शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

आयात उमेदवारीमागचे गणित काय?

By admin | Updated: November 4, 2016 00:33 IST

पृथ्वीराज पाटील : धनदांडगेपणाचा राष्ट्रवादीचा आरोप हास्यास्पद

सांगली : काँग्रेसवर टीका करणाऱ्या राष्ट्रवादी नेत्यांनी ऐनवेळी दुसऱ्या पक्षातून उमेदवार आयात करून आणण्यामागचे गणित लोकांसमोर मांडावे. त्यांच्याच पक्षातील एका नेत्याने राष्ट्रवादीतील तिकीट वाटपाचा पर्दाफाश केल्यामुळे राष्ट्रवादीचे खरे चित्र लोकांसमोर आले आहे, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले की, काँग्रेस उमेदवारावरील राष्ट्रवादी नेत्यांची टीका हास्यास्पद आहे. पक्षात तब्बल ३८ वर्षांहून अधिक काळ निष्ठेने काम केल्यामुळे मोहनराव कदम यांना उमेदवारी मिळाली आहे. निष्कलंक, निष्ठावंत व सामाजिक भान असलेला नेता म्हणून त्यांची निवड पक्षाने केली आहे. राष्ट्रवादीने गोरे यांची उमेदवारी जाहीर करताना असा कोणता निकष लावला होता?, याचे उत्तर द्यावे. राष्ट्रवादीमध्ये कशाप्रकारे उमेदवारी दिली जाते, याचा पोलखोल त्यांच्याच पक्षातील दिलीपतात्या पाटील यांनी केला होता. त्यामुळे आम्ही वेगळा आरसा दाखविण्याची गरज नाही. मतदारांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीचे नेते करीत आहेत. आघाडीबाबतचा फॉर्म्युला १९९९ मध्येच निश्चित झाला असला तरी, तो राष्ट्रवादीने कितपत पाळला, याचाही विचार व्हायला हवा. संख्येने जास्त असूनही त्यांनी मित्रपक्ष म्हणून जागा सोडली असती, तर तो खरा आघाडीधर्म ठरला असता. आघाडीच्या चर्चा तडजोडीतूनच होत असतात. गतवेळी राष्ट्रवादीचा उमेदवार बिनविरोध निवडून येण्यामागे काँग्रेसने पाळलेला आघाडीधर्मच कारणीभूत होता. त्यामुळे यंदा त्यांनी काँग्रेसला मदत करणे अपेक्षित होते. काँग्रेसनेच माघार का घ्यायची? उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीपर्यंत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले. (प्रतिनिधी) उमेदवाराच्या गुन्ह्यांची माहिती कळाली राष्ट्रवादीच्या उमेदवाराने सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून आम्हाला त्यांच्यावर दाखल झालेल्या यापूर्वीच्या गुन्ह्यांची माहिती मिळाली. दहापेक्षा जास्त गुन्हे त्यांच्यावर दाखल झाल्याची माहिती आहे. काही गोष्टींबाबत आम्ही आक्षेपही नोंदविले होते, अशी माहिती पाटील यांनी यावेळी दिली. उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांनाच असल्याने पक्षातील काहींनी उमेदवारी मागितली होती. मात्र आता अधिकृत उमेदवार जाहीर झाल्याने सर्वजण एकत्र येणार आहेत. नाराज असलेल्या लोकांशी चर्चा सुरू आहे. विधानपरिषदेची निवडणूक आम्ही एकसंधपणेच लढू, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.