शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

नवी सांगली वसवायलाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST

सांगली : महापुराच्या संकटातून कायमस्वरुपी बाहेर पडण्यासाठी नव्या सांगलीचा पर्याय आता विचारात घ्यायला हवा. शहराचे योग्यरितीने पुनर्नियोजन करण्याला आमचे ...

सांगली : महापुराच्या संकटातून कायमस्वरुपी बाहेर पडण्यासाठी नव्या सांगलीचा पर्याय आता विचारात घ्यायला हवा. शहराचे योग्यरितीने पुनर्नियोजन करण्याला आमचे प्राधान्य राहील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले, सहा गल्ल्यांची ही मूळ सांगली आहे. पूर्वी याठिकाणी पुराचा फटका बसत नव्हता. आता पुराच्या तडाख्यात नेहमी हे भाग येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेसह नवी सांगली वसविण्याविषयी विचार व्हायला हवा. तसा प्रस्ताव आल्यास निश्चित प्रयत्न केले जातील. सांगलीचे त्यादृष्टीने पुनर्नियोजन करण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत. यातून कायमस्वरुपी महापुराच्या नुकसानाचा प्रश्न निकालात काढला जाऊ शकतो.

जिल्ह्यातील जी गावे पूरग्रस्त आहेत किंवा ज्या वस्त्या सतत पाण्यात जात आहेत, त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याबाबतही आम्ही विचार करु. प्रत्येकवेळी जर याच गोष्टी घडणार असतील तर त्यातून मार्ग काढायलाच हवा.

प्रत्येक जिल्ह्यासाठी आता स्वतंत्र आपत्ती नियंत्रण व मदत विभाग स्थापन करण्यात येईल. यात एनडीआरएफच्या पथकाचा समावेश करण्याबाबतही विचार सुरु आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. पूरग्रस्त भागातील रस्ते, पूल यांची उंची वाढविण्याविषयी किंवा नवे रस्ते, पूल उभारताना पुराच्या पातळीचा विचार यापुढे निश्चितपणे केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

चौकट

पुलांच्या परिणामाचा अभ्यास करु

नद्यांमध्ये एकापेक्षा अधिक पूल उभे करुन टाकल्या जाणाऱ्या भरावामुळे महापुरात फुगवटा तयार होतो का, याबाबत अभ्यास करण्यात येईल. तज्ज्ञांशी चर्चा करुन त्याविषयी धोरण ठरवू, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

चौकट

गुंठेवारीचा कायदा सांगलीपुरता रद्द

नव्या गुंठेवारी नियमितीकरणाचा कायदा सांगली जिल्ह्यापुरता रद्द करण्यात येईल. यामुळे पूरपट्ट्यातील अतिक्रमणे वाढण्याची शक्यता असल्याने आपण निर्णय घेत आहोत, असे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.