शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

घाटमाथ्यावर बागा नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:22 IST

जालिंदर शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांद्रे : दुष्काळामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर द्राक्षबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सधन शेतकरी ...

जालिंदर शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांद्रे : दुष्काळामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर द्राक्षबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सधन शेतकरी टॅँकरने पाणी आणून द्राक्षबागा जतन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही शेतकऱ्यांवर पाण्याविना बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे. सध्या बºयाच बागांचे पाण्याविना केवळ सांगाडेच शिल्लक राहिल्याचे चित्र दिसत आहे.दुष्काळाने तलाव, ओढे, विहिरी, नाले, बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. कुची वगळता या पट्ट्यात कोठेही जलसिंचन योजनेचे पाणी आले नाही. घाटमाथ्याला वरदान ठरणाºया टेंभू योजनेंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेनेही मंद रूप धारण केले आहे. बळीराजाने आजअखेर कशाबशा बागा जगविल्या. त्यासाठी मोठा कर्जाचा डोंगरही उभा केला. या पट्ट्यातील सर्व शेती ही पावसावर अवलंबून असून, यावर्षी तर वरुणराजाने पाठ फिरविल्याने आजअखेर कोणताही जलस्रोत या भागात उपलब्ध झालेला नाही.सध्या या परिसरात सुमारे ४०० एकर द्राक्ष शेतीची नोंद आहे. तीही हळूहळू घटू लागली आहे. अनेकांनी बागा सोडून दिल्या आहेत. बºयाचजणांनी या बागांवर कुºहाड चालवली आहे; तर काही सधन शेतकरी बागा जतन करण्यासाठी टॅँकरच्या पाण्याचा आधार घेत आहेत. टॅँकरच्या पाण्यासाठी कुठलेही अनुदान अथवा सवलत दिली जात नाही. त्याची संपूर्ण तरतूद शेतकºयालाच करावी लागते. त्यामुळे त्याला यासाठी आता आर्थिक कसरत करावी लागत आहे.घाटनांद्रेत चारा छावणीची मागणीसततच्या दुष्काळाने, त्यातच यावर्षी वरुणराजाने अगदीच पाठ फिरविल्याने घाटमाथ्यावर भीषण टंचाई निर्माण झाली असून, नैसर्गिक चाराच निर्माण न झाल्याने व खरीप व रब्बी पेरा वाया गेल्याने चारा टंचाई जाणवू लागली आहे. या भागात चारा छावणी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, कुंडलापूर, वाघोली, जाखापूर व कुची परिसरात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यातच पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनावरे जतन करणे बळीराजाला कसरतीचे ठरत आहे. प्रत्येक गावाने ग्रामसभेत ठराव घेऊन तीन-चार महिन्यांपूर्वीच चारा छावणीचे प्रस्ताव दिले आहेत. ते शासनदरबारी धूळ खात आहेत. शासनाने तर मागेल त्या ठिकाणी चारा छावणी देण्याचे आदेश दिल्याने, या पट्ट्यात तात्काळ चारा छावणी सुरू करण्याची मागणी बळीराजा करत आहे.