शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
5
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
6
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
7
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
8
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
9
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
10
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
11
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
12
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
13
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
14
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
15
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
16
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
17
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
18
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
19
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
20
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचे होणार आॅडिट --राजेंद्र मोहिते :

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2017 00:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्यातील पाणी प्रकल्प, सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून, पाणी वापर व उत्पन्न यात तफावत आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारीही दाखल केली जाईल, अशी माहिती जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.मोहिते म्हणाले की, राज्यातील ३०८ ...

ठळक मुद्देदंड व फौजदारी दाखल करण्याचे अधिकार पाणी वापर कार्यक्षमतेने करण्यासाठी महालेखाकाराच्या धर्तीवर जल वापराबाबत मुख्य लेखापरीक्षकांची नियुक्ती

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : राज्यातील पाणी प्रकल्प, सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे लेखापरीक्षण करण्यात येणार असून, पाणी वापर व उत्पन्न यात तफावत आढळल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारीही दाखल केली जाईल, अशी माहिती जल व सिंचन विभागाचे मुख्य लेखापरीक्षक राजेंद्र मोहिते यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.

मोहिते म्हणाले की, राज्यातील ३०८ लाख हेक्टर क्षेत्रापैकी २२५ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीलायक आहे. राज्याची पाण्याची वार्षिक उपलब्धता ५ हजार ७८४ टीएमसी इतकी आहे. पाण्याचे सर्व स्रोत गृहीत धरल्यास १२६ लाख हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येऊ शकते.

सध्या केवळ ६५ लाख हेक्टर क्षेत्रच ओलिताखाली आहे. आणखी ८५ लाख हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्यासाठी शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातच एक भाग म्हणून शासनाने गतवर्षी जल लेखा (वॉटर आॅडिट) विभाग सुरू केला आहे. राज्यातील विविध प्रकल्प, सिंचन व बिगर सिंचन पाणी वापराचे आॅडिट करण्याबरोबरच पाणी वापर कार्यक्षमतेने करण्यासाठी महालेखाकाराच्या धर्तीवर जल वापराबाबत मुख्य लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हा विभाग घरगुती, औद्योगिक पाणी वापर करणाºया संस्थांसह महापालिका, नगरपालिका, साखर कारखाने, औद्योगिक वसाहती व तेथील कारखान्यांना मुख्य लेखापरीक्षकांकडून जललेखा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या विविध घटनांना देण्यात आलेला पाणी परवाना, मंजूर पाणी वापर, प्रत्यक्षात होणारा पाणी वापर, घनमापन पद्धतीने केलेला पुरवठा, पाणी मीटर, कारखान्याकडून उत्पन्नानुसार पाणीवापर केला जातो, की नाही, जलसंपदा विभागाकडून दिली जाणारी देयके, त्याची पडताळणी आदी कामे या विभागामार्फत केली जातील.प्रत्यक्षातील पाणी वापर व दिलेली बिले यात तफावत आढळून आल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाईसोबतच फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असेही मोहिते यांनी स्पष्ट केले....तर पाणी बंदजलसंपदा विभागाने या घटकांनी दिलेली पाणी बिले व प्रत्यक्षातील पाणी वापर यात तफावत आढळल्यास या बिलाची वसुली होईपर्यंत पाणी बंद करण्याचे अधिकार मुख्य लेखापरीक्षकांना देण्यात आले आहेत. त्यानुसार सांगली जिल्ह्यात पाणी आॅडिट लवकरच सुरू करणार असल्याचे मोहिते यांनी सांगितले.