शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
2
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
3
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
4
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
5
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
6
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
7
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
8
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
9
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
10
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
11
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
12
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
13
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू
14
केंद्राच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळात शशी थरूर यांचं नाव पाहून काँग्रेस अवाक्, व्यक्त केली अशी प्रतिक्रिया
15
IPL 2025 अंतिम सामन्यावरून मोठा गोंधळ; BCCIच्या 'या' निर्णयावर चाहते संतापले, नेमकं काय घडलं?
16
जबरदस्त! कंपनी असावी तर अशी, नफा होताच बोनस म्हणून दिली ७ महिन्यांची दिली सॅलरी
17
पुणे IED केस: ISIS साठी काम करणाऱ्या दोन जणांना NIA ने विमानतळावरून केली अटक
18
मनाविरुद्ध काही झालं की संताप होतो, चिडचिड होते? रागावर नियंत्रण मिळवण्याच्या ६ टिप्स
19
भयानक! तरुणाची स्टंटबाजी, वेगाने कार चालवून ४ जणांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
20
"ओशो आश्रमात गेल्यावर बाबांनी.."; अक्षय खन्नाचा मोठा खुलासा, विनोद खन्नांविषयी काय म्हणाला?

खंजीर खुपसणारा मित्र कसला ?

By admin | Updated: October 4, 2014 23:39 IST

नारायण राणे : राष्ट्रवादी म्हणजे जनमानसांत बदनाम झालेला पक्ष

सांगली : आमच्या पाठीत खंजीर खुपसून पुन्हा स्वाभाविक मैत्रीचा आव राष्ट्रवादी आणत आहे. त्यांची मैत्री स्वाभाविक नव्हे, तर स्वार्थी आहे. त्यांचा हा खेळ त्यांच्याच अंगाशी येणार आहे, असे मत काँग्रेसचे प्रचारप्रमुख नारायण राणे यांनी आज, शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. ते म्हणाले की, भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी युती असेल तर ती केव्हातरी समोर येणारच आहे. अशा गोष्टी लपत नाहीत. ती त्यांची जुनी सवय आहे. नांदायचे एकाशी आणि मैत्री दुसऱ्याशी, असा प्रकार ते करीत असतात. त्यामुळेच जनसामान्यांत बदनाम होण्यात राज्यात राष्ट्रवादी पुढे आहे. हा वादावादीचा पक्ष असल्याने यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना ४० पेक्षा अधिक जागा मिळूच शकणार नाहीत. वादग्रस्त फायलींवर स्वाक्षऱ्या केल्याबद्दल आता अजित पवार बोलत आहेत. प्रत्यक्ष निर्णय होत असताना मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी तोंड का बंद केले होते? इतके दिवस गळ्यात गळे घालून ते काम करीत होते. आघाडी तुटल्याबरोबर अचानक त्यांना आमचा कारभार चुकीचा वाटू लागला आहे. त्यांचे हे द्वेषाचे राजकारण आहे. राज्यात विधानसभेच्या निवडणुकीत आमची मुख्य लढत भाजपशी असेल. राष्ट्रवादीला ४० च्या पुढे जागा मिळणार नाहीत आणि शिवसेना साडेपंचवीस जागांची धनी असेल. राज्यातील वातावरण पाहता काँग्रेसलाच स्पष्ट बहुमत मिळण्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपचे खरे रूप आता लोकांसमोर आले आहे. त्यांच्या केंद्रातील कारभाराबाबत जनतेचा भ्रमनिरास झाला आहे. त्यांनी जी आश्वासने निवडणूक काळात दिली, त्याच्या दिशेने त्यांची कोणतीही वाटचाल झालेली नाही. त्याउलट कारभार सुरू आहे. राज्यातील विरोधी पक्षाने गेल्या पाच वर्षांत त्यांची भूमिका योग्यरीत्या बजावली नाही. शिवसेनाही त्यात सहभागी असल्याने जनता आता काँग्रेसच्याच मागे आहे, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)