शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तुबची-बबलेश्वर योजनेतील पाणी जत पूर्व भागात दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:28 IST

लोकमत न्यूज नेटवर्क संख : कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतील पाणी कनमडी तलावातून जत पूर्व भागातील बोर नदीला दरी ओढ्यातून कोणताही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

संख : कर्नाटकातील तुबची-बबलेश्वर योजनेतील पाणी कनमडी तलावातून जत पूर्व भागातील बोर नदीला दरी ओढ्यातून कोणताही खर्च न करता

नैसर्गिक उताराने आले आहे. सिद्धनाथ तलाव, संख मध्यम प्रकल्प, बोर ओढापात्रातील सिमेंट बंधारे, कोल्हापूर बंधारे भरणार आहेत. साठवण क्षमता ७५२.२१ दशलक्ष घनफूट इतकी आहे. ही योजना अव्यवहार्य नसून, पाणी येऊ शकते, हे सिध्द झाले आहे.

पूर्व भागातील वंचित ६७ गावांसाठी तुबची-बबलेश्वर अत्यंत उपयुक्त योजना आहे. योजनेचा प्राथमिक आराखडा तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम, आमदार विक्रम सावंत यांंनी २०११ला कर्नाटक शासनाला सादर केला होता. तत्कालीन जलसंपदा मंत्री एम. बी. पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला होता. गेल्या १५ वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे. सीमावर्ती भागात योजनेेेचे पाणी बंदिस्त वितरकेतून ३.८ टीएमसी उचलले जाणार आहे. तिकोटा, जालगिरी, समुद्रहट्टी, घोणसगी या भागातील कामे पूर्णत्वाच्या टप्प्यावर आहेत. या योजनेचा शेवटचा चेंबर बाबानगर आहे.

नैसर्गिक उताराने पाणी भिवर्गी, तिकोंडी नं १, तिकोंडी नं २, जालिहाळ बुद्रुक, पांडोझरी, आसंगी तुर्क या ६ तलावांत ७०१ दशलक्ष घनफूट पाणीसाठा करता येईल. जालेगिरी ओढापात्रातून तिकोंडी क्र २ भिवर्गी तलावातून करजगी, बोर्गी, बेळोंडगी, बालगाव, हळ्ळी, सुसलाद, सोनलगीला पाणी गेले आहे. या योजनेचा ४२ हजार हेक्‍टर क्षेत्राला लाभ होईल. पाणीप्रश्न कायम सुटण्यास मदत मिळणार आहे. त्यासाठी आंतरराज्य पाणी करार होणे आवश्यक आहे. यासाठी पक्षभेद विसरून राजकीय पाठबळ व पाठपुराव्याची गरज आहे.

कोट

तुबची-बबलेश्वर योजनेचे पाणी येऊ शकते, हे सिध्द झाले आहे. तांत्रिक अडचण दूर करून योजनेचा पुनर्विचार करावा, या मागणीचे पत्र जलसंपदा विभागाचे सचिव यांना दिले आहे. - विक्रम सांवत, आमदार