शहरं
Join us  
Trending Stories
1
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
2
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
3
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
4
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
5
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
6
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
7
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
8
'व्होट बँकेसाठी घुसखोरांना पाठीशी घालणाऱ्यांना...; बिहारच्या विजयानंतर अमित शाहांचा विरोधकांवर निशाणा
9
तेजस्वी यादवांची अखेरच्या क्षणी मते फिरली...! राघोपूरमध्ये मोठी आघाडी घेतली...
10
मोठी बातमी! सीएसएमटी स्थानकाबाहेर संशयित बॅग; पोलिस अलर्टवर
11
बिहार निवडणूक निकाल: एनडीएला प्रचंड बहुमत! तरीही 'राजद'ला अजूनही विजयाची आशा, नेमकी कशामुळे?
12
"ते आता कुठे टूर करताहेत?", पॉलिटिकल टूरिस्ट म्हणत रविशंकर प्रसाद यांचा राहुल गांधींवर हल्लाबोल
13
निकाल बिहारचा लागला आणि वाद महाविकास आघाडीत पेटला; ठाकरेंच्या नेत्याने सुनावले, काँग्रेसचा नेता भडकला
14
बिहार निकालाचा करिश्मा! बाजारात अखेरच्या तासात 'बुल्स रन'; 'या' क्षेत्रात मोठी वाढ, आयटीत मात्र विक्रीचा दबाव
15
पाकिस्तानातून भारतीय महिला अचानक झाली गायब! शोध घेताच समोर आलं धक्कादायक सत्य
16
IND vs SA 1st Test Day 1 Stumps: पहिला दिवस बुमराहनं गाजवला! आता तिसऱ्या क्रमांकावरील प्रयोगावर नजरा
17
बिहारमध्ये भाजपा नितीश कुमार यांचीच 'विकेट' काढणार? स्वत:चा CM बसवायला JDU गरजच नाही...
18
नीतीश कुमारांचं M अन् मोदींच्या Y समोर, तेजस्वींचं 'MY' समीकरण फेल; NDA साठी हे 2 फॅक्टर ठरले 'टर्निंग पॉइंट'!
19
2026 Prediction: २०२६ मध्ये 'या' ५ राशींवर शनीची वक्रदृष्टी; आर्थिक, मानसिक चिंता वाढणार
Daily Top 2Weekly Top 5

भीक मागून सरकार चालविण्यास पैसे देऊ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विटा : कोरोनाच्या महामारीमुळे दहावी व बारावीच्या परीक्षा राज्य शासनाने रद्द केल्या आहेत. मात्र, त्यापूर्वी लाखो ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विटा : कोरोनाच्या महामारीमुळे दहावी व बारावीच्या परीक्षा राज्य शासनाने रद्द केल्या आहेत. मात्र, त्यापूर्वी लाखो विद्यार्थ्यांचे करोडो रुपयांचे परीक्षा शुल्क भरून घेण्यात आले आहे. ते शुल्क विद्यार्थ्यांना शासनाने परत केले नाही. विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कावर जर राज्य शासन सरकार चालवत असेल तर मनसेच्यावतीने गावो-गावी भीक मागून पैसे जमा करून सरकार चालविण्यास देऊ, असा इशारा खानापूर तालुका विद्यार्थी सेनेच्यावतीने शिक्षण मंत्र्यांना देण्यात आला.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्र्यांनी दहावी व बारावीच्या परीक्षा कोरोनामुळे ऑनलाईन होणार असल्याचे सांगितले. या निर्णयावर पालक व विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला. वर्षभर ऑनलाईन शिक्षण दिल्यावर परीक्षा ऑफलाईन घेणार हा प्रश्न विद्यार्थी व पालकांच्या मनात उपस्थित झाला होता. काही दिवसातच सरकार व प्रशासन यांनी कोरोना संसर्ग वाढत असल्याने अशा कठीण परिस्थितीत परीक्षा घेणे योग्य नसल्याचे कारण सांगत परीक्षा रद्द केल्या आहेत. मात्र, दहावी व बारावी परीक्षेसाठी शासनाकडे विद्यार्थ्यांकडून जमा झालेली कोट्यवधी रुपयांची परीक्षा फी अद्याप परत दिली नाही. त्या परीक्षा फीवर शासन त्यांचे सरकार चालवित असेल तर मनसेच्यावतीने गावागावात जाऊन भीक मागून सरकारसाठी पैसे जमा केले जातील व ती जमा झालेली रक्कम सरकार चालविण्यास दिली जाईल, असा इशारा देण्यात आला.

याबाबतचे निवेदन मनसेचे तालुकाध्यक्ष साजीद आगा यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी सेनेच्यावतीने तहसीलदार ऋषीकेष शेळके यांना देण्यात आले. यावेळी सुजित पोद्दार, गणेश जाधव, विनोद कांबळे, अनिकेत साठे, सूरज तांबोळी, अपुल बुधावले उपस्थित होते.