शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

हवामानाच्या लहरीपणामुळे नागरिकांचे आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:06 IST

सांगली : कधी थंडी, कधी कडक ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी धुके अशा विचित्र व लहरी हवामानामुळे नागरिकांच्या ...

सांगली : कधी थंडी, कधी कडक ऊन, कधी ढगाळ वातावरण, तर कधी धुके अशा विचित्र व लहरी हवामानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असून, यामुळे ताप, सर्दी, खोकला, कणकण, घशामध्ये खवखव अशी लक्षणे असलेले रुग्ण आढळून येत आहेत. शहरात अगोदरच डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण असताना आता या जंतूसंसर्ग आजारांमुळे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान निर्माण झाले आहे.गेल्या पंधरवड्यापासून हळूहळू थंडी सुरू झाली आहे. तरीही अचानक ढगाळ वातावरण व तापमानातही वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात शहरासह काही भागात दाट धुक्याने वातावरण बदलले होते. पहाटेपासून सकाळी नऊपर्यंत धुक्याची झालर कायम होती. थंडी सक्रिय होईल, असे वाटत असतानाच पुन्हा पारा वाढू लागला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यातील काही भागात गारपिटीसह पाऊस होत असला तरी, त्याचा परिणाम जाणवत आहे.वाढत्या थंडीमुळे ताप, कणकण, सर्दी, डोकेदुखी, अंगदुखीची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. शासकीय रुग्णालयासह खासगी रुग्णालयात रुग्णांच्या तपासणीसाठी गर्दी होत आहे. शहरात गेल्या दोन महिन्यांपासून अगोदरच डेंग्यू, चिकुनगुन्या अशा आजारांनी थैमान घातले आहे. शहरातील उपनगरांमध्ये अजूनही डेंग्यूचे रुग्ण आढळून येत असून, ताप, कणकण अशी लक्षणे असलेल्या बहुतांश रुग्णांचा डेंग्यूचा रिपोर्ट ‘पॉझिटिव्ह’ आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच, महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत त्या त्या भागातील स्वच्छता व डेंग्यू रुग्णांची संख्या वाढू नये, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. वातावरणातील बदलांमुळे सध्या संसर्गजन्य तापाचे रुग्ण वाढले आहेत. एकाचवेळी घरातील अन्य सदस्यांना ही लक्षणे आढळून येत आहेत. वातावरणाचा लहरीपणा कमी येईपर्यंत याचा त्रास नागरिकांना सहन करावाच लागणार आहे.स्वाईन फ्लूचा धोका?सकाळी थंडी, दिवसभर ऊन आणि वातावरणातील बदलांमुळे स्वाईन फ्लूचा धोका वाढत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले. त्यामुळे आजारी असताना प्रवास करणे टाळावे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याबरोबरच ताप, सर्दीची लक्षणे दिसताच तातडीने उपचार घेणे आवश्यक आहे.अशी घ्या काळजीघरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष द्यावे. थंडीचा जोर वाढलेला असताना स्वेटर, कानटोपी, हातमोजे, पायात मोजे वापरावेत. थंड पदार्थ खाणे टाळावे. पिण्यासाठी उकळलेल्या पाण्याचा वापर करावा. घशात खवखव जाणवल्यास कोमट पाण्याने गुळणी करावी. सर्दी, खोकला, तापाची लक्षणे आढळून आल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.