शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

पूर ओसरला, विधानसभेच्या तयारीला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:30 IST

सांगली : महापुरात पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत ...

सांगली : महापुरात पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. आता पूर ओसरतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी मंगळवारी सांगलीत केली.विधानसभा निवडणुकीचच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, दीपकबाबा शिंदे, समन्वयक मकरंद देशपांडे, माजी आमदार भगवानराव सांळुखे, अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील उपस्थित होते.मंत्री पाटील-निलंगेकर म्हणाले, सांगलीकरांचे लातूरकरांवर प्रेम आहे. दुष्काळी स्थितीत सांगलीकरांनी रेल्वेने लातूरला पाणी दिले होते. किल्लारी भूंकपावेळीही मदतीचा हात दिला होता. सांगलीकरांचे हे उपकार लातूरकर विसरणार नाहीत. सांगली जिल्हा महापुरातून सावरत असताना त्यांना उभे करण्यासाठी लातूरकरांनी पुढाकार घेतला आहे. महापुरातही लातूरकरांनी मदत केली आहे. स्मकरंद देशपांडे म्हणाले, जिल्ह्यातील १०३ गावांत पूरस्थिती होती. या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पुरात काम केले. एकीकडे पूरग्रस्त लोकांसाठी काम करताना दुसरीकडे दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेसाठीही काम करावे लागणार आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभेच्या जागा जिंकण्याच्यादृष्टीने भाजप प्रयत्नशील आहे. ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान विधानसभा संघनिहाय भाजप कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.प्रारंभी जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी दीपक शिंदे म्हैसाळकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. रवींद्र आरळी, सागर खोत, सुरेश आवटी, डी. के. पाटील उपस्थित होते.पद्माळे गाव लातूरकरांकडून दत्तकपूरग्रस्त पद्माळे हे गाव लातूरकरांनी दत्तक घेतल्याची घोषणा मंत्री पाटील- निलंगेकर यांनी केली. या गावालाही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. लातूरचे जिल्हाधिकारी ग्रामस्थांच्या संपर्कात आहेत. लातूरमधील एका तहसीलदाराची खास नेमणूक करण्यात आली आहे. तेही आठवडाभर गावात थांबून ग्रामस्थांना मदत करीत आहेत. ग्रामस्थांचे आरोग्य, कौटुंबिक गरजा, शाळेच्या पुनर्बांधणीसाठीही आवश्यक ती मदत केली जाईल. पुढील दोन वर्षात पद्माळे हे आदर्श गाव करण्याचा लातूरकरांचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.मतदारसंघनिहाय प्रभारी जाहीरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी विधानसभानिहाय प्रभारी व संयोजकांची नावे जाहीर केली. मिरजेसाठी प्रभारी प्रकाश बिरजे, तर संयोजक मोहन व्हनखंडे, सांगलीसाठी दीपक शिंदे, शरद नलवडे, इस्लामपूसाठी सुखदेव पाटील, यदुराज थोरात, पलूस-कडेगावला दत्तात्रय सूर्यवंशी, आप्पासाहेब काळेबाग, जतला परशुराम नागरगोजे, संजय गावडे, तासगाव-कवठेमहांकाळसाठी अरविंद तांबवेकर, हायूम सावनूरकर, तर शिराळ्यासाठी विजय चोपडे व प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली.