शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
2
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
3
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
4
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
5
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
6
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
7
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
8
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
9
माझाही पक्ष आहे, भाजपाने विचारलेही नाही, राहुल गांधींनी सन्मानाची वागणूक दिली: महादेव जानकर
10
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
11
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
12
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
13
मॉकड्रिलमुळे ताज्या झाल्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या आठवणी; १९६५ आणि १९७१च्या युद्धावेळी काय घडलेलं?
14
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
15
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
16
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
17
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले
18
भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत LRAD यंत्रणा सज्ज, हल्ल्याची तात्काळ मिळणार सूचना
19
उशीर झाल्याने परीक्षा हुकली, नैराश्यातून विद्यार्थ्याचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांनी वाचवले प्राण
20
'राम तेरी गंगा मैली'मधील मंदाकिनीच्या भूमिकेसाठी 'रामायण'मधील सीतेनं दिलेलं ऑडिशन, पण...

शिक्षणमंत्री काय योगदान देणार?

By admin | Updated: October 13, 2015 23:52 IST

निरंजन डावखरे : माहिती अधिकारात तावडे केवळ आठवी उत्तीर्ण असल्याचे उघड

इस्लामपूर : राज्याचे शिक्षणमंत्री अभियांत्रिकीची पदवी घेतल्याचे सांगत असले तरी, आमच्या कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली असून, ते आठवी उत्तीर्ण आहेत. शिक्षणासारख्या क्षेत्रात ते काय योगदान करणार? असा सवाल युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ़ निरंजन डावखरे यांनी मंगळवारी केला. याचवेळी त्यांनी, राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून समाजाच्या प्रश्नावर लढा द्यावा, असे आवाहनही केले.येथे वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित ‘जयंत युवा आत्मभान’ शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ माजी मंत्री आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार मानसिंगराव नाईक, दिलीपतात्या पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, ताजुद्दीन तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी युवक कार्यकर्त्यांना हेल्मेट व वाहन परवान्याचे वितरण करण्यात आले.आ़ डावखरे म्हणाले की, युवकांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतेही ठोस धोरण सरकारकडे नाही. उलट आहे ते उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़.माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, सत्तेवर नाही याची मानसिकता तयार करा़ लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा़ जिल्हाध्यक्ष शरद लाड म्हणाले की, आपण विरोधी पक्षात असल्याने जबाबदारी वाढली असून आता लोकांच्या प्रश्नावर लढावे लागेल़ तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रामरावतात्या देशमुख, माणिकराव पाटील, पी़ आऱ पाटील, प्रा़ शामराव पाटील, विनायक पाटील, जगन्नाथ पाटील, विष्णुपंत शिंदे, देवराज पाटील, लिंबाजी पाटील, रवींद्र बर्डे, बी़ के. पाटील, बाळासाहेब पाटील, विजयबापू पाटील, आनंदराव पाटील, वैभव शिंदे, अ‍ॅड़ चिमण डांगे, शहाजी पाटील, विराज नाईक, संग्राम पाटील, राहुल पवार, रणजित पाटील, अनिल पाटील उपस्थित होते़ गोपाळ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले़, तर संभाजी पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)रस्त्यावर उतरा : लोकांसाठी लढा उभारायावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्यासह सर्वच वक्त्यांनी कार्यकर्त्यांना वास्तवाचे भान देण्याचा प्रयत्न केला. डावखरे म्हणाले, आपण सत्तेवर नाही, याचे भान ठेवा. लोकांचे प्रश्न समजून घ्या, त्यांच्यासाठी लढा उभारा. सत्तेशिवाय लोकसेवा करायची आहे, याची मानसिकता तयार करा. आपण विरोधी पक्षात असल्याने, सत्ता असताना असलेल्या जबाबदारीपेक्षा आताची जबाबदारी मोठी आहे. ‘मेक इन इंडिया’ म्हणजे निव्वळ भूलभुलैयाआ़ डावखरे म्हणाले की, भाजप पक्ष खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आला आहे. काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यावर १0-१५ लाख जमा करू, असे त्यांनी सांगितले़ ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली युवकांना खोटे स्वप्न दाखविले जात आहे़ निव्वळ भूलभुलैया सुरू आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतेही धोरण नाही़