शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

विहिरी, तलाव कोरडे ठणठणीत

By admin | Updated: February 24, 2016 00:45 IST

दुष्काळाची चाहूल : कवठेमहांकाळ तालुक्यातील स्थिती

जालिंदर शिंदे ल्ल घाटनांद्रेकवठेमहांकाळ तालुक्यातील लघुप्रकल्प तलावातील पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झाली असून अकरापैकी केवळ पाच तलावात मृतसंचय पाणीसाठा असून, एक तलाव कोरडा, तर उर्वरित पाच तलावांमध्ये केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चालू उन्हाळा तीव्र होण्याची शक्यता असून आतापासूनच तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.यावर्षाच्या अवर्षणाने तालुक्यातील विहिरी, बंधारे, ओढे, नाले कोरडे पडले असून कूपनलिकांनी तळ गाठला आहे. तलावात उपलब्ध असणारा पाणीसाठाही हळूहळू कमी होत चालला आहे. तालुक्यातील तीन तलावांमधील पाणीसाठा केवळ महिनाभर पुरेल इतकाच राहिला आहे. तसेच केवळ दोन तलावातीलच पाणी टिकून आहे. त्यामुळे चालू उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचीही परिस्थिती गंभीर बनणार आहे, असे चित्र आहे. तालुक्यातील अकरा तलावांपैकी लांडगेवाडी, लंगरपेठ, हरोली, दुधेभावी, घोरपडी या पाच तलावांमध्ये मृतसंचय पाणीसाठा आहे. बोरगाव तलाव कोरडा आहे, तर उर्वरित पाच तलावात कुची (३ टक्के), रायवाडी (३१ टक्के), नांगोळे (१८ टक्के), बंडगरवाडी (२३ टक्के), मध्यम प्रकल्प (बसाप्पावाडी - ५० टक्केपेक्षा कमी) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन चालू झाल्याने तालुक्यातील काही भागास लाभ होईल. परंतु तालुक्यातील बऱ्याचअंशी भाग अद्याप जलसिंचन योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे चालू उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पुढील तीन महिन्यांचा कालावधी कसा जाणार, तसेच शेती, पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचे काय होणार?, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरु आहे. काही भागात कोणत्याही जलसिंचन योजनांचा लाभ न मिळाल्याने तेथेही द्राक्ष व डाळिंब पिकाचे क्षेत्र मोठे आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीतही कमालीची घट झाली असून पावसाविना नैसर्गिकरित्या निर्माण होणारा चारा निर्माण न झाल्याने जनावरांचेही चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी चारा छावणी किंवा चारा डेपो सुरु करण्याची मागणी करु लागला आहे. शेतीतील उभे पीक जतन करण्यासाठी कूपनलिका खोदून नशीब अजमावण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकंदरीत दुष्काळाची छाया गडद बनली आहे. रब्बीबरोबर खरीपही वाया गेल्याने, तसेच चारा व पाणीसाठा नसल्याने त्याचा मोठा परिणाम दुग्ध व्यवसायावरही झाला आहे.