शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

आटपाडीची नगरपालिका कधी? पुन्हा ग्रामपंचायतीचीच निवडणूक : सर्वच पक्षांच्या नेत्यांचे अपयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:38 IST

आटपाडी : ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी!’ या म्हणीचा प्रत्यय सध्या आटपाडीकरांना चांगलाच अनुभवायला मिळत आहे.

अविनाश बाड ।आटपाडी : ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी!’ या म्हणीचा प्रत्यय सध्या आटपाडीकरांना चांगलाच अनुभवायला मिळत आहे. आटपाडी ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीत का नगरपालिकेत होणार याकडे डोळे लावून बसलेल्या आटपाडीकरांवर पुन्हा ग्रामपंचायतीसाठीच निवडणूक लागल्याने कपाळावर हात मारून घेण्याची वेळ आली आहे. एरवी छोट्या-मोठ्या कामांचे श्रेय लाटण्यासाठी हपापलेल्या नेत्यांनी या अपयशाला जबाबदार कोण? हे सांगण्याची गरज आहे.आटपाडी ग्रामपंचायतीच्या सदस्यांची मुदत संपल्याने या निवडणूक लागली आहे. तब्बल दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाने तालुक्याचे ठिकाण असलेल्या सर्व ग्रामपंचायतींचे नगरपंचायतीत रुपांतर करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला. त्याची राज्यभर अंमलबजावणी झाली. तिथे नव्याने निवडणुकाही झाल्या. पण आटपाडी ग्रामपंचायतीबाबतीत मात्र निव्वळ राजकारण झाले. त्यातून नगरपंचायतीऐवजी थेट नगरपालिका करण्यात यावी, अशीही मागणी पुढे आली. पण प्रत्यक्षात फक्त तारीख पे तारीख करत कारभाऱ्यांनी मात्र पाच वर्षे काढून गावाला आपआपला नमुना दाखविला.विशेष म्हणजे तीन गटाच्या या सदस्यांमध्ये निधी वाटून घेण्यात अजिबात वाद नव्हता. सदस्यांना स्वत:च्या नावावर ग्रामपंचायतीचा कुठलाही ठेका अथवा लाभ घेता येत नसताना कुठल्या पंचाचे कुठले काम, त्यात किती डल्ला मारला, यावरच ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात कायम चर्चा होत होती. डमी नावे टाकून अनेक सदस्यांनीच कामे करून खिसे भरल्याचा आरोप वारंवार होत होता.या कारभाराला कंटाळून लोक नगरपंचायत होईल आणि कारभारात, विकासात काही सुधारणा होईल, अशी अपेक्षा करून दिवस ढकलत होते. मात्र ग्रामपंचायतीची निवडणूक लागल्याने नागरिकांच्या आशेवर पाणी फिरले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये या निवडणुकीबद्दल अनुत्साह दिसून येत आहे. पण होणार- होणार म्हणून गाजत असलेली नगरपंचायत नेमकी होणार कधी? हा प्रश्न आजही अनुत्तरीत आहे.आटपाडीच्या विकासाचा मारेकरी कोण?आटपाडी म्हणजे मागास असे चित्र पूर्णपणे बदलण्यात दुर्दैवाने कुठल्याच नेत्याला आजपर्यंत यश आलेले नाही. आटपाडीच्या विकासाच्या प्रत्येक गोष्टीचं राजकारण होतं आणि आटपाडीकरांना त्यापासून वंचित ठेवलं जातं, हा आरोप अनेकदा केला जातो. नगरपंचायत झाली, तर गावाचा विकास होईल आणि हा राज्यासाठी झालेल्या निर्णयसुद्धा इथे अपवाद ठरला की ठरविला गेला? याबद्दल उलट-सुलट चर्चा सुरू आहे.उमेदवारांच्या पोटात भीतीचा गोळा!आता संपूर्ण गावातून सरपंच निवड होतेय. त्यामुळे तेवढा खर्च करून आणि सदस्य म्हणून जरी निवडणूक जिंकली तर, नगरपंचायत कधी जाहीर होईल, याचा नेम नाही. त्यामुळे पुन्हा निवडणूक लढावी लागण्याची शक्यता उमेदवारांना हैराण करते आहे. पहिला नगराध्यक्ष आणि नगरसेवक होण्यासाठी उतावीळ होऊन गुडघ्याला बाश्ािंग बांधून तयार असणाºया उमेदवारांची तर या निवडणुकीने घोर निराशा केली आहे. नेत्यांनासुद्धा उमेदवारांना पकडून अर्ज भरा म्हणण्याची वेळ आली आहे.