शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
4
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
5
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
6
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
7
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
8
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
9
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
10
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
11
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
12
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
13
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
14
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
15
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
16
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
17
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
18
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
19
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
20
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?

जात प्रमाणपत्रापुढे कोरोनाची काय बिशाद? ‘सामाजिक न्याय’मध्ये झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST

सांगली : ग्रामपंचायत निवडणुका आणि महाविद्यालयीन प्रवेश एकाच कालावधित आल्याने जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी झुंबड उडाली आहे. गर्दीची ...

सांगली : ग्रामपंचायत निवडणुका आणि महाविद्यालयीन प्रवेश एकाच कालावधित आल्याने जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी झुंबड उडाली आहे. गर्दीची बेफिकिरी पाहता, यापैकी कोणालाच कोरोनाचे गांभीर्य नसावे, असेच स्पष्ट होत होते. उमेदवार आणि विद्यार्थी या दोहोंच्या सुरक्षिततेचे भान नव्हते. खुद्द प्रशासनाचेही या अनागोंदीकडे लक्ष नसल्याचे आढळले.

अचानक गर्दी लाढल्याने प्रशासनावर ताण आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठीचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करायचे आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष कागदपत्रेही कार्यालयात आणून द्यायची आहेत. यामुळे राखीव जागांवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी रांगा लावल्या आहेत. त्यात महिलांचाही समावेश आहे. गर्दीमुळे प्रत्येकजण एकमेकाच्या अंगावर ढकलला जातोय. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे भान कोणालाच राहत नाही. मास्कदेखील नावालाच आहेत. प्रत्येकजण मास्क हनुवटीवरच घेऊन रांगेत थांबतोय. विद्यार्थ्यांसाठी वेगळी खिडकी केली असून तेथेही रांगा आहेत. त्यांनाही कोरोनाचे भान नसावे असेच चित्र आहे.

प्रवेशद्वारात सॅनिटायझरची बाटली आहे, पण ती आपल्यासाठी नसावी असेच समजून प्रत्येकजण तिच्याकडे दुर्लक्ष करून जातो. राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. ही गर्दी पाहता ती लवकरच येईल असेच वाटते.

तूर्त विद्यार्थ्यांना प्राधान्य

दाखल्यांसाठीची गर्दी आणि अपुरे मनुष्यबळ पाहता, प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या दाखल्यांना प्राधान्य दिले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाची जात प्रमाणपत्रे तातडीने दिली जात आहेत. सध्या दररोज ८० ते १०० प्रस्ताव येत आहेत, निर्गतीही त्याचगतीने सुरु असल्याचे उपायुक्त खुशाल गायकवाड म्हणाले.

मनुष्यबळाअभावी दाखले वितरणावर मर्यादा येत आहेत. तरीही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या दाखल्यांना प्राधान्य दिले आहे. उमेदवारांच्या दाखल्यांचा विचार नंतर केला जाईल. निवडून आलेल्यांची यादी मिळताच त्यांच्या जातीची पडताळणी केली जाईल. त्यामुळे तूर्त उमेदवारांपेक्षा शैक्षणिक दाखल्यांकडे लक्ष आहे. कोरोनाविषयी काळजी घेत आहोत.

- खुशाल गायकवाड, उपायुक्त, समाजकल्याण

प्रशासनातर्फे दक्षता

कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाने प्रवेशद्वारातच सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. सुरक्षारक्षक प्रत्येकाला सॅनिटायझर वापराची सूचना करतो. सोशल डिस्टन्सिंगसाठी मात्र गर्दीवर नियंत्रण राहिलेले नाही. वारंवार सूचना करुनही लोक ऐकत नसल्याचा अनुभव आहे.

रोज १५० अर्ज

निवडणूक व महाविद्यालयीन प्रवेश यामुळे सध्या दररोज सरासरी १५० अर्ज दाखल होत आहेत. त्यामध्ये भावी सरपंचांचे प्रस्ताव जास्त आहेत. शिक्षणासाठीचे त्रुटीविरहीत अर्ज तात्काळ निकाली काढले जात आहेत. चौकशी असेल तरच वेळ जात आहे.

निवडणूक झाल्यावरच

उमेदवारांकडून ऑनलाईन प्रस्ताव घेतले जात आहेत. त्याची एक प्रत समाजकल्याण कार्यालयात स्वीकारली जात आहे. उमेदवारी दाखल करताना तूर्त टोकन जोडावे लागेल. निवडून आलेल्या सदस्यांचीच जात पडताळणी केली जाईल. रोज ७० ते ८० अर्ज येत आहेत, पडताळणीचे प्रमाणपत्र मात्र सध्या दिले जात नाही.

--------