शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
2
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
3
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
4
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
5
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
6
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
7
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
9
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
10
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
11
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
12
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
13
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
14
Travel : ठंडा-ठंडा, कूल-कूल! भारतातील सर्वात गारेगार ठिकाणं, तापमान इतकं कमी की तलावही गोठतो
15
'जर तरची गोष्ट' नाटकाचा तरुण दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; ४२व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन
16
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
17
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
18
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
19
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
20
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
Daily Top 2Weekly Top 5

वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:28 IST

शिराळा तालुक्यातील करमजाई तलावातून सोडण्यात आलेले पाणी मानकरवाडी तलावात पोहोचले. विकास शहा लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तालुक्यातील ...

शिराळा तालुक्यातील करमजाई तलावातून सोडण्यात आलेले पाणी मानकरवाडी तलावात पोहोचले.

विकास शहा

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : तालुक्यातील ४९ पैकी १९ पाझर तलाव कोरडे पडले असून, २ तलावात २० टक्के तर २२ तलावात ३० ते ५० टक्के साठा शिल्लक आहे. चांदोली धरणामध्ये ४९.६२ टक्के उपयुक्त साठा शिल्लक आहे. वाकुर्डे बुद्रुक योजनेच्या करमजाई तलावातून पाणी सोडण्यात आले असून, मंगळवार रोजी रात्री मानकरवाडी तलावात पोहोचले आहे.

तालुक्यातील पावलेवाडी नं. १ , पावलेवाडी नं. २ ,बेलदारवाडी, कापरी ,इंगरुळ ,भटवाडी , खेड , औढी , निगडी जुना , निगडी( खोकडदरा), करमाळा नं.२ ,सावंतवाडी , हत्तेगाव ( अंबाबाई वाडी) , कोंडाईवाडी नं. १ , शिरशी नं. १ शिरशी ( भैरवदरा) ,शिरशी ( कालेखिंड ) शिवरवाडी ,पानुम्बरे तर्फ शिराळा नं. २ हे १९ पाझर तलाव कोरडे पडले आहेत.

याचबरोबर हत्तेगाव ( आशीलकुंड) १०० टक्के, चव्हाण वाडी नं.१, गवळेवाडी (बहिरखोरा) कोंडाईवाडी नं. २ , वाकुर्डे खुर्द यामध्ये (३० टक्के), शिरसटवाडी, गवळेवाडी (उंदिरखोरा), रेड नं. २ यामध्ये (३५ टक्के), पाडळी, लादेवाडी यामध्ये (४० टक्के) येळापूर (चव्हाणवाडी), तडवळे (वाडदरा) (कुंदनाला), निगडी (महारदरा), धामवडे, वाकुर्डे बुद्रुक (जामदाड), अंत्री खुर्द यामध्ये (४५ टक्के) मेणी (संकुपीनाला), अटूगडेवाडी (मेणी), शिरशी (कासारकी) करमाळा नं. १ , पानुम्बरे तर्फ शिराळा नं. १ पाडळीवाडी यामध्ये (५० टक्के) भाटशिरगाव यामध्ये (५५ टक्के) खिरवडे, बिऊर , वाडीभागाई ,पाचुंब्री यामध्ये (६० टक्के) बादेवाडी (वाकुर्डे बुद्रुक) यामध्ये ( ७० टक्के), भैरववाडी, तडवळे नं.१ यामध्ये (२० टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे. याचबरोबर विंधन विहिरी ५३० असून, यापैकी ४८७ सुरू असून ४३ बंद आहेत.

चाैकट

वाकुर्डेचे पाणी मानकरवाडी तलावात

वाकुर्डे बुद्रुक योजनेचे करमजाई तलाव भरला असून, या तलावातून मानकरवाडी तलावात पाणी सोडावे यासाठी आमदार मानसिंगराव नाईक यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार सांगितलेप्रमाणे कार्यकारी अभियंता डी. डी. शिंदे, वारणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, लालासाहेब मोरे, एस. डी. देसाई यांनी तातडीने पाणी सोडले आहे, त्यामुळे शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. या वाकुर्डे योजनेच्या पाण्यामुळे उत्तर भागातील अनेक गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे.