शहरं
Join us  
Trending Stories
1
एलओसीवर मोठ्या हालचाली! पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी अन् लष्कर ए तोयबाची जमवाजमव; कारस्थान रचण्यास सुरुवात
2
मदतीसाठी ‘आयएमएफ’च्या पाकिस्तानवर ११ नवीन अटी, भारतासोबत तणाव वाढल्यास उद्दिष्टपूर्ततेत धोके वाढण्याचा इशारा
3
"१० दिवसांपूर्वी पाकिस्तानला जाऊन आली,आता काश्मीरकडे..."; ज्योतीच्या हालचालींबद्दल आधीच आलेला संशय!
4
आजचे राशीभविष्य १९ मे २०२५ : वृश्चिकला आर्थिक लाभ, नशिबाची साथ...
5
पर्यटन क्षेत्राची स्थिती कोरोनापेक्षाही गंभीर, पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा काश्मीरला मोठा फटका
6
ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त वक्तव्य, प्राध्यापकाला अटक
7
Astro Tips: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी सोमवारी करा २ लवंगांचा सोपा उपाय; विसरून जाल सगळे अपाय!
8
 ‘किती’ जगलो, यापेक्षा ‘कसे’ जगलो हे महत्त्वाचे...
9
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
10
अवकाशातून अत्यंत स्पष्ट फोटो मिळाले असते, पण...; पृथ्वी निरीक्षण उपग्रह प्रक्षेपणाची मोहीम अयशस्वी
11
अबोल वेदना, गोंधळलेली मने : पुरुषांच्या मानसिक आरोग्याची वेळीच दखल घ्या! मानसोपचारतज्ज्ञांचे आवाहन
12
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
13
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
14
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
15
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
16
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
17
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
18
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
19
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
20
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा

राजेंद्रअण्णांचं उद्या काय होणार?

By admin | Updated: February 15, 2017 23:35 IST

जयंत पाटील : आटपाडी परिसरात राष्ट्रवादीच्या प्रचार सभा

आटपाडी : राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांचा जिल्ह्यात सर्वात जास्त विश्वास राजेंद्रअण्णा देशमुखांवर होता. अजित पवारांचा विश्वास अमरसिंहांवर होता. पण राजेंद्रअण्णांनी का पक्ष सोडला, हे फक्त त्यांनाच माहीत. माझे राजेंद्रअण्णांवर प्रेम आहे. त्यामुळे सत्तेसाठी भाजपत गेलेल्या अण्णांचे, जर उद्या हे सरकार पडले, तर काय होईल, याची मला काळजी असल्याची उपहासात्मक टीका माजी मंत्री जयंत पाटील यांनी येथे केली.राष्ट्रवादी उमेदवारांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांनी मंगळवारी सायंकाळी दिघंची येथील ग्रामपंचायत कार्यालयाजवळील चौकात आणि आटपाडीतील बाजार पटांगणात सभा घेतली. ते म्हणाले की, राजेंद्रअण्णांचा शब्द आपण कधी मोडला नाही. पण ज्या भाजपच्या नेत्यांमुळे येथील पाणीप्रश्न सुटू शकला नाही, ज्या देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांसह विधानसभेत पश्चिम महाराष्ट्र निधी दिला जाऊ नये यासाठी लेखी निवेदन दिले, विरोध केला, त्यामुळे टेंभू, ताकारी योजना पूर्ण होऊ शकल्या नाहीत, त्या पक्षात जाऊन राजेंद्रअण्णांनी काय साधले? राजेंद्रअण्णांवर माझे मोठ्या भावाप्रमाणे काल प्रेम होते, आज प्रेम आहे आणि उद्याही राहील. पण त्यांनी अचानक पक्ष बदलाचा निर्णय घेतल्याने आपल्याला खूप वाईट वाटले, दु:ख झाले आणि आता त्यांची काळजीही वाटते. कारण सत्तेत नाही, म्हणून त्यांनी भाजपत प्रवेश केला. शिवसेनेने जर २३ फेब्रुवारीनंतर सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि सरकार पडले, तर यांचे काय होईल?तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख म्हणाले, राजेंद्रअण्णांनी राष्ट्रवादी पक्ष सोडून भाजपत प्रवेश करुन विश्वासघात केला आहे. शेवटच्या दिवशी ११ वाजता अचानक त्यांनी पक्षाचे एबी फॉर्म माझ्या हातात दिले. अजिबात वेळ न मिळाल्याने राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार देऊ शकलो नाही. विश्वासघातांचे राजकारण करणाऱ्यांना या निवडणुकीत मतदार चांगलाच धडा शिकवेल. यावेळी माजी सभापती जयमाला देशमुख, राष्ट्रवादीचे दिघंची जि. प. गटाचे उमेदवार अतुल जावीर, दिघंची पंचायत समिती गणाच्या उमेदवार उषा कलाप्पा कुटे, निंबवडे गणाच्या उमेदवार ज्योती दीपक चाधव, आटपाडी जि. प. गटाचे उमेदवार सादीक खाटीक उपस्थित होते. (वार्ताहर)पडळकरांचं नेतृत्व : कपाळावर मारला हात!‘राजेंद्रअण्णांची गाडी आताच माझ्या गाडीपुढे होती. राष्ट्रवादीत असताना कधी त्यांनी गाडीवर पक्षाचा झेंडा लावला नाही. पण आता भाजपचा झेंडा लावला होता. आता तर गेलाय, कशाला एवढा मोठा झेंडा लावता?’ असे आ. पाटील म्हणताच, एकच हशा पिकला. ते पुढे म्हणाले, ‘गेलात ते गेलात, वर गोपीचंद पडळकरांच्या नेतृत्वाखाली गेलो म्हणता! काय हे?’ कपाळावर हात मारुन घेत ते पुढे म्हणाले, ‘निदान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली गेलो, असे तरी म्हणायचे. आता पुन्हा ते पक्षात आले, तर हणमंतराव देशमुख यांचे नेतृत्व त्यांना स्वीकारावे लागेल’.विश्वास गेला, देशमुखांच्या वाड्यात!लोक म्हणतात, विश्वास कुठे गेला? तर पानिपतच्या लढाईत गेला. पण हे आता बदलावे लागेल. आता लोक म्हणतील, विश्वास कुठे गेला? तर विश्वास राजेंद्रअण्णांच्या वाड्यात गेला... असा पक्षाचा विश्वासघात केला आहे, अशी टीका तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख यांनी केली.