शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईवरील हल्ल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरून गुडघे टेकले? चिदंबरम यांच्या विधानावरून मोदींनी काँग्रेसला घेरले 
2
"त्या सरकारनं 'हे' कामच थांबवलं होतं, हे एखाद्या पापापेक्षा कमी नाही!", PM मोदी 'ठाकरे' सरकारवर बरसले
3
सैराटची पुनरावृत्ती! पाच भावांनी मिळून केली बहीण आणि भाओजींची हत्या, घरी बोलावले आणि...  
4
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
5
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या
6
नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन होताच CM फडणवीसांची मोठी घोषणा, म्हणाले, “आता चौथी मुंबई...”
7
पाकिस्तानची जिरवल्यावर कुणाला सुचली 'ती' भन्नाट आयडिया? वरुण चक्रवर्तीन शेअर केली त्यामागची स्टोरी
8
ऑटो क्षेत्र सुसाट! नवरात्रीदरम्यान दर तासाला 1,000 हून अधिक गाड्यांची विक्री
9
दि.बा. पाटलांचा उल्लेख, 'मविआ'वर टीकेचे बाण; PM मोदी नवी मुंबई विमानतळ उद्घाटनाच्या कार्यक्रमात काय म्हणाले?
10
निष्काळजीपणाचा बळी! इमारतीवरून वीट डोक्यात पडल्याने संस्कृतीचा करुण अंत, जोगेश्वरीतील घटनेने खळबळ
11
Nobel Prize: सुसुमू कितागावा, रिचर्ड रॉबसन आणि उमर याघी यांना रसायनशास्त्रातील नोबेल जाहीर
12
“पंतप्रधानांचा हात लागतो त्याचे सोने होते, नरेंद्र मोदी हे विकासाची आंधी”: DCM एकनाथ शिंदे
13
ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकत इतिहास रचला! त्या अमन सेहरावतला आखाड्यात उतरण्यावर बंदी; जाणून घ्या कारण
14
पुण्यातील विठ्ठल भक्तांवर पंढरपुरात हल्ला करणारे 'ते' तिघे कोण? वाद इतका विकोपाला का गेला?
15
पंतप्रधान मोदींच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन; मुंबई-पुणेकरांना मोठा दिलासा!
16
देशातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेनं दिलं खास दिवाळी गिफ्ट, आपल्याला कसा होणार फायदा? जाणून घ्या
17
प्रीमियम लूक, इंटीरियरमध्ये लक्झरी आणि स्पोर्टी टच; टोयोटा फॉर्च्यूनर लीडर भारतात लॉन्च!
18
रशियात शिकायला गेला आणि सैन्यात भरती झाला, अखेर युक्रेनी सैन्यासमोर सरेंडर, गुजराती तरुणासोबत काय घडलं? 
19
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता एकाच App मध्ये मिळणार बस, ट्रेन आणि मेट्रोचे तिकीट...
20
बॉलिवूड हादरलं! 'झुंड' फेम अभिनेत्याची निर्घृण हत्या, अर्धनग्नावस्थेत आढळला प्रियांशूचा मृतदेह

विशाल पाटील यांचा संबंधच काय?

By admin | Updated: February 4, 2017 00:04 IST

पतंगराव कदम; तो महान नेता, मी लहान आहे!

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मिरज वगळता इतर सर्व तालुक्यातील उमेदवारांची निश्चिती झाली आहे. उमेदवारांची नावे शेवटच्या दिवशीच जाहीर होतील. मिरज तालुक्याचा निर्णय प्रतीक पाटील व जयश्रीताई पाटील एकमताने घेतील. यात विशाल पाटील यांचा संबंधच काय? तो महान नेता आहे, मी लहान आहे, अशा शब्दात शुक्रवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी पत्रकार बैठकीत टोला लगावला.मिरज तालुक्यात वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष, काँग्रेसचे नेते विशाल पाटील राष्ट्रवादी काँग्रेसशी चर्चा करीत असल्याबद्दल विचारले असता डॉ. कदम म्हणाले की, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी काँग्रेसला जिल्ह्यात वातावरण चांगले आहे. काँग्रेसची स्वबळावर सत्ता येईल. मिरज वगळता सर्व तालुक्यांतील उमेदवारांची यादी एकमताने तयार झाली आहे. मिरजेबाबत प्रतीक पाटील व जयश्रीताई पाटील निर्णय घेणार आहेत. त्यांनी नावे अंतिम करून माझ्याकडे द्यायची आहेत. यात विशाल पाटील याचा संबंध येतोच कुठे? त्यामुळे तो कोणाशी चर्चा करतो, यावर मी कसे भाष्य करणार? गतवेळी मदन पाटील यांनी उमेदवारांची यादी दिली. तीच अंतिम करण्यात आली. मदन पाटील यांनी त्या उमेदवारांना निवडूनही आणले होते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.भाजप-शिवसेना सोडून इतर पक्षांशी आघाडी करण्याचे अधिकार स्थानिक पातळीवर देण्यात आले आहेत. खानापुरातील एक जागा राष्ट्रवादीला देण्यात आली आहे. शिराळ्यातील दोन जागा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला आहे. जतमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाला एक जागा दिली जाईल. बाकीच्या ठिकाणी काँग्रेस स्वबळावर लढणार आहे. काँग्रेसची यादी तयार असली तरी, सहा फेब्रुवारीपर्यंत हा घोळ सुरूच राहील. माघारीच्या दिवशीच खरे चित्र स्पष्ट होईल, असेही कदम यांनी सांगितले. पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा काँग्रेसमुक्त करण्याची घोषणा केली आहे. त्यावर कदम म्हणाले की, भाजपची ही घोषणा आम्ही दररोजच ऐकतो. देशातील प्रत्येक खेड्यात काँग्रेस रूजली आहे. तिला संपविणे इतके सोपे नाही. सत्ता येते आणि जाते, पण पक्ष संपत नाही. आगामी उत्तर प्रदेश व पंजाब विधानसभेच्या निवडणुका देशाच्या राजकारणासाठी ‘टर्निंग पॉर्इंट’ ठरतील.कडेगाव-पलूसमध्ये फरक पडणार नाहीपलूस-कडेगावमध्ये भाजप व राष्ट्रवादी एकत्र आले आहेत. गेल्या तीस वर्षांपासून मी हे बघत आलो आहे. मला आता त्याची सवय झाली आहे. या आघाडीचा काँग्रेसवर काहीही फरक पडणार नाही. नगरपालिका निवडणुकीत भाजपने सर्व मंत्री प्रचाराला आणले. अगदी शंभर कोटीचे पॅकेज देतो म्हणाले. पलूसमध्ये निकाल काय, तर राष्ट्रवादी शून्य, भाजप एक! राष्ट्रवादीने भाजप-सेना सोडून आघाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपशी आघाडी करणाऱ्यांना एबी फॉर्मही देणार नाही, असे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले होते. आता तेच काय तो निर्णय घेतील. विधानपरिषदेवेळी मोहनराव कदम यांच्या निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले होते. काय घडले, ते सर्वांनीच बघितले आहे, असेही कदम म्हणाले.