य मिळावी, अशी मागणी होत आहे.

केंद्र सरकारनेही पुन्हा एकदा मोफत धान्याची घोषणा केली असलीतरी त्याचीही अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

चौकट

एकूण कार्डधारकांची संख्या ४०५८७३

अंत्योदय कार्डधारकांची कुटुंब संख्या ३१३६५

प्राधान्य कुटुंब कार्डसंख्या ३७४५०८

चाैकट

गहू,तांदूळ मिळणार मोफत

शासनाने गरजू घटकाला मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार गहू व तांदूळ अंत्योदय लाभार्थ्यांना मिळणार आहे. यात दोन किलो गहू तर तीन किलो तांदूळ देण्यात येणार आहे.

कोट

शासनाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. प्रशासनाला आताच याबाबतचे आदेश मिळाले आहेत. तातडीने यावर कार्यवाही करून धान्याचे वाटप सुरू करण्यात येईल.

वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी

कोट

कोरोनामुळे अगोदरच रोजगाराच्या अडचणी आहेत. त्यामुळे राज्य शासननो आम्हाला दिलासा दिला आहे. आता फक्त मोफत धान्याचे वितरण व्हावे. हीच अपेक्षा आहे. काम नसल्याने लवकरात लवकर ही सुविधा मिळावी.

सिताराम ढोले

कोट

मोफत धान्य मिळणार म्हणून केवळ माहिती मिळाली आहे. मात्र, अद्यापही मिळाले नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग जादा असल्याने आम्हीही गेलो नाही मात्र, लवकर धान्य मिळावे ही मागणी आहे.

तम्माण्णा चौगुले

कोट

गेल्या महिनाभरापासून रोजगार थांबला आहे. आठवड्यात एखाद्या दिवशीच रोजगार मिळत आहे. त्यामुळे शासनाने घोषणा केलेल्या धान्याचे वाटप करून आम्हाला दिलासा द्यावा.

सुदाम खोत