शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्री काय योगदान देणार?

By admin | Updated: October 13, 2015 23:52 IST

निरंजन डावखरे : माहिती अधिकारात तावडे केवळ आठवी उत्तीर्ण असल्याचे उघड

इस्लामपूर : राज्याचे शिक्षणमंत्री अभियांत्रिकीची पदवी घेतल्याचे सांगत असले तरी, आमच्या कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकाराखाली माहिती घेतली असून, ते आठवी उत्तीर्ण आहेत. शिक्षणासारख्या क्षेत्रात ते काय योगदान करणार? असा सवाल युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ़ निरंजन डावखरे यांनी मंगळवारी केला. याचवेळी त्यांनी, राष्ट्रवादी युवकच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून समाजाच्या प्रश्नावर लढा द्यावा, असे आवाहनही केले.येथे वाळवा तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित ‘जयंत युवा आत्मभान’ शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ माजी मंत्री आमदार जयंत पाटील अध्यक्षस्थानी होते. माजी आमदार मानसिंगराव नाईक, दिलीपतात्या पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शरद लाड, ताजुद्दीन तांबोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी युवक कार्यकर्त्यांना हेल्मेट व वाहन परवान्याचे वितरण करण्यात आले.आ़ डावखरे म्हणाले की, युवकांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतेही ठोस धोरण सरकारकडे नाही. उलट आहे ते उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर आहेत़.माजी आमदार मानसिंगराव नाईक म्हणाले की, सत्तेवर नाही याची मानसिकता तयार करा़ लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा़ जिल्हाध्यक्ष शरद लाड म्हणाले की, आपण विरोधी पक्षात असल्याने जबाबदारी वाढली असून आता लोकांच्या प्रश्नावर लढावे लागेल़ तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी प्रास्ताविक केले. यावेळी रामरावतात्या देशमुख, माणिकराव पाटील, पी़ आऱ पाटील, प्रा़ शामराव पाटील, विनायक पाटील, जगन्नाथ पाटील, विष्णुपंत शिंदे, देवराज पाटील, लिंबाजी पाटील, रवींद्र बर्डे, बी़ के. पाटील, बाळासाहेब पाटील, विजयबापू पाटील, आनंदराव पाटील, वैभव शिंदे, अ‍ॅड़ चिमण डांगे, शहाजी पाटील, विराज नाईक, संग्राम पाटील, राहुल पवार, रणजित पाटील, अनिल पाटील उपस्थित होते़ गोपाळ पाटसुते यांनी सूत्रसंचालन केले़, तर संभाजी पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)रस्त्यावर उतरा : लोकांसाठी लढा उभारायावेळी आमदार निरंजन डावखरे यांच्यासह सर्वच वक्त्यांनी कार्यकर्त्यांना वास्तवाचे भान देण्याचा प्रयत्न केला. डावखरे म्हणाले, आपण सत्तेवर नाही, याचे भान ठेवा. लोकांचे प्रश्न समजून घ्या, त्यांच्यासाठी लढा उभारा. सत्तेशिवाय लोकसेवा करायची आहे, याची मानसिकता तयार करा. आपण विरोधी पक्षात असल्याने, सत्ता असताना असलेल्या जबाबदारीपेक्षा आताची जबाबदारी मोठी आहे. ‘मेक इन इंडिया’ म्हणजे निव्वळ भूलभुलैयाआ़ डावखरे म्हणाले की, भाजप पक्ष खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आला आहे. काळा पैसा देशात आणून प्रत्येकाच्या खात्यावर १0-१५ लाख जमा करू, असे त्यांनी सांगितले़ ‘मेक इन इंडिया’च्या नावाखाली युवकांना खोटे स्वप्न दाखविले जात आहे़ निव्वळ भूलभुलैया सुरू आहे. युवकांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतेही धोरण नाही़