शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

शेती अवजारांच्या साठ्याचे गौडबंगाल काय?

By admin | Updated: May 7, 2015 00:32 IST

अकरा लाखांचे साहित्य : आटपाडी तालुक्यात कृषी विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह; काळाबाजार चव्हाट्यावर

अविनाश बाड -आटपाडी : -शासनाने शेतकऱ्यांसाठी दिलेल्या मोटारींच्या ६२ संचांचा काळाबाजार करण्याचा कृषी विभागाचा प्रयत्न आता फसला आहे. मोटारींचे ६२ संच आलेले असताना, फक्त २० संच आल्याचे सांगून उर्वरित सुमारे १० लाख ५० हजार रुपये किमतीचे मोटारींचे ४० संच नेमके कुठे जाणार होते आणि ही रक्कम नेमकी कोणाच्या खिशात जाणार होती, असे प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत.आटपाडीतील कृषी विभागाचा भ्रष्ट कारभार, तालुक्यातील गरजू शेतकऱ्यांसाठी विहिरीतून पाणी उपसा करणाऱ्या आलेल्या मोटारींचे संच दडवादडवीतून स्पष्ट झाला आहे. जरी या विभागाकडे शेतकऱ्यांसाठी आलेले साहित्य ठेवण्यासाठी गोदाम उपलब्ध नसले तरी, ते आटपाडीपासून १० कि.मी. अंतरावर मुढेवाडी गावाच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याशी निर्जन ठिकाणी ठेवणे अपेक्षित नाही. शिवाय क्षणभर कृषी विभागाची बाबूंचे म्हणणे मान्य केले तरी, लाभार्थी शेतकऱ्यांना आटपाडीपासून १० कि.मी. दूर, जिथे कोणतेही छोटे वाहन जाणे मुश्किल आहे, त्याला भुर्दंड कशासाठी?, हा खरा प्रश्न आहे. सध्या सुमारे १२ लाख रुपयांचे साहित्य सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणतीही काळजी न घेता उघड्यावर ठेवले आहे. या साहित्याची चोरी झाली (किंवा दाखविली), तर कायदेशीर कारवाई काय व्हायची असेल ती होईल, पण शेतकरी या लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.आटपाडीतील कृषी विभागाचे कार्यालय सध्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीत भाड्याने आहे, पण ६२ मोटारी आणि त्यांचे साहित्य सुरक्षित ठेवता येईल, एवढी खोली अख्ख्या आटपाडीत मिळू शकत नाही, यावर कुणाचाच विश्वास बसणार नाही. आटपाडीतील अनेक ठिकाणच्या कुंपण घातलेल्या जागा आणि दुकानगाळे भाड्याने देणे आहेत, असे फलक अनेक ठिकाणी लावलेले असताना, कोणालाही समजणार नाही अशा निर्जन ठिकाणी हे साहित्य ठेवल्यामुळे ते काळ्याबाजारात विकले जाण्याची भीती तालुकावासीयांतून व्यक्त करण्यात येत आहे. याशिवाय प्रभारी कृषी अधिकारी आर. के. डोंबे हे जर फक्त मोटारींचे २० संच आल्याची माहिती ठामपणे वारंवार सांगत होते, तर मग त्यांनी मोटारींच्या संचांची संख्या जास्त का सांगितली नाही? यावरूनही कृषी विभागातील बाबू शेतकऱ्यांच्या अनुदानित मोटारींवर डल्ला मारणार होते, असा आरोप केला जात आहे. कृषी विभागात गोदाम नाही म्हणून थेट डोंगर-कपारीत मोटारी ठेवल्याचे सध्या उघड झाले आहे. मात्र या विभागाने शेतकऱ्यांसाठी आलेले आजपर्यंतचे कडबाकुट्टी यंत्र, इंजिन आदी साहित्य कुठे ठेवले आहे, त्याचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे काय, याची सखोल चौकशी होण्याची गरज आहे.मोटारींसह सर्व साहित्य तिथून आटपाडीत आणून सुरक्षित ठिकाणी ठेवणार आहे. दि. ३० एप्रिल रोजी हे साहित्य आले. कृषी विभागाकडे साहित्य ठेवण्यासाठी गोदाम नाही. त्यामुळे पर्यवेक्षक विलास चव्हाण यांच्या शेतात ते ठेवले आहे. किती साहित्य आले, याची माहिती न घेता आमच्या कर्मचाऱ्यांनी २० मोटारी आल्याचे सांगितले, पण आता गटविकास अधिकाऱ्यांकडून रोहयोतून विहिरी पाडलेल्या शेतकऱ्यांची यादी घेऊन ४-५ दिवसात साहित्याचे वाटप केले जाईल. - हणमंतराव होलमुखे, तालुका कृषी अधिकारी, आटपाडीकृषिमंत्र्यांना साकडेशासनाने दिलेल्या मोटारी, इंजिन, कडबाकुट्टी यंत्र, जलवाहिन्या आदी साहित्याचे वाटप आटपाडी तालुक्यातील शेतकऱ्यांना झालेले नाही. कृषी विभागातील अधिकारी ५ ते १० संच आल्याचे सांगून शेतकऱ्यांना परत पाठवितात. सध्या ६२ मोटारी आणि साहित्य उघड्यावर पडले आहे. आजपर्यंत जे साहित्य आले, ते गरजूंपर्यंत पोहोचलेले नसून त्यामध्ये मोठा घोटाळा झाला आहे. याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी कृषिमंत्री एकनाथ खडसे यांच्याकडे भाजपचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.