शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

आयात उमेदवारीमागचे गणित काय?

By admin | Updated: November 4, 2016 00:33 IST

पृथ्वीराज पाटील : धनदांडगेपणाचा राष्ट्रवादीचा आरोप हास्यास्पद

सांगली : काँग्रेसवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांनी ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करून आणण्यामागचे गणित लोकांसमोर मांडावे. त्यांच्याच पक्षातील एका नेत्याने राष्ट्रवादीतील तिकीट वाटपाचा पर्दाफाश केल्यामुळे राष्ट्रवादीचे खरे चित्र लोकांसमोर आले आहे, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, काँग्रेस उमेदवारावरील राष्ट्रवादी नेत्यांची टीका हास्यास्पद आहे. पक्षात तब्बल ३८ वर्षांहून अधिक काळ निष्ठेने काम केल्यामुळे मोहनराव कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. निष्कलंक, निष्ठावंत व सामाजिक भान असलेला नेता म्हणून त्यांची निवड पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीने गोरे यांची उमेदवारी जाहीर करताना असा कोणता निकष लावला होता?, याचे उत्तर द्यावे. राष्ट्रवादीमध्ये कशाप्रकारे उमेदवारी दिली जाते, याचा पोलखोल त्यांच्याच पक्षातील दिलीपतात्या पाटील यांनी केला होता. त्यामुळे आम्ही वेगळा आरसा दाखविण्याची गरज नाही. मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. आघाडीबाबतचा फॉर्म्युला १९९९ मध्येच निश्चित झाला असला तरी, तो राष्ट्रवादीने कितपत पाळला, याचाही विचार व्हायला हवा. संख्येने जास्त असूनही त्यांनी मित्रपक्ष म्हणून जागा सोडली असती, तर तो खरा आघाडीधर्म ठरला असता. आघाडीच्या चर्चा तडजोडीतूनच होत असतात. गतवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्यामागे काँग्रेसने पाळलेला आघाडीधर्मच कारणीभूत होता. त्यामुळे यंदा त्यांनी काँग्रेसला मदत करणे अपेक्षित होते. काँग्रेसनेच माघार का घ्यायची? उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी) उमेदवाराच्या गुन्ह्यांची माहिती कळाली राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आम्हाला त्यांच्यावर दाखल झालेल्या यापूर्वीच्या गुन्ह्यांची माहिती मिळाली. दहापेक्षा जास्त गुन्हे त्यांच्यावर दाखल झाल्याची माहिती आहे. काही गोष्टींबाबत आम्ही आक्षेपही नोंदविले होते, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली. उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांनाच असल्याने पक्षातील काहींनी उमेदवारी मागितली होती. मात्र आता अधिकृत उमेदवार जाहीर झाल्याने सर्वजण एकत्र येणार आहेत. नाराज असलेल्या लोकांशी चर्चा सुरू आहे. विधानपरिषदेची निवडणूक आम्ही एकसंधपणेच लढू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.