शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ऐन पावसाळ्यात जतला टँकरने पाणी

By admin | Updated: June 23, 2015 00:03 IST

बारा टँकर सुरू : आणखी चार गावांची मागणी; ग्रामस्थांची भटकंती सुरूच

जयवंत आदाटे - जत -तालुक्यातील दहा गावे आणि त्याखालील ७६ वाड्या-वस्त्यांवरील ३९ हजार ७४९ नागरिकांना बारा टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ऐन पावसाळ्यात केला जात आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आणखी चार गावांतील नागरिकांनी केली आहे. यापुढील काळात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर टँकरच्या संख्येत आणखी वाढ करावी लागणार आहे.सर्वत्र पावसाळा सुरु होऊन समाधानकारक पाऊस झाला आहे. जत तालुक्यात फक्त ढगाळ वातावरण आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे अधून-मधून कधीतरी तुरळक प्रमाणात पाऊस पडून ओली झालेली जमीन सुकून जात आहे. सकाळी व सायंकाळी हवेत गारवा जाणवत आहे, तर दुपारी उष्णता वाढत आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.उमराणी, खोजानवाडी, डफळापूर, अमृतवाडी, काराजनगी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद या दहा गावांना प्रति दिवस माणसी वीस लिटर या प्रमाणात एक लाख ४४ हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. डफळापूर गावची लोकसंख्या सुमारे पाच हजार आहे. सध्या येथे २४ हजार लिटर क्षमता असलेल्या एका खासगी टँकरच्या तीन खेपा करुन पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु यातून मिळणारे पाणी कमी पडत आहे. शासनाने आणखी एक टँकर द्यावा, अशी मागणी जत पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब यांनी केली आहे. प्रशासनाने येथील जादा टँकर मागणीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविला आहे.बेवनूर गावातील नागरिकांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी जत पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे केली होती. त्यांनी प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी तहसीलदार, जत यांच्याकडे पाठविला आहे. परंतु त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. शासनाने आमचा टँकर त्वरित मंजूर करुन येथे टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम नाईक यांनी केली आहे.सोन्याळ व जाडरबोबलाद गावात आणि परिसरातील पाणी उद्भव कमी झाला आहे. शासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत सादर करण्यात आला आहे. या दोन गावांचे सर्वेक्षण करून तेथील टँकर मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालयास सादर करावेत, अशी मागणी जि. प. सदस्या सुशिला व्हनमोरे यांनी केली आहे.प्रत्येकवर्षी होणारा अनावश्यक खर्च कमी करून शासनाने जत तालुक्याला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करून त्यातून पाणी सोडले, तर येथील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे. कोट्यवधीचा खर्च, तरी टंचाई कायमएकूण बारा टँकरमध्ये चार शासकीय व आठ खासगी टँकरचा समावेश आहे. बारा टँकरसाठी प्रतिदिवस ३१ खेपा पाणी मंजूर करण्यात आले आहे. परंतु वीज दाबनियमन, नादुरुस्त टँकर व इतर तांत्रिक कारणांमुळे काहीवेळा खेपांची संख्या कमी होत आहे. १७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करुन, पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावात तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.२००९ चा अपवाद वगळता जत तालुक्यात प्रत्येकवर्षी पाणीटंचाई जाणवत आहे. पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी शासनाचे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. परंतु यातून कायमस्वरुपी पाणीटंचाई कमी होत नाही. पाणीटंचाई कामात शासन सतर्क आहे. टँकर मागणीचे प्रस्ताव आल्यानंतर त्या गावाचे सर्वेक्षण करून आवश्यकता असल्यास तेथे तात्काळ टँकर मंजूर करून पाणी पुरवठा केला जात आहे. - प्रमोद गायकवाडप्रांताधिकारी, जत