शहरं
Join us  
Trending Stories
1
छगन भुजबळ अचानक कसे चर्चेत आले? आज मंत्रिपदाची शपथ घेणार, असे जाहीर केले...
2
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण
3
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
4
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
5
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
6
१२ वर्षांनी मोठ्या अभिनेत्यासोबत बोहल्यावर चढणार सई, लग्नाची तारीखही केली जाहीर
7
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
8
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
9
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
10
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
11
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
12
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
13
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
14
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
15
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
16
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
17
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
18
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
19
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
20
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस

विहिरी, तलाव कोरडे ठणठणीत

By admin | Updated: February 24, 2016 00:45 IST

दुष्काळाची चाहूल : कवठेमहांकाळ तालुक्यातील स्थिती

जालिंदर शिंदे ल्ल घाटनांद्रेकवठेमहांकाळ तालुक्यातील लघुप्रकल्प तलावातील पाणीसाठ्यामध्ये कमालीची घट झाली असून अकरापैकी केवळ पाच तलावात मृतसंचय पाणीसाठा असून, एक तलाव कोरडा, तर उर्वरित पाच तलावांमध्ये केवळ २० टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे चालू उन्हाळा तीव्र होण्याची शक्यता असून आतापासूनच तीव्र उन्हाळ्याची चाहूल लागली आहे.यावर्षाच्या अवर्षणाने तालुक्यातील विहिरी, बंधारे, ओढे, नाले कोरडे पडले असून कूपनलिकांनी तळ गाठला आहे. तलावात उपलब्ध असणारा पाणीसाठाही हळूहळू कमी होत चालला आहे. तालुक्यातील तीन तलावांमधील पाणीसाठा केवळ महिनाभर पुरेल इतकाच राहिला आहे. तसेच केवळ दोन तलावातीलच पाणी टिकून आहे. त्यामुळे चालू उन्हाळ्यामध्ये पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचीही परिस्थिती गंभीर बनणार आहे, असे चित्र आहे. तालुक्यातील अकरा तलावांपैकी लांडगेवाडी, लंगरपेठ, हरोली, दुधेभावी, घोरपडी या पाच तलावांमध्ये मृतसंचय पाणीसाठा आहे. बोरगाव तलाव कोरडा आहे, तर उर्वरित पाच तलावात कुची (३ टक्के), रायवाडी (३१ टक्के), नांगोळे (१८ टक्के), बंडगरवाडी (२३ टक्के), मध्यम प्रकल्प (बसाप्पावाडी - ५० टक्केपेक्षा कमी) इतका पाणीसाठा शिल्लक आहे. म्हैसाळ योजनेचे आवर्तन चालू झाल्याने तालुक्यातील काही भागास लाभ होईल. परंतु तालुक्यातील बऱ्याचअंशी भाग अद्याप जलसिंचन योजनेपासून वंचित आहे. त्यामुळे चालू उन्हाळ्यात तालुक्यात पिण्याच्या पाण्याबरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होणार आहे. पुढील तीन महिन्यांचा कालावधी कसा जाणार, तसेच शेती, पिण्याच्या पाण्याबरोबर जनावरांच्या पाण्याचे काय होणार?, असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा आहे. कवठेमहांकाळ तालुक्यात पाण्यासाठी लोकांची भटकंती सुरु आहे. काही भागात कोणत्याही जलसिंचन योजनांचा लाभ न मिळाल्याने तेथेही द्राक्ष व डाळिंब पिकाचे क्षेत्र मोठे आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने भूजल पातळीतही कमालीची घट झाली असून पावसाविना नैसर्गिकरित्या निर्माण होणारा चारा निर्माण न झाल्याने जनावरांचेही चांगलेच हाल होत आहेत. त्यामुळे परिसरातील शेतकरी चारा छावणी किंवा चारा डेपो सुरु करण्याची मागणी करु लागला आहे. शेतीतील उभे पीक जतन करण्यासाठी कूपनलिका खोदून नशीब अजमावण्याचा प्रयत्न सुरु आहे. एकंदरीत दुष्काळाची छाया गडद बनली आहे. रब्बीबरोबर खरीपही वाया गेल्याने, तसेच चारा व पाणीसाठा नसल्याने त्याचा मोठा परिणाम दुग्ध व्यवसायावरही झाला आहे.