शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोफत धान्य मिळणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:19 IST

सांगली : कोरोनाचा वाढता कहर आणि संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे. गरजूंच्या रोटीरोटीचा ...

सांगली : कोरोनाचा वाढता कहर आणि संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांमुळे जनजीवन विस्कळीत बनले आहे. गरजूंच्या रोटीरोटीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने मोफत धान्य देण्याची घोषणा केली असलीतरी जिल्ह्यात अद्यापही या धान्याचे वाटप सुरू झालेले नाही. धान्य वाटप सुरू करून दिलासा देण्याची अपेक्षा गरजूंकडून व्यक्त होत आहे.

राज्य शासनाने कडक निर्बंधांची घोषणा करताना, समाजातील गरजू घटकांना मदतीचा हात दिल्यास दिलासा मिळाला आहे. काही घटकांना रोख रक्कम देण्यात आली आहे तर गोरगरीब घटकाला मोफत धान्य देण्यात येणार आहे. घोषणा होऊन पंधरा दिवसांचा कालावधी उलटला तरी अद्यापही त्याची अंमलबजावणी सुरू नाही. त्यामुळे धान्य वितरण सुरू करण्याची मागणी होत आहे. जिल्हा प्रशासनाला राज्य शासनाकडून धान्य व इतर आदेश नसल्यानेही तांत्रिक अडचणी येत आहेत.

कडक निर्बंधामुळे लागू केलेल्या संचारबंदीची मुदत संपण्याची वेळी आली तरीही अजूनही धान्याचे वाटप न झाल्याने ग्रामीण भागात लवकर धान्य मिळावी, अशी मागणी होत आहे.

केंद्र सरकारनेही पुन्हा एकदा मोफत धान्याची घोषणा केली असलीतरी त्याचीही अंमलबजावणी अद्यापही झालेली नाही.

चौकट

एकूण कार्डधारकांची संख्या ४०५८७३

अंत्योदय कार्डधारकांची कुटुंब संख्या ३१३६५

प्राधान्य कुटुंब कार्डसंख्या ३७४५०८

चाैकट

गहू,तांदूळ मिळणार मोफत

शासनाने गरजू घटकाला मोफत धान्य देण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार गहू व तांदूळ अंत्योदय लाभार्थ्यांना मिळणार आहे. यात दोन किलो गहू तर तीन किलो तांदूळ देण्यात येणार आहे.

कोट

शासनाने केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. प्रशासनाला आताच याबाबतचे आदेश मिळाले आहेत. तातडीने यावर कार्यवाही करून धान्याचे वाटप सुरू करण्यात येईल.

वसुंधरा बारवे, जिल्हा पुरवठा अधिकारी

कोट

कोरोनामुळे अगोदरच रोजगाराच्या अडचणी आहेत. त्यामुळे राज्य शासननो आम्हाला दिलासा दिला आहे. आता फक्त मोफत धान्याचे वितरण व्हावे. हीच अपेक्षा आहे. काम नसल्याने लवकरात लवकर ही सुविधा मिळावी.

सिताराम ढोले

कोट

मोफत धान्य मिळणार म्हणून केवळ माहिती मिळाली आहे. मात्र, अद्यापही मिळाले नाही. सध्या कोरोनाचा संसर्ग जादा असल्याने आम्हीही गेलो नाही मात्र, लवकर धान्य मिळावे ही मागणी आहे.

तम्माण्णा चौगुले

कोट

गेल्या महिनाभरापासून रोजगार थांबला आहे. आठवड्यात एखाद्या दिवशीच रोजगार मिळत आहे. त्यामुळे शासनाने घोषणा केलेल्या धान्याचे वाटप करून आम्हाला दिलासा द्यावा.

सुदाम खोत