शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

घाटमाथ्यावर बागा नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:22 IST

जालिंदर शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांद्रे : दुष्काळामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर द्राक्षबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सधन शेतकरी ...

जालिंदर शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांद्रे : दुष्काळामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर द्राक्षबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सधन शेतकरी टॅँकरने पाणी आणून द्राक्षबागा जतन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही शेतकऱ्यांवर पाण्याविना बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे. सध्या बºयाच बागांचे पाण्याविना केवळ सांगाडेच शिल्लक राहिल्याचे चित्र दिसत आहे.दुष्काळाने तलाव, ओढे, विहिरी, नाले, बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. कुची वगळता या पट्ट्यात कोठेही जलसिंचन योजनेचे पाणी आले नाही. घाटमाथ्याला वरदान ठरणाºया टेंभू योजनेंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेनेही मंद रूप धारण केले आहे. बळीराजाने आजअखेर कशाबशा बागा जगविल्या. त्यासाठी मोठा कर्जाचा डोंगरही उभा केला. या पट्ट्यातील सर्व शेती ही पावसावर अवलंबून असून, यावर्षी तर वरुणराजाने पाठ फिरविल्याने आजअखेर कोणताही जलस्रोत या भागात उपलब्ध झालेला नाही.सध्या या परिसरात सुमारे ४०० एकर द्राक्ष शेतीची नोंद आहे. तीही हळूहळू घटू लागली आहे. अनेकांनी बागा सोडून दिल्या आहेत. बºयाचजणांनी या बागांवर कुºहाड चालवली आहे; तर काही सधन शेतकरी बागा जतन करण्यासाठी टॅँकरच्या पाण्याचा आधार घेत आहेत. टॅँकरच्या पाण्यासाठी कुठलेही अनुदान अथवा सवलत दिली जात नाही. त्याची संपूर्ण तरतूद शेतकºयालाच करावी लागते. त्यामुळे त्याला यासाठी आता आर्थिक कसरत करावी लागत आहे.घाटनांद्रेत चारा छावणीची मागणीसततच्या दुष्काळाने, त्यातच यावर्षी वरुणराजाने अगदीच पाठ फिरविल्याने घाटमाथ्यावर भीषण टंचाई निर्माण झाली असून, नैसर्गिक चाराच निर्माण न झाल्याने व खरीप व रब्बी पेरा वाया गेल्याने चारा टंचाई जाणवू लागली आहे. या भागात चारा छावणी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, कुंडलापूर, वाघोली, जाखापूर व कुची परिसरात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यातच पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनावरे जतन करणे बळीराजाला कसरतीचे ठरत आहे. प्रत्येक गावाने ग्रामसभेत ठराव घेऊन तीन-चार महिन्यांपूर्वीच चारा छावणीचे प्रस्ताव दिले आहेत. ते शासनदरबारी धूळ खात आहेत. शासनाने तर मागेल त्या ठिकाणी चारा छावणी देण्याचे आदेश दिल्याने, या पट्ट्यात तात्काळ चारा छावणी सुरू करण्याची मागणी बळीराजा करत आहे.