शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय बंद ठेवून प्रशासकांचे स्वागत

By admin | Updated: July 10, 2017 13:05 IST

वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळाचे स्वागत सोमवारी महाविद्यालय बंदने करण्यात आले.

ऑनलाइन लोकमत
सांगली, दि. 10 -  वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयाचे दैनंदिन कामकाज पाहण्यासाठी राज्य शासनाने नियुक्त केलेल्या प्रशासक मंडळाचे स्वागत सोमवारी महाविद्यालय बंदने करण्यात आले. वालचंदमधील सर्वच कार्यालये कुलुप बंद असल्याने प्रशासकांना संगणक लॅबमध्ये बैठक घ्यावी लागली. महाविद्यालयाचे संचालक जी. व्ही. परिशवाड यांच्यासह २५० प्राध्यापक व कर्मचा-यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली होती. दरम्यान, प्रशासक मंडळ महाविद्यालयात येणार असल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 
 
वालचंद महाविद्यालयाच्या मालकी हक्कावरून महाराष्ट्र टेक्निकल एज्युकेशन सोसायटी व अजित गुलाबचंद यांच्या व्यवस्थापन समितीमध्ये वाद सुरू आहे. गतवर्षी महाविद्यालयाचा ताबा घेण्यावरून दोन्ही गटात जोरदार वाद झाला होता. अखेर शनिवारी वालचंद महाविद्यालयावर शासनाकडून प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली. उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सहसंचालक प्रमोद नाईक, शासननियुक्त सदस्य मकरंद देशपांडे व आयसीसीआय दिल्लीचे प्रतिनिधी असे तीन सदस्यांची नेमणूक केली आहे. सोमवारी प्रमोद नाईक यांनी महाविद्यालयात प्राध्यापक, कर्मचा-यांची बैठक बोलवली होती. प्रशासक मंडळाकडून दैनंदिन कामकाजाही सुरूवात करण्यात येणार होती. पण या प्रयत्नांवर पाणी फिरले. 
 
प्रशासक नाईक, मकरंद देशपांडे सकाळी साडेनऊ वाजता वालचंद महाविद्यालयात दाखल झाले. त्यांचे स्वागत महाविद्यालय बंदने करण्यात आले. वालचंद महाविद्यालयाला शनिवारीच सुट्टी देण्यात आली होती. विशेष म्हणजे कोणता सण, जयंती, समारंभ नसताना महाविद्यालय बंद ठेवण्यात आले होते. संचालक परिशवाड, उपसंचालक पी. जी. कुलकर्णी यांच्यासह महाविद्यालयातील सर्व विभागाला कुलुप लावण्यात आली होती. महाविद्यालयाच्या आवारात शुकशुकाट होता. विद्यार्थी, प्राध्यापकांपेक्षा पोलिसांची संख्या अधिक होती. 
 
पोलीस उपाधीक्षक डॉ. दीपाली काळे, पोलीस निरीक्षक राजेंद्र मोरे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा महाविद्यालयात होता. त्यामुळे संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप आले होते. महाविद्यालयातील कार्यालये उघडी नसल्याने प्रशासक मंडळाला बैठक कुठे घ्यायची असा प्रश्न होता. अखेर संगणक विभागाची लॅब उघडण्यात आली. तिथेच प्रशासक नाईक व देशपांडे यांनी प्राध्यापक व कर्मचा-यांची बैठक घेतली. या बैठकीला ३५० प्राध्यापक व कर्मचा-यापैकी ९० ते १०० जणच उपस्थित होते. संचालक परिशवाड, पी. जी. कुलकर्णी यांच्यासह अडीचशे जणांनी बैठकीला दांडी मारली होती. 
 
बैठकीत मकरंद देशपांडे यांनी स्वागत करीत वालचंद’ला नावारुपाला आणण्यासाठी सर्वांचेच योगदान राहिले आहे. व्यवस्थापनबाबतच वाद न्यायालयात सुरू असल्याने शासनाने दैनदिंन कामकाज पाहण्यासाठी समिती स्थापन केली आहे. यापुढे प्रशासक मंडळ जो निर्णय घेईल त्याला सर्वांनी सहकार्य करावे. महाविद्यालयातील वातावरण कुटुंबासारखे ठेवावे, असे आवाहन केले.  नाईक यांनीही प्रशासक नियुक्तीमागची शासनाची भूमिका स्पष्ट करीत प्राध्यापक, कर्मचा-यांच्या अडचणी समजावून घेतल्या. यापुढे प्रशासक मंडळाच्यावतीने दैनंदिन कामकाज होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 
गैरहजरांना नोटीसा
प्रशासक मंडळाच्यावतीने बैठकीचे निमंत्रण संचालक, उपसंचालकांसह सर्व प्राध्यापक, कर्मचा-यांना देण्यात आले होते. तरीही संचालक परिशवाड यांच्यासह 250 जण गैरहजर होते. त्या सर्वांना नोटीसा काढून त्यांचा खुलासा मागविला जाईल. त्यानंतर उच्च व शिक्षण मंत्री विनोद तावडे, संचालक चंद्रशेखर ओक यांच्या निदर्शनास आणून त्यांच्या आदेशाने गैरहजर राहण्यावर पुढील कारवाई होईल, असे सहसंचालक नाईक यांनी स्पष्ट केले. 
 
मकरंद देशपांडे यांच्यावर जबाबदारी
प्रशासक मंडळात सहसंचालक प्रमोद नाईक, मकरंद देशपांडे व दिल्लीच्या एआयसीटीचे प्रतिनिधी आहेत. या मंडळाला महाविद्यालयाचे दैनदिंन कामकाज पहावे लागणार आहे. त्यात मकरंद देशपांडे हे स्थानिक असल्याने तेच दैनदिंन कामकाजात लक्ष घालतील. त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. भविष्यात गरज  भासल्यास कामकाजासंदर्भात विविध समित्याही स्थापन केल्या जातील, असेही नाईक यांनी सांगितले. 
 
विद्यार्थ्यांची गैरसोय
वालचंद महाविद्यालयाला अचानक सुट्टी दिल्याने विद्यार्थी, पालकांची गैरसोय झाली. सध्या डिप्लोमा, डिग्रीची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थी, पालक महाविद्यालयात आले, पण सुट्टी असल्याने त्यांच्यात नाराजी होती. काही विभागाच्या परिक्षाही सोमवारी होत्या. पण त्याबाबत संचालकांनी कोणतेच आदेश न दिल्याने परिक्षार्थींची कोंडी झाली होती. 
 
 
शासनाच्या निर्णयाची महाविद्यालयाला कल्पना दिली होती. कोणतेही कारण नसताना महाविद्यालयाला सुट्टी देण्यात आली. तसेच अनेकजण गैरहजरही राहिले. आज झालेल्या बैठकीची व सद्यस्थितीचा अहवाल शिक्षण संचालकांना पाठविणार आहोत. चौकशीअंती वरिष्ठांच्या निर्देश देतील, त्यानुसार पुढील कारवाई होईल. सध्या प्रशासक मंडळाने महाविद्यालयाच्या कामकाजाला सुरूवात केली आहे. - डॉ. प्रमोद नाईक, सहसंचालक, उच्च व तंत्र शिक्षण विभाग