शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

महामार्ग जोडणी, रेल्वेमार्गाच्या पायाभूत सुविधांकडे लक्ष कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2019 23:53 IST

तज्ज्ञ म्हणतात, अजून बरेच करावे लागेल सांगली : देशातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या राष्टÑीय महामार्गापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर असलेला व ...

तज्ज्ञ म्हणतात, अजून बरेच करावे लागेलसांगली : देशातील सर्वात महत्त्वाच्या असलेल्या राष्टÑीय महामार्गापासून अवघ्या पन्नास किलोमीटरवर असलेला व रेल्वेचे सक्षम जाळे असलेल्या सांगली मतदारसंघातील पायाभूत सुविधांचा मात्र विकास होताना दिसत नाही. जिल्ह्यातील पाणी योजनांची आवर्तने सुरू झाली; मात्र अर्धवट कामांमुळे अडचणी अद्याप कायम आहेत.देशातील प्रमुख राष्टÑीय महामार्ग अर्थात पुणे-बंगळूरू मार्ग जिल्ह्यातून जात असला तरी, त्याचा जिल्ह्याच्या विकासासाठी वापर करून घेण्यात अद्याप यश आले नाही. सांगलीपासून केवळ पन्नासभर किलोमीटरवर हा महत्त्वाचा मार्ग असतानाही मतदारसंघात एखादा देशपातळीवरील महत्त्वाचा उद्योग अथवा औद्योगिक संस्था आलेली नाही. त्यामुळे शैक्षणिकदृष्ट्या पुढारलेल्या जिल्ह्यातील तरूणांना नोकरीसाठी पुण्या-मुंबईचा रस्ता धरावा लागत आहे. सध्या विजापूर-गुहागर व रत्नागिरी-नागपूर या राष्टÑीय महामार्गाचे गतीने काम चालू आहे. देशातील प्रमुख शहरापर्यंत सहजपणे जाणारी रेल्वे सुविधा उपलब्ध आहे. त्याचाही फायदा करून घेण्यात राज्यकर्त्यांना अपयश येत आहे. ड्रायपोर्टच्या माध्यमातून पहिले पाऊल उचलले गेले असले तरी, त्याची प्रत्यक्षातील अंमलबजावणी व त्याचा मतदारसंघाच्या विकासाला मिळणारा हातभार बघावा लागणार आहे.मिरज रेल्वे जंक्शनच्या माध्यमातून जिल्ह्याला ‘विकासाचे जंक्शन’ बनविता येऊ शकते. यासाठी राज्यकर्त्यांचा पुढाकार महत्त्वाचा ठरणार आहे. या सुविधांचा उपयोग केल्यास जिल्ह्यातील शेतीला औद्योगिक क्षेत्राला उभारी मिळण्यास वेळ लागणार नाही.आतापर्यंत काय झाले उपाय?1जिल्ह्यातून आतापर्यंत केवळ एकच राष्टÑीय महामार्ग जात होता, आता मात्र विजापूर-गुहागर व नागपूर-रत्नागिरी या महत्त्वाच्या राष्टÑीय महामार्गांचे काम सुरू आहे.2संपूर्ण देशाला सोयीचे ‘अ‍ॅक्सेस’ असलेली रेल्वे दळणवळणाची सुविधा जिल्ह्यात उपयोग असतानाही त्याचा उपयोग होत नव्हता. आता मात्र ड्रायपोर्टच्या माध्यमातून त्याचा वापर प्रथमच होणार आहे.3जिल्ह्यातील टंचाई परिस्थिती दूर करण्यासाठी तीन महत्त्वाच्या पाणी योजना असल्या तरी, त्याची कामे रखडली होती. सध्या या योजना पूर्णत्वास येत आहेत.तज्ज्ञांना काय अपेक्षित आहे?1इतर जिल्ह्याच्या मानाने जिल्ह्यात वेअर हाऊसचे जाळे खूपच कमकुवत आहे. पायाभूत सुविधांचा विचार करता, वेअर हाऊसेसची संख्या वाढणे गरजेचे आहे.2जिल्ह्यात रेल्वेचे जाळे असताना व त्यांच्या मोठ्या प्रमाणावर जमिनी पडून असताना त्या जागांचा माल ठेवण्यासाठी वापर होऊ शकतो. त्यासाठी रेल्वेने काही मोबदला घ्यावा, पण यामुळे रस्त्यावरील ताण कमी होऊन त्याचा फायदाही होणार आहे.3वाढत्या लोकसंख्येचा विचार करता रस्त्यांचा विकास, उद्योग वाढीसाठी शासनाने प्रयत्न करायला हवेत.