शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

डोळसपणे पाहायला शिकविणारे शिक्षण हवे

By admin | Updated: December 29, 2015 00:56 IST

नागनाथ कोत्तापल्ले : सांगलीत तीनदिवसीय ग्रंथ महोत्सवाचे उद्घाटन

सांगली : वाचनातून जिज्ञासा निर्माण होते आणि जिज्ञासेतून प्रश्न निर्माण होतात. निर्माण झालेले प्रश्न विचारायला लावणारी आणि जगाकडे डोळसपणे पाहायला शिकविणारी शिक्षण पद्धती अस्तित्वात हवी, असे मत ज्येष्ठ साहित्यिक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी येथे व्यक्त केले. महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद व सांगली जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातर्फे राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत तीन दिवसांच्या ग्रंथ महोत्सवाचे आयोजन केले आहे. सांगलीतील सैनिक शाळेच्या सभागृहात सोमवारी याचे उद्घाटन कोत्तापल्ले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कोत्तापल्ले म्हणाले की, ठराविक विचारसरणीच्या लोकांना कोणीही प्रश्न विचारलेले चालत नाहीत. आम्ही सांगतो तेच खरे मानले पाहिजे, असे त्यांचे मत असते. प्रश्न विचारणे हा त्यांच्यादृष्टीने गुन्हा असतो. वास्तवात जगाच्या पाठीवर ज्यांनी-ज्यांनी प्रश्न विचारले, त्यांना ज्ञान प्राप्त झाले. मुलांनी शिक्षकांना प्रश्न विचारून हैराण केले पाहिजे. ही क्षमता प्राप्त करायची असेल, तर मुलांनी अन्य साहित्य वाचले पाहिजे. सध्याच्या शिक्षण पद्धतीत अनेक शिक्षकांना मुलांनी प्रश्न विचारलेले आवडत नाहीत. मुलांनी शांतपणे ऐकून केवळ शिक्षकांच्या सूचनेप्रमाणे कृती केलेली आवडते. मुलांच्या मनात प्रश्न निर्माण झाल्याशिवाय त्यांना खरे ज्ञान प्राप्तच होणार नाही. प्रश्न पडल्यामुळेच न्यूटन घडला, प्रश्न पडल्यानेच वाफेवरचे इंजिन निर्माण होऊ शकले. जगातील बहुतांशी संशोधनाचे मूळ हे प्रश्न निर्माण होण्यातच आहे. जगाकडे डोळे उघडून पाहायला शिकविणारी शिक्षण पद्धती असायला हवी. महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबार्इंनी शिक्षणाला सुरुवात केली नसती, तर आजचे चित्र वेगळे दिसले असते. स्त्रियांना शिक्षण का देता येत नाही, यासाठी धर्मग्रंथांचे दाखले त्यावेळचे लोक देत होते. तरीही जगाकडे डोळसपणे पाहिल्यानंतर फुलेंनी शिक्षणाला सुरुवात केली. ग्रंथांचा पसारा पाहिला, तर कोणत्याही व्यक्तीला त्याच्या संपूर्ण आयुष्यात सर्वच ज्ञान प्राप्त करता येत नाही. तरीही ग्रंथ वाचनातून काळावर आणि भौगोलिक स्थितीवर मात करता येते. एका पुस्तकातून हजारो वर्षांची सफर आपल्यास करता येते. दाही दिशांचे ज्ञान पुस्तकातून प्राप्त होऊ शकते. त्यामुळे ग्रंथांचे वाचन विद्यार्थ्यांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. गौतमीपुत्र कांबळे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी मधुकर यादव, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) नीशादेवी वाघमोडे, आबासाहेब शिंदे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी) भाषण थांबले... विद्यार्थी व शिक्षकांनी यावेळी मोठी गर्दी केली होती. कोत्तापल्ले यांच्या भाषणावेळी संपूर्ण सभागृह खचाखच भरले होते. शेवटी काही शाळांच्या मुलांना सभागृहातून ग्रंथ प्रदर्शन पाहण्यासाठी बाहेर नेण्यात आले. गर्दी वाढल्यामुळे काही वेळ कोत्तापल्ले यांना भाषण थांबवावे लागले. बैठक व्यवस्थेचे नियोजन पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुन्हा भाषणास सुरुवात केली.