शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

पाण्याचे होणार आॅडिट --राजेंद्र मोहिते :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्यातील पाणी प्रकल्प, सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून, पाणी वापर व उत्पन्न यात तफावत आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारीही दाखल केली जाईल, अशी माहिती जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.मोहिते म्हणाले की, राज्यातील ३०८ ...

ठळक मुद्देदंड व फौजदारी दाखल करण्याचे अधिकार पाणी वापर कार्यक्षमतेने करण्यासाठी महालेखाकाराच्या धर्तीवर जल वापराबाबत मुख्य लेखापरीक्षकांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्यातील पाणी प्रकल्प, सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून, पाणी वापर व उत्पन्न यात तफावत आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारीही दाखल केली जाईल, अशी माहिती जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.

मोहिते म्हणाले की, राज्यातील ३०८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २२५ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. राज्याची पाण्याची वार्षिक उपलब्धता ५ हजार ७८४ टीएमसी इतकी आहे. पाण्याचे सर्व स्रोत गृहीत धरल्यास १२६ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते.

सध्या केवळ ६५ लाख हेक्टर क्षेत्रच ओलिताखाली आहे. आणखी ८५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच एक भाग म्हणून शासनाने गतवर्षी जल लेखा (वॉटर आॅडिट) विभाग सुरू केला आहे. राज्यातील विविध प्रकल्प, सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे आॅडिट करण्याबरोबरच पाणी वापर कार्यक्षमतेने करण्यासाठी महालेखाकाराच्या धर्तीवर जल वापराबाबत मुख्य लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हा विभाग घरगुती, औद्योगिक पाणी वापर करणाºया संस्थांसह महापालिका, नगरपालिका, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती व तेथील कारखान्यांना मुख्य लेखापरीक्षकांकडून जललेखा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या विविध घटनांना देण्यात आलेला पाणी परवाना, मंजूर पाणी वापर, प्रत्यक्षात होणारा पाणी वापर, घनमापन पद्धतीने केलेला पुरवठा, पाणी मीटर, कारखान्याकडून उत्पन्नानुसार पाणीवापर केला जातो, की नाही, जलसंपदा विभागाकडून दिली जाणारी देयके, त्याची पडताळणी आदी कामे या विभागामार्फत केली जातील.प्रत्यक्षातील पाणी वापर व दिलेली बिले यात तफावत आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले....तर पाणी बंदजलसंपदा विभागाने या घटकांनी दिलेली पाणी बिले व प्रत्यक्षातील पाणी वापर यात तफावत आढळल्यास या बिलाची वसुली होईपर्यंत पाणी बंद करण्याचे अधिकार मुख्य लेखापरीक्षकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यात पाणी आॅडिट लवकरच सुरू करणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.