शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

काय चाललंय सांगलीत?

By admin | Updated: January 7, 2015 23:24 IST

सरकारनामा

विधानसभेचा निकाल लागून पावणेतीन महिने झाले. कृष्णा-वारणेच्या पुलाखालून बरंच पाणी गेलंय. येताना निम्मं पाणी वाळव्यात मुरलंय, तर बाकीचं पलूस-कडेगावमार्गे पार आटपाडीपर्यंत आणि म्हैसाळमार्गे कवठ्याच्या पुढं जतपर्यंत गेलंय. इलेक्शनमुळं आबांनी हिकमतीनं येरळा आणि अग्रणीलाही पाणी आणलं होतं (ते अजून टिकून आहे, बरं का!). सरकार बदललं आणि सांगलीतले तिन्ही लाल दिवे गेले. त्यामुळं सोनसळच्या साहेबांचा मुक्काम हल्ली पुण्यातच असतो. आबा आजारपणातनं बाहेर पडले तरी विश्रांतीसाठी मुंबईतच आहेत. इस्लामपूरचे साहेब मात्र सगळीकडं फिरताहेत. जरा गराडा कमी झालाय, पण क्रेझ कायम! त्यांच्या इशाऱ्यावर कमळाच्या पाकळ्या अजूनही हलतात. संजयकाकांपासून जगताप साहेबांपर्यंत सगळे भाजपेयी त्यांच्या ‘कॉन्टॅक्ट’मध्ये असतात. साहेबांची रसद होती म्हणूनच लोकसभेला संजयकाका आणि नंतर विधानसभेला ‘कमळा’बाईचे चारपैकी तीन शिलेदार निवडून आले! इस्लामपूरच्या साहेबांचा भाजपेयींशी (पक्षी : आताचा मोदी तंबू) तसा जुना घरोबा (आतून हं!). यंदा विधानसभेचं वारं फिरताच साहेबांचे कान हलू लागल्याचं बारामतीच्या थोरल्या साहेबांनी बरोब्बर हेरलं आणि इस्लामपूरकरांच्या मोदी तंबूकडं जायच्या वाटा रोखल्या.निकालानंतर नरेंद्रांच्या इशाऱ्यावर देवेंदजी सांगलीला एकतरी लाल दिवा देतील, असं वाटतं होतं. नाईक साहेबांच्या आणि मिरजेच्या खाडेंच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची बातमी पेरण्यात आली, पण इस्लामपूरचे साहेब आडवे आल्यानं नाईक साहेबांच्या नावावर फुली मारली गेली, तर कमळाबाईच्या अड्ड्यावर ऊठबस नसल्यानं खाडेंचं नाव यादीतनं गळलं. तेवढ्यात उसाच्या फडातून सदाभाऊंचं नाव पुढं आलं. (पण शेट्टींच्या राजूभार्इंनीच सदाभाऊंना लाल दिवा न देता नकाराची ‘लाल बत्ती’ दाखवली म्हणे! ‘मला नाही, तर तुलाही नाही...’ अशी हमरीतुमरी झाली म्हणे!) त्यातच ‘कमळा’बाईच्या अड्ड्यावर खाकी चड्डीतल्या मंडळींची वर्दळ वाढली आणि त्यांनी गाडगीळ सराफांनाही लाल दिव्याच्या शर्यतीत आणलं... मग काय, बट्ट्याबोळ झाला..! सांगलीकर अजून त्या लाल दिव्याकडं डोळं लावून बसलेत. दर शनिवार-रविवारी सांगलीकरांना लाल दिवे बघण्याची, सायरन ऐकण्याची सवय झालेली. आता चुकल्या-चुकल्यासारखं वाटतंय. काँग्रेस कमिटी, चौकातलं रेस्ट हाऊस आणि अण्णा भवन सुनंसुनं वाटतंय. काँग्रेस कमिटीशेजारच्या कार्यालयाचं कुलूप लोकसभेपासून अधूनमधून काढलं जातं. तिथं म्हणे कधी काळी (?) माजी केंद्रीय मंत्री बसत. ते असल्यावर दाखल्या-चिठ्ठ्यांसाठी माणसं यायची. हल्ली त्यांचा मुक्काम सांगलीपेक्षा पाचगणीत अधिक असतो म्हणे! (असं पृथ्वीराज पाटील परवा सोनसळच्या साहेबांच्या कानात सांगत होते.) घड्याळवाल्यांच्या कार्यालयाची तर पार रया गेलीय. आधीच कमळाबाईनं खुणावल्यानं दिनकरतात्या, घोरपडे सरकार, जगताप साहेब, पृथ्वीराजबाबा यांच्यासोबत तिसऱ्या फळीनंही संगत सोडलीय. त्यात सत्तेच्या दोऱ्या तुटल्यात. जिल्हा परिषद कशीबशी हातात राहिलीय. पक्षांतरबंदीनं सदस्य अडकून पडलेत म्हणून... नाहीतर ते कधीच भुर्रर्रर्रऽऽऽ झाले असते. कमळाबाईचा अड्डा मात्र गजबजू लागलाय. अर्थात त्याची जागा कधी राजवाडा चौकात, तर कधी टिळक चौकात, तर कधी विश्रामबाग चौकात असते. कमळाबाईचा अड्डा काकांमुळं ‘सुखरूप’ राहिलाय बरं का, अशी कुजबूज काकांच्या तालमीतून ऐकू येतेय. हल्ली काकांची भाषाही मधाळ झालीय. फुल्या-फुल्यांच्या शब्दांची (सांगायलाच हवेत का?) जागा ‘शिंच्याऽऽ’ वगैरे अनुनासिक उच्चारांनी घेतलीय म्हणे! जुन्यातले आणि नव्यातले तिघे-चौघे तात्या, नीताताई, पप्पूशेठ, कमळातला ‘मकरंद’ चाखण्यासाठी आसुसलेले मिरजकर, गरूडाचे पंख लावलेली जुनी मंडळी इनामदारांच्या वाड्यावर बसून महामंडळाची स्वप्ने बघण्यात दंग आहेत. त्यांची भरारी तेवढीच!ताजा कलम : सांगलीतल्या तमाम पक्ष कार्यालयांमध्ये हल्ली हमखास काही पोस्टर्स दिसताहेत. त्यावर लिहिलंय... ‘आपण यांना पाहिलंत का? ही व्यक्ती विधानसभा निवडणुकीपासून बेपत्ता आहे. ती कोणाला आढळल्यास मतदारांशी संपर्क साधावा.’ त्याखाली कडेपूरचे बाबा, खानापूर-आटपाडीतील टोपी आणि गोपी, अमरसिंहबापू, इस्लामपूरचे जितेंदर आणि चिकुर्ड्याचे अभिजितआबा, कवठ्याचे घोरपडे सरकार, सांगलीचे सांस्कृतिक अण्णा आणि मुन्नाभाई, मिरजेचे जाधव मास्तर आणि होनमोरे, शेंडग्यांचे प्रकाशअण्णा तथा माजी ‘आठवडा आमदार’ वगैरे मंडळींचे फोटो आहेत.- श्रीनिवास नागे