शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
3
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
4
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
5
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
6
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
7
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
8
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
9
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
10
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
11
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
12
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
13
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
14
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
15
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
16
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
17
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
18
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
19
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
20
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."

आम्ही मुक्कामाला आलो नाही

By admin | Updated: March 10, 2016 01:18 IST

सदाभाऊ खोत : आम्ही चंद्रकांतदादांसारखे शरद पवारांना गुरू तर मानले नाही...

प्रश्न : गेली अनेक वर्षे संघर्षाचे निशाण फडकवून ज्यांच्यावर गंभीर आरोप केले त्याच अजित पवारांसोबत मांडीला मांडी लावून बसण्याची वेळ स्वाभिमानी शेतकरी संघटनेवर का आली ?उत्तर : पुण्यातील कार्यक्रम राजकीय नव्हता. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांना मदतवाटपाचा कार्यक्रम होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काढलेल्या ‘दिलासा यात्रे’तील कुटुंबांनाच यासाठी निवडण्यात आले होते. त्यामुळे आम्ही त्या कार्यक्रमाला उपस्थित होतो. राष्ट्रवादी नेत्यांच्या मांडीला मांडी लावण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठीच्या एका चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलो, याचे समाधान आहे. कार्यक्रमात आम्ही कोणाचेही कौतुक केले नाही. चंद्रकांतदादांनी जसे शरद पवारांना राजकीय गुरू मानले, तसे आम्ही कोणाला गुरू तरी मानलेले नाही. प्रश्न : तरीही मंत्रीपदासाठी हे दबावतंत्राचे राजकारण असल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. ही गोष्ट खरी आहे का?उत्तर : मंत्रीपदासाठी आणि वैयक्तिक स्वार्थासाठी आम्ही कधीच राजकारण केले नाही. सत्तेत असलो तरी सरकार ज्याठिकाणी चुकेल तिथे त्यांच्यावर आम्ही टीका करणार. सत्तेत असलो म्हणून स्वाभिमान गहाण टाकलेला नाही. यापुढेही तो टाकणार नाही. घटकपक्ष म्हणून आम्ही हात बांधून गप्प बसणार नाही. आम्ही मुक्कामाला आलो नाही. पुन्हा गावाकडे परत जायचे आहे. ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्या जिवावर आम्ही संघटना उभी केली आहे, त्यांना सर्व गोष्टींची उत्तरेही द्यायची आहेत. प्रश्न : मंत्रीपदासाठी तुम्ही प्रयत्नशील आहात का? उत्तर : घटकपक्षांना मंत्रिमंडळात समावून घेण्याचे भाजपने यापूर्वीच सांगितले आहे. त्यामुळे मंत्रीपद मिळाले तर ज्यांच्यासाठी इतका मोठा संघर्ष उभा केला, त्यांचे शासनदरबारी प्रतिनिधित्व करण्याची संधी या माध्यमातून मिळू शकते. तरीही मंत्रीपद मिळावे म्हणून आम्ही आक्रमक झालो नाही. ज्यावेळी सत्ता नव्हती त्यावेळीही आम्ही आक्रमकपणा दाखविला आहे. माझे मंत्रीपद हे शेतकरी व कष्टकऱ्यांसाठी असेल. मिरविण्यासाठी किंवा नावापुढे मंत्रीपद चिकटविण्यासाठी आम्ही धडपडत नाही. त्यामुळे मंत्रीपदासाठी राजकारण करण्याची आम्हाला गरज नाही. प्रश्न : पवारांसोबत तुम्ही उपस्थिती लावल्यामुळे तुमच्या निष्ठेबद्दल प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याचे काय?उत्तर : राजकीय नैतिकता आणि निष्ठा आम्हाला कुणी शिकविण्याची गरज नाही. गेल्या काही वर्षात सांगली जिल्ह्यासह राज्यातील अनेक राजकारण्यांच्या निष्ठा आम्ही जवळून पाहिल्या आहेत. किती निष्ठावंत शिल्लक आहेत, हा संशोधनाचा विषय आहे. आमची सुरुवात शेतकऱ्यांच्या प्रश्नापासून झालेली आहे. शर्टाला लावलेला बिल्ला सरणावर गेल्यानंतरही कायम राहणार आहे. त्यामुळे आमच्या निष्ठेची चिंता कुणी करू नये. निष्ठा आणि स्वाभिमानी जपल्यामुळेच आम्ही कोणत्याही गोष्टीवर आक्रमक होऊ शकतो. प्रश्न : तुमच्या मंत्रीपदाला स्थानिक नेत्यांचा विरोध असल्याचीही चर्चा आहे. तुमचा अनुभव काय आहे?उत्तर : पारंपारिक जहागिरदारी असणाऱ्या आणि तसे मानून राजकारण करणाऱ्या प्रस्थापितांना आमच्यासारखा गुरं राखणारा, वारसा नसणारा माणूस मंत्री झालेला चालणारच नाही. त्यांना या गोष्टी पाहवणार नाहीत. त्यांना चांगले कधीच वाटणार नाही. तरीही अशा लोकांच्या सांगण्यावरून मंत्रीपद डावलण्याइतका भाजप हा अपरिपक्व पक्ष नाही. पक्षावर आणि विशेषत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे. मंत्रीपद मिळाले नाही, तरी आमच्या वागण्यात बदल होणार नाही. आघाडी सरकारपेक्षा आजही हे सरकार आम्हाला बरे वाटते. तरीही ज्याठिकाणी चुकीच्या गोष्टी घडतील त्याठिकाणी संघर्षाचे निशाण फडकविले जाईल. माझ्या या भूमिकेला राजू शेट्टी यांचा सह्याद्रीसारखा पाठिंबा आहे. - अविनाश कोळीस्वाभिमानी शेतकरी संघटनेने आजवर ज्यांच्याविरोधात संघर्ष केला त्याच राष्ट्रवादी पक्षाचे नेते अजित पवार यांच्यासोबत पुण्यातील कार्यक्रमात संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत एकत्र आल्याने राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ माजली आहे. सत्तेतील घटकपक्ष असूनही खोत यांनी सरकारविरोधी सूर आळवल्याने त्यांच्या भूमिकेविषयी उलटसुलट चर्चा रंगली आहे. संघटनेची याबाबतची भूमिका, निष्ठा आणि नैतिकतेवरून उपस्थित होत असलेले प्रश्न या सर्व गोष्टींवर सदाभाऊ खोत यांच्याशी साधलेला हा थेट संवाद....