शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
2
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
3
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
4
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
5
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
6
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
7
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
8
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
9
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
10
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
11
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
12
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
13
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
14
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
15
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
16
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
17
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
18
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
19
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
20
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?

जिल्ह्यात राष्ट्रवादी संपण्याच्या मार्गावर

By admin | Updated: February 19, 2017 23:15 IST

पतंगराव कदम : अनेक तालुक्यांमधील अस्तित्व संपले

सांगली : आटपाडी, पलूस, कडेगाव, खानापूर अशा अनेक तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी अस्तित्वशून्य बनली आहे. त्यांचा पक्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका आ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, तडजोडीच्या राजकारणाने राष्ट्रवादीचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही अनेक ठिकाणी सोयीच्या आघाड्या त्यांनी केल्या. भाजप व शिवसेनेसोबत आघाडी न करण्याची भूमिका कॉँग्रेससह राष्ट्रवादीनेही स्वीकारली होती. तरीही बऱ्याच तालुक्यात त्यांनी भाजपबरोबर आघाडी केल्याचे दिसत आहे. पक्षाच्या चिन्हावर सर्वाधिक जागा सध्या कॉँग्रेसमार्फत लढविल्या जात आहेत. अन्य पक्षांची स्थिती याउलट आहे. या आघाड्यांचे नेमके काय होणार, याचे उत्तर निकालादिवशी मिळणारच आहे. त्याशिवाय नोटाबंदी आणि भाजप सरकारविरोधात लोकांमध्ये काय भावना आहे, त्याचीही चाचणी या निवडणुकीतून होणार आहे. राष्ट्रवादीने घेतलेले सर्व निर्णय स्थानिक पातळीवरच झाले आहेत. पलूस, कडेगाव येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकही सदस्य निवडून आला नाही. जयंत पाटील यांच्याशिवाय आता निर्णय घेणारा नेता राष्ट्रवादीत दुसरा कोणीही नाही. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा स्थानिक पातळीवरील निर्णयाशी काहीही संबंध नाही. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला यश मिळेल. सत्तेपर्यंत आम्ही निश्चित जाऊ. जिल्ह्यात सर्वत्र आम्ही प्रचार केला आहे. त्याठिकाणी लोकांचा प्रतिसाद पाहूनच या गोष्टीचा अंदाज आम्हाला आला आहे. भाजपच्या पदरात काय पडणार आहे, हे निकालादिवशी सर्वांना कळेल. लोकांमध्ये भाजपच्या निर्णयांबद्दल सुप्त संताप आहे. त्याचे पडसाद आता उमटत आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गुंडांची यादी प्रसिद्धच झाली आहे...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही नकार देत असले तरी, त्यांच्या पक्षात किती गुंड आहेत, याची यादीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आम्ही त्याविषयी काही सांगण्याची गरज नाही. पाच राज्यांच्या निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतून भाजपला त्यांच्याबद्दलची लोकभावना कळेल. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले. ंजगताप अपघाताने आमदार झाले!विलासराव जगताप हे अपघाताने आमदार झाले आहेत. सेंटीमीटरची पट्टी घेऊन ते हिमालय मोजण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचे जातीवादी राजकारण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लोकच त्यांना योग्यवेळी उत्तर देतील, असे कदम म्हणाले. घटस्फोट झालाच आहेमुंबई महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत टोकाचा संघर्ष सुरू आहे. त्यांचा घटस्फोट झालेलाच आहे. केवळ समझोत्यासाठी नवरा-बायकोस जशी सहा महिन्यांची मुदत मिळते, तशीच मुदत या दोन्ही पक्षांना मिळाली आहे, असे कदम म्हणाले. राष्ट्रवादीने फसविलेज्याच्या जागा जास्त, त्याचा अध्यक्ष, असे धोरण राज्यातील सर्व संस्थांमध्ये ठरले होते. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत हे सूत्र स्वीकारण्यास राष्ट्रवादीने नकार दिला आणि कॉंग्रेसला फसविले. आगामी काळात आघाडीची वेळ आली तरीही जागांच्या संख्येवर पदांचे वाटप करण्याला आमचे प्राधान्य राहील, असे कदम म्हणाले.