शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच पाहिजेत!

By admin | Updated: August 7, 2014 00:20 IST

पर्यावरणप्रेमी भक्तांची मागणी : तीन वर्षांपासून सांगलीत राबविले जाताहेत उपक्रम; वेगवेगळ्या मूर्तींची निर्मिती

सांगली : मागील तीन वर्षापासून सांगलीत पर्यावरणपूरक अर्थात कागदाचा लगदा, खाण्याचा डिंक आणि कॅल्शिअम कार्बोनेट यांच्या मिश्रणातून गणेशमूर्ती तयार केल्या जात आहेत. विशेष म्हणजे, प्लॅस्टर आॅफ पॅरिसच्या काळातही पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना दिवसेंदिवस मागणी वाढत चालली आहे. आतापासूनच सूज्ञ सांगलीकरांनी पर्यावरणाला हानिकारक गणेशमूर्ती नाकारून ‘आम्ही, पर्यावरणपूरक गणेशमूर्तीचीच प्रतिष्ठापना करणार’ अशी आशादायक भूमिका घेतली आहे. शहरातील लुल्ला चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आभाळमाया फौंडेशन, अवनी फौंडेशन आणि रेड स्वस्तिक सोसायटी या सामाजिक संस्थांनी पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्माण करण्यास प्रारंभ केला. शहरवासियांना पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे महत्त्व पटवून सांगितले आणि गणेशभक्तांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. प्लॅस्टर आॅफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही. परिणामी गणेशमूर्तींचे ज्यावेळी विसर्जन होते, त्यावेळी या मूर्ती नदीपात्राच्या तळाशी जाऊन बसतात आणि पाण्याची पातळी वाढते. कालांतराने नदीकाठच्या नागरिकांनाच वाढीव पाण्याचा धोका संभवतो. पर्यावरणाची हानी होते ती वेगळीच. पर्यावरणपूरक गणेशमूर्ती मात्र पाण्यात विरघळतात. सध्या शहरात ९ इंच आणि १२ इंच अशा दोन आकारात आणि दगडूशेठ हलवाई गणेशाच्या रूपात गणेशमूर्ती उपलब्ध आहेत. ही गणेशमूर्ती दिवसातून एकच तयार होते. साधारणत: जानेवारीपासून पर्यावरणपूरक गणेशमूर्ती बनविण्यास सुरुवात होते. प्रामुख्याने सांगलीवाडीतील काही मूर्तिकार या गणेशमूर्तींची निर्मिती करतात. पर्यावरणाची हानी रोखायची असेल, तर त्याची सुरुवात आपल्यापासूनच केली पाहिजे. त्यासाठी पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या प्रतिष्ठापनेशिवाय दुसरा कोणता मार्ग आहे, असा विचार गणेशभक्त बोलून दाखवित आहेत. सामाजिक संस्थांनी केलेल्या जनजागृतीमुळेच गणेशभक्तांच्या मानसिकतेत बदल झाला आहे. गणेशोत्सव आता काही दिवसांवर येऊन ठेपला असल्यामुळे पर्यावरणपूरक गणेशमूर्तींचे आगाऊ बुकिंग सुरू झाले आहे. पर्यावरणपूरक गणेशमूर्तींना वाढती मागणी असली तरी, ती पूर्ण करण्याकरिता मूर्तिकार कमी पडत आहेत. हे चित्र पुढील गणेशोत्सवात बदलण्याचा निर्धार सामाजिक संस्थांनी केलेला आहे. (प्रतिनिधी)