शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खंजीर खुपसणारा मित्र कसला ?

By admin | Updated: October 4, 2014 23:39 IST

नारायण राणे : राष्ट्रवादी म्हणजे जनमानसांत बदनाम झालेला पक्ष

सांगली : आमच्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा स्वाभाविक मैत्रीचा आव राष्ट्रवादी आणत आहे. त्यांची मैत्री स्वाभाविक नव्हे, तर स्वार्थी आहे. त्यांचा हा खेळ त्यांच्याच अंगाशी येणार आहे, असे मत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी आज, शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती असेल तर ती केव्हातरी समोर येणारच आहे. अशा गोष्टी लपत नाहीत. ती त्यांची जुनी सवय आहे. नांदायचे एकाशी आणि मैत्री दुसऱ्याशी, असा प्रकार ते करीत असतात. त्यामुळेच जनसामान्यांत बदनाम होण्यात राज्यात राष्ट्रवादी पुढे आहे. हा वादावादीचा पक्ष असल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ४० पेक्षा अधिक जागा मिळूच शकणार नाहीत. वादग्रस्त फायलींवर स्वाक्षऱ्या केल्याबद्दल आता अजित पवार बोलत आहेत. प्रत्यक्ष निर्णय होत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी तोंड का बंद केले होते? इतके दिवस गळ्यात गळे घालून ते काम करीत होते. आघाडी तुटल्याबरोबर अचानक त्यांना आमचा कारभार चुकीचा वाटू लागला आहे. त्यांचे हे द्वेषाचे राजकारण आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत आमची मुख्य लढत भाजपशी असेल. राष्ट्रवादीला ४० च्या पुढे जागा मिळणार नाहीत आणि शिवसेना साडेपंचवीस जागांची धनी असेल. राज्यातील वातावरण पाहता काँग्रेसलाच स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे खरे रूप आता लोकांसमोर आले आहे. त्यांच्या केंद्रातील कारभाराबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांनी जी आश्वासने निवडणूक काळात दिली, त्याच्या दिशेने त्यांची कोणतीही वाटचाल झालेली नाही. त्याउलट कारभार सुरू आहे. राज्यातील विरोधी पक्षाने गेल्या पाच वर्षांत त्यांची भूमिका योग्यरीत्या बजावली नाही. शिवसेनाही त्यात सहभागी असल्याने जनता आता काँग्रेसच्याच मागे आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)