शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

पूर ओसरला, विधानसभेच्या तयारीला लागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2019 00:30 IST

सांगली : महापुरात पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत ...

सांगली : महापुरात पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे. शासनाच्या योजनांचा लाभही त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. आता पूर ओसरतोय, त्यामुळे कार्यकर्त्यांनी विधानसभेच्या तयारीला लागावे, अशी सूचना अन्न व नागरी पुरवठामंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी मंगळवारी सांगलीत केली.विधानसभा निवडणुकीचच्या पार्श्वभूमीवर सांगलीत भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार संजयकाका पाटील, जिल्हाध्यक्ष आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार सुधीर गाडगीळ, प्रदेश उपाध्यक्षा नीता केळकर, दीपकबाबा शिंदे, समन्वयक मकरंद देशपांडे, माजी आमदार भगवानराव सांळुखे, अजितराव घोरपडे, आमदार विलासराव जगताप, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, महापौर संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील उपस्थित होते.मंत्री पाटील-निलंगेकर म्हणाले, सांगलीकरांचे लातूरकरांवर प्रेम आहे. दुष्काळी स्थितीत सांगलीकरांनी रेल्वेने लातूरला पाणी दिले होते. किल्लारी भूंकपावेळीही मदतीचा हात दिला होता. सांगलीकरांचे हे उपकार लातूरकर विसरणार नाहीत. सांगली जिल्हा महापुरातून सावरत असताना त्यांना उभे करण्यासाठी लातूरकरांनी पुढाकार घेतला आहे. महापुरातही लातूरकरांनी मदत केली आहे. स्मकरंद देशपांडे म्हणाले, जिल्ह्यातील १०३ गावांत पूरस्थिती होती. या ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी पुरात काम केले. एकीकडे पूरग्रस्त लोकांसाठी काम करताना दुसरीकडे दोन महिन्यावर येऊन ठेपलेल्या विधानसभेसाठीही काम करावे लागणार आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभेच्या जागा जिंकण्याच्यादृष्टीने भाजप प्रयत्नशील आहे. ३१ आॅगस्ट ते ५ सप्टेंबरदरम्यान विधानसभा संघनिहाय भाजप कार्यकर्त्यांचे मेळावे आयोजित करण्यात आल्याचे सांगितले.प्रारंभी जिल्हाध्यक्ष आ. पृथ्वीराज देशमुख यांनी स्वागत केले. यावेळी दीपक शिंदे म्हैसाळकर, माजी आमदार भगवानराव साळुंखे, डॉ. रवींद्र आरळी, सागर खोत, सुरेश आवटी, डी. के. पाटील उपस्थित होते.पद्माळे गाव लातूरकरांकडून दत्तकपूरग्रस्त पद्माळे हे गाव लातूरकरांनी दत्तक घेतल्याची घोषणा मंत्री पाटील- निलंगेकर यांनी केली. या गावालाही त्यांनी भेट देऊन पाहणी केली. लातूरचे जिल्हाधिकारी ग्रामस्थांच्या संपर्कात आहेत. लातूरमधील एका तहसीलदाराची खास नेमणूक करण्यात आली आहे. तेही आठवडाभर गावात थांबून ग्रामस्थांना मदत करीत आहेत. ग्रामस्थांचे आरोग्य, कौटुंबिक गरजा, शाळेच्या पुनर्बांधणीसाठीही आवश्यक ती मदत केली जाईल. पुढील दोन वर्षात पद्माळे हे आदर्श गाव करण्याचा लातूरकरांचा निर्धार असल्याचेही त्यांनी सांगितले.मतदारसंघनिहाय प्रभारी जाहीरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी विधानसभानिहाय प्रभारी व संयोजकांची नावे जाहीर केली. मिरजेसाठी प्रभारी प्रकाश बिरजे, तर संयोजक मोहन व्हनखंडे, सांगलीसाठी दीपक शिंदे, शरद नलवडे, इस्लामपूसाठी सुखदेव पाटील, यदुराज थोरात, पलूस-कडेगावला दत्तात्रय सूर्यवंशी, आप्पासाहेब काळेबाग, जतला परशुराम नागरगोजे, संजय गावडे, तासगाव-कवठेमहांकाळसाठी अरविंद तांबवेकर, हायूम सावनूरकर, तर शिराळ्यासाठी विजय चोपडे व प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली.