शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसीय भारत दौऱ्याची सांगता, पुतिन रशियाला जाण्यासाठी रवाना; PM मोदींचे मानले विशेष आभार
2
‘मतचोरी’विरोधात काँग्रेसची रॅली; मातोश्रीवर येऊन दिले निमंत्रण, उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार?
3
“४० वर्षीय तरुणाला लाजवणारी कार्यक्षमता, २०२९ ला मोदीच PM असतील”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“इतर पक्ष कसे चालावे हेही देवाभाऊ ठरवतात, सर्वांचे राजकीय गुरू”; भाजपा नेत्यांनी केले कौतुक
5
बाबासाहेबांचा मूलमंत्र आजही मार्गदर्शक; ‘भीम ज्योत’चे एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
6
भारतात अनेकदा आले, पण पुतिन पाकमध्ये एकदाही का गेले नाहीत?; जाणकारांनी केला मोठा खुलासा
7
मंदिराने ठेवलेली एफडी बँकांना हडपायची होती, सर्वोच्च न्यायालय म्हणाले, ती देवाची संपत्ती...
8
नाताळ, थर्टीफर्स्टपर्यंत तरी इंडिगोची सेवा सुरु होणार का? CEO पीटर एल्बर्स म्हणाले, 'या' तारखेपर्यंत सेवा पूर्ववत होईल
9
सिगारेट, पान मसाला महागणार! तो पैसा देशाच्या सुरक्षेसाठी, कारगिल सारख्या संकटात वापरला जाणार, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा
10
पुतिन यांच्या सन्मानार्थ राष्ट्रपती भवनात स्टेट डिनरचे आयोजन; राहुल-खरगे नाही, थरुरांना निमंत्रण
11
'वैभव'शाही वर्ष! १४ वर्षांच्या पोरानं MS धोनी-विराटला मागे टाकत सेट केला आपला ट्रेंड
12
"इम्रान खान 'वेडा', त्याची विधाने देशाविरोधी अन् चिथावणीखोर"; पाकिस्तान आर्मीचा मोठा दावा
13
Vladimir Putin India Visit : नाकावर टिच्चून! "भारताला इंधन पुरवठा सुरूच राहणार", पुतिन यांनी स्पष्टच सांगितलं; PM मोदींचीही रशियासाठी मोठी घोषणा
14
IND vs SA वनडेआधी मोठी दुर्घटना टळली, फॅन्सच्या गर्दीमुळे होती चेंगराचेंगरीची भीती (VIDEO)
15
पुतिन यांचा दौरा सुफल, भारत अन् रशियात ७ मोठे अन् महत्त्वाचे करार; पंतप्रधान मोदी म्हणाले...
16
Indigo Crisis: भावाचा मृत्यू, मृतदेह कोलकात्यात; कुटुंबीय विमान रद्द झाल्याने मुंबईत अडकले...
17
“मशिदीला आक्षेप नाही, धार्मिक कारणांसाठी मंदिरे तोडली नाहीत”; शंकराचार्य नेमके काय म्हणाले?
18
एका व्यक्तीने स्वत:ची 'पावर' वापरून इंडिगोला १०० विमाने मिळवून दिलेली; एक वाद अन् आज तोच सोबत नाही...
19
Viral Video : 'क्या खूब लगती हो...'; गाण्यावर रील बनवताना घसरून धपकन पडली महिला, व्हिडीओ बघून लोक म्हणाले-
20
उर्मिला मातोंडकरसोबत जास्त सिनेमे, दोघांचं होतं अफेअर? राम गोपाल वर्मांनी सोडलं मौन; म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात राष्ट्रवादी संपण्याच्या मार्गावर

By admin | Updated: February 19, 2017 23:15 IST

पतंगराव कदम : अनेक तालुक्यांमधील अस्तित्व संपले

सांगली : आटपाडी, पलूस, कडेगाव, खानापूर अशा अनेक तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी अस्तित्वशून्य बनली आहे. त्यांचा पक्ष आता संपण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका आ. पतंगराव कदम यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, तडजोडीच्या राजकारणाने राष्ट्रवादीचे नुकसान झाले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतही अनेक ठिकाणी सोयीच्या आघाड्या त्यांनी केल्या. भाजप व शिवसेनेसोबत आघाडी न करण्याची भूमिका कॉँग्रेससह राष्ट्रवादीनेही स्वीकारली होती. तरीही बऱ्याच तालुक्यात त्यांनी भाजपबरोबर आघाडी केल्याचे दिसत आहे. पक्षाच्या चिन्हावर सर्वाधिक जागा सध्या कॉँग्रेसमार्फत लढविल्या जात आहेत. अन्य पक्षांची स्थिती याउलट आहे. या आघाड्यांचे नेमके काय होणार, याचे उत्तर निकालादिवशी मिळणारच आहे. त्याशिवाय नोटाबंदी आणि भाजप सरकारविरोधात लोकांमध्ये काय भावना आहे, त्याचीही चाचणी या निवडणुकीतून होणार आहे. राष्ट्रवादीने घेतलेले सर्व निर्णय स्थानिक पातळीवरच झाले आहेत. पलूस, कडेगाव येथील नगरपंचायतीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचा एकही सदस्य निवडून आला नाही. जयंत पाटील यांच्याशिवाय आता निर्णय घेणारा नेता राष्ट्रवादीत दुसरा कोणीही नाही. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचा स्थानिक पातळीवरील निर्णयाशी काहीही संबंध नाही. जिल्हा परिषदेत सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला यश मिळेल. सत्तेपर्यंत आम्ही निश्चित जाऊ. जिल्ह्यात सर्वत्र आम्ही प्रचार केला आहे. त्याठिकाणी लोकांचा प्रतिसाद पाहूनच या गोष्टीचा अंदाज आम्हाला आला आहे. भाजपच्या पदरात काय पडणार आहे, हे निकालादिवशी सर्वांना कळेल. लोकांमध्ये भाजपच्या निर्णयांबद्दल सुप्त संताप आहे. त्याचे पडसाद आता उमटत आहेत, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)गुंडांची यादी प्रसिद्धच झाली आहे...मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कितीही नकार देत असले तरी, त्यांच्या पक्षात किती गुंड आहेत, याची यादीच प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे आम्ही त्याविषयी काही सांगण्याची गरज नाही. पाच राज्यांच्या निवडणुका आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतून भाजपला त्यांच्याबद्दलची लोकभावना कळेल. हे सरकार फार काळ टिकणार नाही, असे कदम यांनी स्पष्ट केले. ंजगताप अपघाताने आमदार झाले!विलासराव जगताप हे अपघाताने आमदार झाले आहेत. सेंटीमीटरची पट्टी घेऊन ते हिमालय मोजण्याचा प्रयत्न करीत होते. त्यांचे जातीवादी राजकारण आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. लोकच त्यांना योग्यवेळी उत्तर देतील, असे कदम म्हणाले. घटस्फोट झालाच आहेमुंबई महापालिका ही सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे. त्यामुळे याठिकाणी सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप आणि शिवसेनेत टोकाचा संघर्ष सुरू आहे. त्यांचा घटस्फोट झालेलाच आहे. केवळ समझोत्यासाठी नवरा-बायकोस जशी सहा महिन्यांची मुदत मिळते, तशीच मुदत या दोन्ही पक्षांना मिळाली आहे, असे कदम म्हणाले. राष्ट्रवादीने फसविलेज्याच्या जागा जास्त, त्याचा अध्यक्ष, असे धोरण राज्यातील सर्व संस्थांमध्ये ठरले होते. मागील निवडणुकीत जिल्हा परिषदेत हे सूत्र स्वीकारण्यास राष्ट्रवादीने नकार दिला आणि कॉंग्रेसला फसविले. आगामी काळात आघाडीची वेळ आली तरीही जागांच्या संख्येवर पदांचे वाटप करण्याला आमचे प्राधान्य राहील, असे कदम म्हणाले.