शहरं
Join us  
Trending Stories
1
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
2
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
3
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
4
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
5
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
6
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
7
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
8
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
9
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
10
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
11
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
12
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
13
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं
14
राज ठाकरे म्हणाले, आपलीच सत्ता येणार; पण कशी? उद्धवसेनेशी युती करून की स्वबळावर?
15
धाराशिव हादरले! जुन्या वादातून महाकाली कलाकेंद्र परिसरात गोळीबार, एक जखमी
16
पत्नीशी झाला वाद, पित्याने दोन चिमुकल्यांवर काढला राग! मुलांना वाहत्या नदीत फेकलं अन्...
17
'मस्त राहा, सगळं मस्तच होईल' प्रेमानंद महाराजांनी सांगितले आनंदी जीवनाचे ६ मार्ग!
18
Aditya Infotech IPO Listing: ५१% प्रीमिअमवर लिस्ट झाला 'हा' IPO; गुंतवणुकदारांवर पैशांचा पाऊस, एन्ट्री घेताच खरेदीसाठी उड्या
19
बापरे! हे तर भलतेच...! इलेक्ट्रीक कार जास्त प्रदूषण करतात; पेट्रोल, डिझेलशी तुलना कराल तर...थक्क व्हाल
20
स्वप्न साकार! वडील भाजी विकायचे, आईने गहाण ठेवले दागिने; लेकीने केलं कष्टाचं सोनं

गहू, हरभरा आता फक्त खाण्यापुरताच!

By admin | Updated: November 12, 2014 23:26 IST

मिरज पूर्वमधील स्थिती : क्षेत्रच घटले; ऊस, द्राक्षे, फळपिके, भाजीपाल्यास पसंती

लिंगनूर : मिरज पूर्व भागातील बहुतांश गावात म्हैसाळ योजनेचे पाणी खळाळू लागल्याने व परिसरातील पाणीपातळीही वाढू लागल्याने आता हा भाग संपूर्ण बागायती होण्याच्या मार्गावर आहे. ऊस, द्राक्षे यांनी क्षेत्र व्यापून टाकले असताना आता गहू, हरभरा या रब्बी पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटू लागले आहे. त्यांची जागा ऊस, द्राक्षे व नगदी भाजीपाला फळपिके घेऊ लागली आहेत. त्यामुळे गहू, हरभरा आता फक्त खाण्यापुरताच पिकवायचा, या मानसिकतेत बरेच शेतकरी पोहोचले आहेत.मिरज पूर्व भागात म्हैसाळ योजनेने या भागाचे नंदनवन केले आहे. दुष्काळ योजनेच्या पाण्यामुळे सह्य होत आहे. हिवाळ्यात रब्बी व उन्हाळ्यातही आवर्तनांचा लाभ बऱ्याच गावांना व शेती क्षेत्राला होऊ लागला आहे. यामुळे येथील शेती बागायती होत आहे. बागायती शेती करताना तुलनात्मक अभ्यास करून शेतकरी ऊस व द्राक्ष या पिकांनाच प्राधान्य देत असल्याने दरवर्षी या दोन्ही पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. द्राक्षपीक जोखमीचे असूनही द्राक्षे व बेदाण्याचे दर पाहता दराची लॉटरी लागल्यास मोठा नफा शक्य असतो, त्यामुळे जोखीम पत्करून द्राक्षलागणीत वाढ सुरूच आहे, तर रोगाची अत्यंत कमी जोखीम व अल्प व्यवस्थापनावर ऊसशेती फुलत आहे आणि २२०० चा समाधानकारक दर मिळू लागल्याने ऊसक्षेत्रात वाढ होत आहे.या तुलनेत गव्हावर तांबेरा रोग येतो, गव्हाचा दरही २० ते २२ रुपये किलोपर्यंतच मिळतो त्यामुळे ५० हजारावर एकरी नफा मिळविणे मोठे जिकिरीचे होते. त्यामुळे गहू व हरभरा या पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. गहू, हरभऱ्याच्या तुलनेत मका पीक अद्याप काहीसे टिकून आहे. पण भविष्यात पाणी याजेनांची विश्वासार्हता व वितरण होत राहिल्यास या पिकांचीही जागा ऊस व द्राक्षे यासारखी पिकेच घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू व हरभऱ्याचे क्षेत्र मिरज पूर्व भागातील बेडग, आरग, लिंगनूर, बेळंकी, खटाव, एरंडोली, शिपूर या परिसरात सरासरी १० ते २० टक्केच उरले आहे. जानराववाडी, चाबूकस्वारवाडी, शिंदेवाडी, सलगरे या परिसरातील ज्या भागात म्हैसाळचे पाणी पोहोचण्यात अडचणी आहेत, अशा भागात काही प्रमाणात हे पीक पहावयास मिळत आहे. बाकी सर्व क्षेत्रांवर आता केवळ ऊस व द्राक्षपिकाचाच कब्जा आहे. (वार्ताहर)मिरज पूर्व भागात बागायती शेतीत वाढ होत आहे. उसाला कमी जोखीम, कमी व्यवस्थापन व चांगल्या दरामुळे पसंती आहे. त्या तुलनेत गहू, हरभरा ही पिके दराचा अभ्यास करता कमी मिळकत देणारी आहेत. त्यामुळे आता शेतकरी केवळ घरचा गहू, हरभरा खायचा म्हणून १० ते २० गुंठेच पेरणी करून उत्पादन घेत आहेत. या परिस्थितीला नैसर्गिक स्थिती, दर, रोग व व्यवस्थापनातील तुलनात्मक स्थितीच कारणीभूत आहे.- रूद्राप्पा कोथळे, शेतकरी, संतोषवाडी (ता. मिरज)