शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
2
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
3
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
4
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
5
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
6
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
7
मायकल जॅक्सनचं स्वागत करण्यासाठी सोनाली बेंद्रेने ठेवलेली 'ही' अट, म्हणाली- "राज ठाकरेंच्या पत्नीने मला..."
8
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
9
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
10
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
11
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
12
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
13
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
14
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
15
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
16
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
17
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
18
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
19
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
20
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा

जात प्रमाणपत्रापुढे कोरोनाची काय बिशाद? ‘सामाजिक न्याय’मध्ये झुंबड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 04:21 IST

सांगली : ग्रामपंचायत निवडणुका आणि महाविद्यालयीन प्रवेश एकाच कालावधित आल्याने जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी झुंबड उडाली आहे. गर्दीची ...

सांगली : ग्रामपंचायत निवडणुका आणि महाविद्यालयीन प्रवेश एकाच कालावधित आल्याने जिल्हा समाजकल्याण कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी झुंबड उडाली आहे. गर्दीची बेफिकिरी पाहता, यापैकी कोणालाच कोरोनाचे गांभीर्य नसावे, असेच स्पष्ट होत होते. उमेदवार आणि विद्यार्थी या दोहोंच्या सुरक्षिततेचे भान नव्हते. खुद्द प्रशासनाचेही या अनागोंदीकडे लक्ष नसल्याचे आढळले.

अचानक गर्दी लाढल्याने प्रशासनावर ताण आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी जात पडताळणीसाठीचे प्रस्ताव ऑनलाईन सादर करायचे आहेत. त्याचबरोबर प्रत्यक्ष कागदपत्रेही कार्यालयात आणून द्यायची आहेत. यामुळे राखीव जागांवरून निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी रांगा लावल्या आहेत. त्यात महिलांचाही समावेश आहे. गर्दीमुळे प्रत्येकजण एकमेकाच्या अंगावर ढकलला जातोय. अशावेळी सोशल डिस्टन्सिंगचे भान कोणालाच राहत नाही. मास्कदेखील नावालाच आहेत. प्रत्येकजण मास्क हनुवटीवरच घेऊन रांगेत थांबतोय. विद्यार्थ्यांसाठी वेगळी खिडकी केली असून तेथेही रांगा आहेत. त्यांनाही कोरोनाचे भान नसावे असेच चित्र आहे.

प्रवेशद्वारात सॅनिटायझरची बाटली आहे, पण ती आपल्यासाठी नसावी असेच समजून प्रत्येकजण तिच्याकडे दुर्लक्ष करून जातो. राज्यात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविली जात आहे. ही गर्दी पाहता ती लवकरच येईल असेच वाटते.

तूर्त विद्यार्थ्यांना प्राधान्य

दाखल्यांसाठीची गर्दी आणि अपुरे मनुष्यबळ पाहता, प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या दाखल्यांना प्राधान्य दिले आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमाची जात प्रमाणपत्रे तातडीने दिली जात आहेत. सध्या दररोज ८० ते १०० प्रस्ताव येत आहेत, निर्गतीही त्याचगतीने सुरु असल्याचे उपायुक्त खुशाल गायकवाड म्हणाले.

मनुष्यबळाअभावी दाखले वितरणावर मर्यादा येत आहेत. तरीही व्यावसायिक अभ्यासक्रमासाठीच्या दाखल्यांना प्राधान्य दिले आहे. उमेदवारांच्या दाखल्यांचा विचार नंतर केला जाईल. निवडून आलेल्यांची यादी मिळताच त्यांच्या जातीची पडताळणी केली जाईल. त्यामुळे तूर्त उमेदवारांपेक्षा शैक्षणिक दाखल्यांकडे लक्ष आहे. कोरोनाविषयी काळजी घेत आहोत.

- खुशाल गायकवाड, उपायुक्त, समाजकल्याण

प्रशासनातर्फे दक्षता

कोरोनाच्या अनुषंगाने प्रशासनाने प्रवेशद्वारातच सॅनिटायझरची व्यवस्था केली आहे. सुरक्षारक्षक प्रत्येकाला सॅनिटायझर वापराची सूचना करतो. सोशल डिस्टन्सिंगसाठी मात्र गर्दीवर नियंत्रण राहिलेले नाही. वारंवार सूचना करुनही लोक ऐकत नसल्याचा अनुभव आहे.

रोज १५० अर्ज

निवडणूक व महाविद्यालयीन प्रवेश यामुळे सध्या दररोज सरासरी १५० अर्ज दाखल होत आहेत. त्यामध्ये भावी सरपंचांचे प्रस्ताव जास्त आहेत. शिक्षणासाठीचे त्रुटीविरहीत अर्ज तात्काळ निकाली काढले जात आहेत. चौकशी असेल तरच वेळ जात आहे.

निवडणूक झाल्यावरच

उमेदवारांकडून ऑनलाईन प्रस्ताव घेतले जात आहेत. त्याची एक प्रत समाजकल्याण कार्यालयात स्वीकारली जात आहे. उमेदवारी दाखल करताना तूर्त टोकन जोडावे लागेल. निवडून आलेल्या सदस्यांचीच जात पडताळणी केली जाईल. रोज ७० ते ८० अर्ज येत आहेत, पडताळणीचे प्रमाणपत्र मात्र सध्या दिले जात नाही.

--------