शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

घाटमाथ्यावर बागा नष्ट होण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 23:22 IST

जालिंदर शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क घाटनांद्रे : दुष्काळामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर द्राक्षबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सधन शेतकरी ...

जालिंदर शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्कघाटनांद्रे : दुष्काळामुळे कवठेमहांकाळ तालुक्यातील घाटमाथ्यावर द्राक्षबागा नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सधन शेतकरी टॅँकरने पाणी आणून द्राक्षबागा जतन करण्याचा प्रयत्न करीत आहेत, तर काही शेतकऱ्यांवर पाण्याविना बागा काढून टाकण्याची वेळ आली आहे. सध्या बºयाच बागांचे पाण्याविना केवळ सांगाडेच शिल्लक राहिल्याचे चित्र दिसत आहे.दुष्काळाने तलाव, ओढे, विहिरी, नाले, बंधारे कोरडे ठणठणीत पडले आहेत. कुची वगळता या पट्ट्यात कोठेही जलसिंचन योजनेचे पाणी आले नाही. घाटमाथ्याला वरदान ठरणाºया टेंभू योजनेंतर्गत घाटनांद्रे उपसा जलसिंचन योजनेनेही मंद रूप धारण केले आहे. बळीराजाने आजअखेर कशाबशा बागा जगविल्या. त्यासाठी मोठा कर्जाचा डोंगरही उभा केला. या पट्ट्यातील सर्व शेती ही पावसावर अवलंबून असून, यावर्षी तर वरुणराजाने पाठ फिरविल्याने आजअखेर कोणताही जलस्रोत या भागात उपलब्ध झालेला नाही.सध्या या परिसरात सुमारे ४०० एकर द्राक्ष शेतीची नोंद आहे. तीही हळूहळू घटू लागली आहे. अनेकांनी बागा सोडून दिल्या आहेत. बºयाचजणांनी या बागांवर कुºहाड चालवली आहे; तर काही सधन शेतकरी बागा जतन करण्यासाठी टॅँकरच्या पाण्याचा आधार घेत आहेत. टॅँकरच्या पाण्यासाठी कुठलेही अनुदान अथवा सवलत दिली जात नाही. त्याची संपूर्ण तरतूद शेतकºयालाच करावी लागते. त्यामुळे त्याला यासाठी आता आर्थिक कसरत करावी लागत आहे.घाटनांद्रेत चारा छावणीची मागणीसततच्या दुष्काळाने, त्यातच यावर्षी वरुणराजाने अगदीच पाठ फिरविल्याने घाटमाथ्यावर भीषण टंचाई निर्माण झाली असून, नैसर्गिक चाराच निर्माण न झाल्याने व खरीप व रब्बी पेरा वाया गेल्याने चारा टंचाई जाणवू लागली आहे. या भागात चारा छावणी सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. घाटनांद्रे, तिसंगी, गर्जेवाडी, कुंडलापूर, वाघोली, जाखापूर व कुची परिसरात पशुधन मोठ्या प्रमाणात आहे. चारा व पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. त्यातच पशुखाद्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे जनावरे जतन करणे बळीराजाला कसरतीचे ठरत आहे. प्रत्येक गावाने ग्रामसभेत ठराव घेऊन तीन-चार महिन्यांपूर्वीच चारा छावणीचे प्रस्ताव दिले आहेत. ते शासनदरबारी धूळ खात आहेत. शासनाने तर मागेल त्या ठिकाणी चारा छावणी देण्याचे आदेश दिल्याने, या पट्ट्यात तात्काळ चारा छावणी सुरू करण्याची मागणी बळीराजा करत आहे.