शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

मिरज पश्चिम भागात ऊसतोडी रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST

कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भाग कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यामुळे उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी सुमारे १२ ...

कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भाग कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यामुळे उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी सुमारे १२ ते १५ हजार एकर क्षेत्रावर ऊस उत्पादन घेतले जाते. वेळेत ऊसतोडी न झाल्यामुळे उसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.

फडकरी, तोडणी वाहने आणि ट्रॅक्टरचालक यांच्या ‘बिदागी’ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

प्रतिवर्षीपेक्षा यावर्षी सगळ्याच साखर कारखान्यांकडे तोडणी टोळ्यात कमी मजूर आले. याचा मोठ्या प्रमाणावर फटका वाहनधारकांना बसला आहे. लाखोंच्या उचली देऊनही मजूर आले नाहीत. अवकाळी पावसामुळे हंगाम उशिरा सुरू झाला. ऊसतोडणी मशीनची संख्या कमी आहे. त्यातच यावेळी बाहेरील कारखाने तोडणीसाठी आले नाहीत. या सर्व प्रकारच्या गोष्टीमुळे ऊसतोडणी लांबलेल्या असल्याचे चित्र आहे.

तोड लांबल्याने थेट फटका ऊस उत्पादकांना बसत आहे. तुरे फुटल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ऊसतोडणी होऊन बिले कधी मिळणार, असा शेतकऱ्यांना प्रश्न भेडसावत आहेत. ऊसतोडी लांबल्यामुळे पीककर्ज कसे भरायचे, असाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाणीपुरवठा संस्थांच्या वसुलीवरही परिणाम होतो आहे. यामुळे एकंदरीत पाणीपुरवठा संस्था, सोसायटी आणि शेतकरी यांचे अर्थचक्र बिघडत आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.