शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेत तांबट व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2019 00:00 IST

सदानंद औंधे । लोकमत न्यूज नेटवर्क मिरज : एकेकाळी शेकडो कारागीर असलेल्या मिरजेत आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच तांब्या, पितळेची ...

सदानंद औंधे ।लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : एकेकाळी शेकडो कारागीर असलेल्या मिरजेत आता हाताच्या बोटावर मोजण्याएवढेच तांब्या, पितळेची भांडी घडविणारे तांबट या नावाने ओळखले जाणारे कारागीर शिल्लक राहिले आहेत. महागाईमुळे स्टील व प्लास्टिकच्या भांड्यांचा वापर वाढल्याने तांबट बेरोजगार झाले आहेत. तांबा-पितळेच्या भांड्यांची क्रेझ पुन्हा वाढत असताना तांबट व्यवसाय बंद पडण्याच्या मार्गावर आहे.मिरजेत कमानवेस परिसरात तांबट मंडळींचा भांडी ठोकण्याचा आवाज सर्वांनाचा परिचयाचा होता. तांबा, पितळ व अ‍ॅल्युमिनियमची भांडी हाताने ठोकून कारागीर घडवित असत. ऐरणीवर पातेले, घागर, हंडा यासह मोठ्या आकाराची भांडी ठोकून चमकविण्यात येतात. भांड्यावर घणाचे, हातोडीचे घाव घालून भांडे घडविण्याचे काम खरोखर कष्टाचे आहे. कारखान्यातून तयार केलेली भांडी घडविण्यासाठी कारागीरांकडे येतात.तांबा व पितळ हे धातू स्वस्त असताना मिरजेतील कारागीरांचा व्यवसाय जोमात होता; मात्र गेल्या दशकात तांबा व पितळेची किंमत वाढल्याने पातेले, घागर, हंडा अशा भांड्यांची मागणी कमी झाली. स्टील व प्लास्टिकच्या स्वस्त भांड्यांचा वापर वाढल्याने तांबट कारागीरांच्या व्यवसायावर संक्रांत आली आहे.तांबा व पितळ या धातूची किंमत प्रतिकिलो सहाशे रुपयांवर गेली आहे. यामुळे दोन हजार ते दहा हजार रुपये किमतीची तांबा, पितळेची भांडी परवडत नसल्याने, स्टीलच्या स्वस्त भांड्यांचा, अ‍ॅल्युमिनिअमच्या मोठ्या भांड्यांचा वापर होत आहे. गरीब कुटुंबांमध्ये प्लास्टिक घागरींचा वापर होतो. त्यामुळे काम अत्यल्प उरल्याने तांबट कारागीरांचा व्यवसाय संपला आहे. मिरजेतील कमानवेस परिसरात आता केवळ चारच कारागीर शिल्लक आहेत. तांब्या-पितळेच्या भांड्यांना कल्हई करणारा तर मिरजेत एकच कारागीर आहे.बेरोजगार झालेले अनेक कारागीर औद्योगिक वसाहतीत कामाला जात आहेत. कारागीरांची मुलेही परंपरागत व्यवसायाऐवजी अन्य व्यवसाय करीत आहेत. सुमारे ३० ते ४० वर्षे तांबट काम करणारे कारागीर आजही हलाकीत जगत आहेत. तांबट कारागीरांना शासनाकडून मदतीची अपेक्षा कारागीर फिरोज बैरागदार व महंमदहनिफ पठाण यांनी व्यक्त केली.तक्रारीमुळेही अडचणी!चहाच्या दुकानात पितळेच्या भांड्यांचा वापर सुरू झाल्याने पुन्हा तांबा-पितळेच्या भांड्यांची क्रेझ निर्माण होत आहे. मात्र तांबा, पितळेची भांडी घडविणारे कारखाने व कारागीर मोठ्याप्रमाणात असलेल्या कर्नाटकातील नसलापूर या गावातून भांडी तयार होऊ लागल्याने स्थानिक कारागीरांच्या हाताला काम उरलेले नाही. भांडी ठोकण्याच्या आवाजाबद्दल होणाऱ्या तक्रारींमुळेही हा व्यवसाय अडचणीत आला आहे.