शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 04:22 IST

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मंगळवारी शिवसैनिकांचा मेळावा झाला. यावेळी देसाई बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, नितीन बानुगडे-पाटील, माजी ...

ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मंगळवारी शिवसैनिकांचा मेळावा झाला. यावेळी देसाई बोलत होते. यावेळी आमदार अनिल बाबर, नितीन बानुगडे-पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती संजय सावंत, बजरंग पाटील, दिगंबर जाधव, हरिदास लेंगरे, महिला आघाडीप्रमुख सुवर्णा माेहिते, सुनीता माेरे, सुजाता इंगळे, शोभाताई गावडे आदी उपस्थित होते.

शंभुराज देसाई म्हणाले, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत अर्ज दाखल करावेत. प्रत्येक गावांमध्ये पक्षाची मजबूत बांधणी करण्याची मोठी संधी आहे. याचा पुढील जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि नगरपालिका निवडणुकीत फायदा होणार आहे. पक्ष वाढविताना शिवसैनिकांना कोण मुद्दाम त्रास देत असतील, तर त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. अनिल बाबर, अजितराव घोरपडे हे दिग्गज नेते पक्षात असून, त्यांच्या अनुभवाचा शिवसैनिकांनी फायदा करून घ्यावा.

नितीन बानुगडे-पाटील म्हणाले, ग्रामपंचायतींवर भगवाच फडकला पाहिजे, या जिद्दीने काम करा. पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेशिवाय भाजप शून्य आहे, हेच सिध्द झाले आहे. शिवसेना बरोबर असेल तर काय होते, याचा महाविकास आघाडीने अनुभव घेतला आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी ग्रामपंचायतीवर भगवा फडकवायचाच या जिद्दीने निवडणुका लढवाव्यात.

चौकट

कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर करा : घोरपडे

ग्रामपंचायत निवडणुकीत महाविकास आघाडी असणार की नाही, याबाबत कार्यकर्त्यांच्या मनात संभ्रम आहे. तो नेत्यांनी दूर केला पाहिजे. भाजपचे नटबोल्ट तर खिळखिळे झाले आहेतच. ग्रामपंचायत निवडणुका काँग्रेस, राष्ट्रवादी या मित्रपक्षांच्या विरोधातच होणार आहेत. यावरही पक्षप्रमुखांबरोबर बैठक घेऊन निर्णय घेण्याची गरज आहे, असे मत अजितराव घोरपडे यांनी व्यक्त केले.

चौकट

बिनविरोधसाठी विचार करा : बाबर

ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेची ताकद कमी असल्यामुळे बहुतांशी बिनविरोध ग्रामपंचायती करून तेथे शिरकाव केला पाहिजे. परिस्थितीनुसार प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये भूमिका बदलली पाहिजे, असे मत बाबर यांनी व्यक्त केले.