शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सोनी परिसरातील गावे संघर्षाच्या वाटेवर

By admin | Updated: July 14, 2014 00:34 IST

नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनताच आंदोलनामध्ये आघाडीवर

सोनी : म्हैसाळ कालव्याच्या पाण्यासाठी सोनीसह परिसरातील वंचित गावे पुन्हा एकदा संघर्षाच्या वाटेवर आहेत. शेतीला पाणी दिल्याशिवाय मतदान करणार नाही, असा इशारा आंदोलनातून देण्यात आला आहे. नेत्यांपेक्षा सर्वसामान्य जनताच आंदोलनामध्ये आघाडीवर असल्याने पाण्याचा हा संघर्ष चांगलाच पेटण्याची चिन्हे आहेत.सोनीसह आजूबाजूच्या परिसरातील भोसे, करोली (एम), पाटगाव, सिध्देवाडी, रसूलवाडी, साबरवाडीसह बारा गावे पाण्यासाठी गेल्या २० वर्षांहून अधिक काळापासून मागणी करत आहेत; पण या भागाकडे नेहमी दुर्लक्षच होत गेल्याची खंत ग्रामस्थांच्या मनात आहे. कालव्याचे पाणी शेतीला मिळाल्यास येथील शेती सुजलाम सुफलाम होईल, या आशेने प्रत्येक निवडणुकीमध्ये येथील जनतेने पाणी देण्याचे आश्वासन देणाऱ्या नेत्याच्या गळ्यात विजयाची माळ टाकली आहे. पण जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. जनतेचा संघर्ष कायम राहिला आहे. ठिबक सिंचनवर शेकडो एकर द्राक्षशेती पिकवणाऱ्या या भागातील शेतकऱ्याने पाण्यासाठी ऐन उन्हाळ्यात एका एकरासाठी हजारो रुपये खर्च केले आहेत. एका हंगामात लाखो रुपयांचे पाणी विकत घेऊन द्राक्षशेती पिकवली आहे. शासनाची वाट न पाहता काही मोजक्याच शेतकऱ्यांनी पाणी उपलब्ध असलेल्या ठिकाणावरून भरमसाठ पैसे खर्च करून पाणी योजना केल्या आहेत. त्याचा खर्च आजही लाखो रुपयांच्या घरात आहे; पण पाऊस नसल्याने तेथे ही पाणी मिळणे मुश्कील झाले आहे. म्हैसाळ कालव्यातील डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेतून जर पाणी मिळाले तर या भागातील जनतेची पाण्यासाठीची भटकंती थांबेल, ही आशा मनात बाळगून सर्वसामान्य जनतेनेच येणाऱ्या निवडणुकीमध्ये काहीही झाले, तर मतदान करायचे नाही, असा निर्धार केला असून, त्याला मोठ्याप्रमाणात जनतेने पाठबळ दिल्याने पाण्याचा हा संघर्ष येणाऱ्या निवडणुकीत नेत्यांना सतावणार आहे, हे निश्चित. (वार्ताहर)