शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

मिरज पश्चिम भागात ऊसतोडी रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST

कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भाग कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यामुळे उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी सुमारे १२ ...

कसबे डिग्रज : मिरज पश्चिम भाग कृष्णा आणि वारणा नदीच्या पाण्यामुळे उसाचे आगार म्हणून ओळखला जातो. दरवर्षी सुमारे १२ ते १५ हजार एकर क्षेत्रावर ऊस उत्पादन घेतले जाते. वेळेत ऊसतोडी न झाल्यामुळे उसाच्या उत्पादनावर त्याचा परिणाम झाला आहे.

फडकरी, तोडणी वाहने आणि ट्रॅक्टरचालक यांच्या ‘बिदागी’ यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.

प्रतिवर्षीपेक्षा यावर्षी सगळ्याच साखर कारखान्यांकडे तोडणी टोळ्यात कमी मजूर आले. याचा मोठ्या प्रमाणावर फटका वाहनधारकांना बसला आहे. लाखोंच्या उचली देऊनही मजूर आले नाहीत. अवकाळी पावसामुळे हंगाम उशिरा सुरू झाला. ऊसतोडणी मशीनची संख्या कमी आहे. त्यातच यावेळी बाहेरील कारखाने तोडणीसाठी आले नाहीत. या सर्व प्रकारच्या गोष्टीमुळे ऊसतोडणी लांबलेल्या असल्याचे चित्र आहे.

तोड लांबल्याने थेट फटका ऊस उत्पादकांना बसत आहे. तुरे फुटल्याने वजनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. ऊसतोडणी होऊन बिले कधी मिळणार, असा शेतकऱ्यांना प्रश्न भेडसावत आहेत. ऊसतोडी लांबल्यामुळे पीककर्ज कसे भरायचे, असाही प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. पाणीपुरवठा संस्थांच्या वसुलीवरही परिणाम होतो आहे. यामुळे एकंदरीत पाणीपुरवठा संस्था, सोसायटी आणि शेतकरी यांचे अर्थचक्र बिघडत आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.