शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नवी सांगली वसवायलाच हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:28 IST

सांगली : महापुराच्या संकटातून कायमस्वरुपी बाहेर पडण्यासाठी नव्या सांगलीचा पर्याय आता विचारात घ्यायला हवा. शहराचे योग्यरितीने पुनर्नियोजन करण्याला आमचे ...

सांगली : महापुराच्या संकटातून कायमस्वरुपी बाहेर पडण्यासाठी नव्या सांगलीचा पर्याय आता विचारात घ्यायला हवा. शहराचे योग्यरितीने पुनर्नियोजन करण्याला आमचे प्राधान्य राहील, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना दिली.

ते म्हणाले, सहा गल्ल्यांची ही मूळ सांगली आहे. पूर्वी याठिकाणी पुराचा फटका बसत नव्हता. आता पुराच्या तडाख्यात नेहमी हे भाग येत आहेत. त्यामुळे बाजारपेठेसह नवी सांगली वसविण्याविषयी विचार व्हायला हवा. तसा प्रस्ताव आल्यास निश्चित प्रयत्न केले जातील. सांगलीचे त्यादृष्टीने पुनर्नियोजन करण्यासाठी आम्ही प्राधान्य देणार आहोत. यातून कायमस्वरुपी महापुराच्या नुकसानाचा प्रश्न निकालात काढला जाऊ शकतो.

जिल्ह्यातील जी गावे पूरग्रस्त आहेत किंवा ज्या वस्त्या सतत पाण्यात जात आहेत, त्यांचे कायमस्वरुपी पुनर्वसन करण्याबाबतही आम्ही विचार करु. प्रत्येकवेळी जर याच गोष्टी घडणार असतील तर त्यातून मार्ग काढायलाच हवा.

प्रत्येक जिल्ह्यासाठी आता स्वतंत्र आपत्ती नियंत्रण व मदत विभाग स्थापन करण्यात येईल. यात एनडीआरएफच्या पथकाचा समावेश करण्याबाबतही विचार सुरु आहे. लवकरच त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. पूरग्रस्त भागातील रस्ते, पूल यांची उंची वाढविण्याविषयी किंवा नवे रस्ते, पूल उभारताना पुराच्या पातळीचा विचार यापुढे निश्चितपणे केला जाईल, असे त्यांनी सांगितले.

चौकट

पुलांच्या परिणामाचा अभ्यास करु

नद्यांमध्ये एकापेक्षा अधिक पूल उभे करुन टाकल्या जाणाऱ्या भरावामुळे महापुरात फुगवटा तयार होतो का, याबाबत अभ्यास करण्यात येईल. तज्ज्ञांशी चर्चा करुन त्याविषयी धोरण ठरवू, असे वडेट्टीवार यांनी सांगितले.

चौकट

गुंठेवारीचा कायदा सांगलीपुरता रद्द

नव्या गुंठेवारी नियमितीकरणाचा कायदा सांगली जिल्ह्यापुरता रद्द करण्यात येईल. यामुळे पूरपट्ट्यातील अतिक्रमणे वाढण्याची शक्यता असल्याने आपण निर्णय घेत आहोत, असे वडेट्टीवार यांनी यावेळी सांगितले.