शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र-कर्नाटक शासनाच्या समन्वयातून महापुरावर नियंत्रण ठेवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:19 IST

मिरज : पश्चिम महाराष्ट्राची संभाव्य महापुराच्या धोक्यापासून सुटका करण्यासाठी अलमट्टीतील पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याने आमदार सुरेश खाडे यांच्यासह ...

मिरज : पश्चिम महाराष्ट्राची संभाव्य महापुराच्या धोक्यापासून सुटका करण्यासाठी अलमट्टीतील पाण्यावर नियंत्रण ठेवण्याची गरज असल्याने आमदार सुरेश खाडे यांच्यासह भाजपच्या शिष्टमंडळाने बुधवारी अथणी येथे कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची भेट घेतली. राजकारण बाजूला ठेवून महाराष्ट्र व कर्नाटक सरकारच्या समन्वयातून ही समस्या सोडविण्याची हमी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी यावेळी दिली. संभाव्य महापुराबाबत कर्नाटक शासनाकडून सकारात्मक उपाययोजना करण्याचे आश्वासन खाडे यांना दिले.

कोरोनाचा सर्वाधिक फटका पश्चिम महाराष्ट्राला बसल्याने या भागातील अर्थकारण कोलमडले आहे. अशातच महापुराची आपत्ती उद्भवल्यास जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संभाव्य महापूर टाळण्यासाठी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा यांच्याशी चर्चा केली आहे. यानंतर आमदार सुरेश खाडे यांनी कर्नाटकचे उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांची भेट घेऊन समन्वय ठेवण्यासाठी चर्चा केली. महापुराबाबत कर्नाटक-महाराष्ट्र शासनाने समन्वयातून मार्ग काढण्यासाठी उपमुख्यमंत्री सवदी यांची भेट घेतल्याचे खाडे यांनी सांगितले.

ते म्हणाले, राज्यात महाआघाडी व कर्नाटकात भाजपचे शासन असल्याने राजकारण बाजूला ठेवून हा प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील यांना योग्य त्या सहकार्याची भूमिका घेऊ. शिवाय कर्नाटकातील शासनाबरोबर योग्य समन्वय राखण्यासाठीही आग्रही राहू. महापुराचा फटका बसणाऱ्या मतदारसंघाचा मी आमदार असल्याने महापूराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आग्रही राहणार आहे. नैसर्गिक आपत्तीचा सामना राजकारण बाजूला ठेवून करावा लागणार आहे. उपमुख्यमंत्री सवदी यांच्या भेटीतून महापूर टाळण्यासाठी योग्य मार्ग निघेल, अशी अशा आहे. सांगली जिल्ह्यात महापुराच्या पाण्यातून जत, कवठेमहांकाळ, आटपाडी या दुष्काळी भागांतील धरणे भरावीत यासाठीही पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे.

यावेळी भाजप अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस प्रा. मोहन वनखंडे, ॲड. विलास कौलगुड, सुहास कौलगुड, सागर वडगावे, विनायक बागडी उपस्थित होते.