शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पावरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

मिरज पश्चिम भागात ऊसतोडी रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST

कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भाग कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यामुळे उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी सुमारे १२ ...

कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भाग कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यामुळे उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी सुमारे १२ ते १५ हजार एकर क्षेत्रावर ऊस उत्पादन घेतले जाते. वेळेत ऊसतोडी न झाल्यामुळे उसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.

फडकरी, तोडणी वाहने आणि ट्रॅक्टरचालक यांच्या ‘बिदागी’ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

प्रतिवर्षीपेक्षा यावर्षी सगळ्याच साखर कारखान्यांकडे तोडणी टोळ्यात कमी मजूर आले. याचा मोठ्या प्रमाणावर फटका वाहनधारकांना बसला आहे. लाखोंच्या उचली देऊनही मजूर आले नाहीत. अवकाळी पावसामुळे हंगाम उशिरा सुरू झाला. ऊसतोडणी मशीनची संख्या कमी आहे. त्यातच यावेळी बाहेरील कारखाने तोडणीसाठी आले नाहीत. या सर्व प्रकारच्या गोष्टीमुळे ऊसतोडणी लांबलेल्या असल्याचे चित्र आहे.

तोड लांबल्याने थेट फटका ऊस उत्पादकांना बसत आहे. तुरे फुटल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ऊसतोडणी होऊन बिले कधी मिळणार, असा शेतकऱ्यांना प्रश्न भेडसावत आहेत. ऊसतोडी लांबल्यामुळे पीककर्ज कसे भरायचे, असाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाणीपुरवठा संस्थांच्या वसुलीवरही परिणाम होतो आहे. यामुळे एकंदरीत पाणीपुरवठा संस्था, सोसायटी आणि शेतकरी यांचे अर्थचक्र बिघडत आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.