शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
4
'त्या प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
5
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
6
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
7
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
8
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
9
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
10
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
11
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
12
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
13
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
14
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
15
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
16
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
17
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
18
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
19
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
20
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
Daily Top 2Weekly Top 5

गहू, हरभरा आता फक्त खाण्यापुरताच!

By admin | Updated: November 12, 2014 23:26 IST

मिरज पूर्वमधील स्थिती : क्षेत्रच घटले; ऊस, द्राक्षे, फळपिके, भाजीपाल्यास पसंती

लिंगनूर : मिरज पूर्व भागातील बहुतांश गावात म्हैसाळ योजनेचे पाणी खळाळू लागल्याने व परिसरातील पाणीपातळीही वाढू लागल्याने आता हा भाग संपूर्ण बागायती होण्याच्या मार्गावर आहे. ऊस, द्राक्षे यांनी क्षेत्र व्यापून टाकले असताना आता गहू, हरभरा या रब्बी पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस घटू लागले आहे. त्यांची जागा ऊस, द्राक्षे व नगदी भाजीपाला फळपिके घेऊ लागली आहेत. त्यामुळे गहू, हरभरा आता फक्त खाण्यापुरताच पिकवायचा, या मानसिकतेत बरेच शेतकरी पोहोचले आहेत.मिरज पूर्व भागात म्हैसाळ योजनेने या भागाचे नंदनवन केले आहे. दुष्काळ योजनेच्या पाण्यामुळे सह्य होत आहे. हिवाळ्यात रब्बी व उन्हाळ्यातही आवर्तनांचा लाभ बऱ्याच गावांना व शेती क्षेत्राला होऊ लागला आहे. यामुळे येथील शेती बागायती होत आहे. बागायती शेती करताना तुलनात्मक अभ्यास करून शेतकरी ऊस व द्राक्ष या पिकांनाच प्राधान्य देत असल्याने दरवर्षी या दोन्ही पिकांच्या लागवड क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. द्राक्षपीक जोखमीचे असूनही द्राक्षे व बेदाण्याचे दर पाहता दराची लॉटरी लागल्यास मोठा नफा शक्य असतो, त्यामुळे जोखीम पत्करून द्राक्षलागणीत वाढ सुरूच आहे, तर रोगाची अत्यंत कमी जोखीम व अल्प व्यवस्थापनावर ऊसशेती फुलत आहे आणि २२०० चा समाधानकारक दर मिळू लागल्याने ऊसक्षेत्रात वाढ होत आहे.या तुलनेत गव्हावर तांबेरा रोग येतो, गव्हाचा दरही २० ते २२ रुपये किलोपर्यंतच मिळतो त्यामुळे ५० हजारावर एकरी नफा मिळविणे मोठे जिकिरीचे होते. त्यामुळे गहू व हरभरा या पिकांचे क्षेत्र दिवसेंदिवस घटत चालले आहे. गहू, हरभऱ्याच्या तुलनेत मका पीक अद्याप काहीसे टिकून आहे. पण भविष्यात पाणी याजेनांची विश्वासार्हता व वितरण होत राहिल्यास या पिकांचीही जागा ऊस व द्राक्षे यासारखी पिकेच घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामातील गहू व हरभऱ्याचे क्षेत्र मिरज पूर्व भागातील बेडग, आरग, लिंगनूर, बेळंकी, खटाव, एरंडोली, शिपूर या परिसरात सरासरी १० ते २० टक्केच उरले आहे. जानराववाडी, चाबूकस्वारवाडी, शिंदेवाडी, सलगरे या परिसरातील ज्या भागात म्हैसाळचे पाणी पोहोचण्यात अडचणी आहेत, अशा भागात काही प्रमाणात हे पीक पहावयास मिळत आहे. बाकी सर्व क्षेत्रांवर आता केवळ ऊस व द्राक्षपिकाचाच कब्जा आहे. (वार्ताहर)मिरज पूर्व भागात बागायती शेतीत वाढ होत आहे. उसाला कमी जोखीम, कमी व्यवस्थापन व चांगल्या दरामुळे पसंती आहे. त्या तुलनेत गहू, हरभरा ही पिके दराचा अभ्यास करता कमी मिळकत देणारी आहेत. त्यामुळे आता शेतकरी केवळ घरचा गहू, हरभरा खायचा म्हणून १० ते २० गुंठेच पेरणी करून उत्पादन घेत आहेत. या परिस्थितीला नैसर्गिक स्थिती, दर, रोग व व्यवस्थापनातील तुलनात्मक स्थितीच कारणीभूत आहे.- रूद्राप्पा कोथळे, शेतकरी, संतोषवाडी (ता. मिरज)