शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
2
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
3
'तुम्ही सांगा फक्त, नरेंद्र मोदी मतांसाठी स्टेजवर नाचायलाही तयार होतील,' राहुल गांधींची टीका
4
"महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणी SIT स्थापन करा, रणजितसिंह निंबाळकरांना तात्काळ अटक करा’’, कांग्रेसची मागणी 
5
‘केंद्रच्या कर्मचाऱ्यांचा डेटा गेला चीनकडे, देशातील गल्लीबोळाची त्यांना माहिती’, बड्या टेक तज्ज्ञाचा सनसनाटी दावा 
6
बाबोsss.... फुटबॉल विश्वचषकासाठी सौदी अरेबिया बांधणार जगातील पहिले 'स्काय स्टेडियम'
7
डॉक्टर तरुणी रात्री १.३० वाजता हॉटेलमध्ये आली होती; सीसीटीव्ही फुटेज पहिल्यांदाच समोर आले
8
रामकेशच्या हत्येचा फूलप्रूफ प्लॅन बनवला; मग खूनी गर्लफ्रेंडचं रहस्य कसं उघड झालं? पोलिसांनी सांगितली संपूर्ण कहाणी
9
Guruvar Ke Upay: गुरुवार विशेष उपाय कराल, तर एका हळदीच्या गाठीने मालामाल व्हाल!
10
भारताच्या डावपेचामुळे पाकिस्तानचं टेन्शन वाढलं; ८ हजार किमी सीमेवर युद्धाचं सावट, काय घडतंय?
11
IND vs AUS : सूर्याचं 'ग्रहण' सुटलं! हिटमॅन रोहितच्या क्लबमध्ये एन्ट्री; MS धोनीचा विक्रमही मोडला
12
Fact Check: कंडोममुळं तुंबली गर्ल्स हॉस्टेलची पाईपलाईन? व्हायरल व्हिडीओमुळे नको ‘त्या’ चर्चा!
13
मोठी बातमी! भारताकडे निघालेला रशियन तेलाचा टँकर समुद्रातून अचानक माघारी वळला; रिफायनरींची चिंता वाढली...
14
८ व्या वेतन आयोगाचा केव्हापासून मिळणार फायदा, संपूर्ण प्रक्रियेला किती वेळ लागणार? जाणून घ्या
15
भारताचा हिटमॅन 'जगात भारी'! वनडेमध्ये रोहित शर्मा अव्वल, गिलला मागे टाकत रचला विश्वविक्रम
16
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासोबत दिसल्या स्क्वॉड्रन लीडर शिवांगी सिंग! 'त्या' एका फोटोने पाकिस्तानचा होईल जळफळाट
17
पाकिस्तान करणार हमासचा खात्मा? अमेरिकेची 'चलाख' खेळी; असीम मुनीर २० हजार सैन्य उतरवणार
18
VIDEO: बकरीसोबत रील बनवत होती एक मुलगी, अचानक बकरीने जे केलं... पाहून तुम्हालाही येईल हसू
19
'कांतारा'फेम ऋषभ शेट्टीने साकारला होता 'घाशीराम', गाजलेल्या मराठी नाटकाशी आहे 'हे' कनेक्शन
20
आजोबांच्या संपत्तीवर नातवंडांचा जन्मसिद्ध हक्क नाही; मुंबई हायकोर्टाचा मोठा निर्णय, प्रकरण काय?

ऐन पावसाळ्यात जतला टँकरने पाणी

By admin | Updated: June 23, 2015 00:03 IST

बारा टँकर सुरू : आणखी चार गावांची मागणी; ग्रामस्थांची भटकंती सुरूच

जयवंत आदाटे - जत -तालुक्यातील दहा गावे आणि त्याखालील ७६ वाड्या-वस्त्यांवरील ३९ हजार ७४९ नागरिकांना बारा टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा ऐन पावसाळ्यात केला जात आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी आणखी चार गावांतील नागरिकांनी केली आहे. यापुढील काळात समाधानकारक पाऊस झाला नाही, तर टँकरच्या संख्येत आणखी वाढ करावी लागणार आहे.सर्वत्र पावसाळा सुरु होऊन समाधानकारक पाऊस झाला आहे. जत तालुक्यात फक्त ढगाळ वातावरण आहे. पश्चिमेकडून पूर्वेकडे जोरदार वारे वाहत आहेत. त्यामुळे अधून-मधून कधीतरी तुरळक प्रमाणात पाऊस पडून ओली झालेली जमीन सुकून जात आहे. सकाळी व सायंकाळी हवेत गारवा जाणवत आहे, तर दुपारी उष्णता वाढत आहे. त्यामुळे जमिनीखालील पाण्याची पातळी कमी होऊ लागली आहे.उमराणी, खोजानवाडी, डफळापूर, अमृतवाडी, काराजनगी, सिंदूर, उटगी, बिळूर, हळ्ळी, सुसलाद या दहा गावांना प्रति दिवस माणसी वीस लिटर या प्रमाणात एक लाख ४४ हजार लिटर पाण्याचा पुरवठा केला जात आहे. डफळापूर गावची लोकसंख्या सुमारे पाच हजार आहे. सध्या येथे २४ हजार लिटर क्षमता असलेल्या एका खासगी टँकरच्या तीन खेपा करुन पाणी पुरवठा केला जात आहे. परंतु यातून मिळणारे पाणी कमी पडत आहे. शासनाने आणखी एक टँकर द्यावा, अशी मागणी जत पंचायत समितीचे माजी सभापती मन्सूर खतीब यांनी केली आहे. प्रशासनाने येथील जादा टँकर मागणीचा प्रस्ताव तयार करून मंजुरीसाठी तहसील कार्यालयाकडे पाठविला आहे.बेवनूर गावातील नागरिकांनी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा, अशी मागणी जत पंचायत समिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे केली होती. त्यांनी प्रस्ताव तयार करुन मंजुरीसाठी तहसीलदार, जत यांच्याकडे पाठविला आहे. परंतु त्यास अद्याप मंजुरी मिळालेली नाही. गावात तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांना रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. शासनाने आमचा टँकर त्वरित मंजूर करुन येथे टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरु करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते तुकाराम नाईक यांनी केली आहे.सोन्याळ व जाडरबोबलाद गावात आणि परिसरातील पाणी उद्भव कमी झाला आहे. शासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव ग्रामपंचायतीमार्फत सादर करण्यात आला आहे. या दोन गावांचे सर्वेक्षण करून तेथील टँकर मागणीचे प्रस्ताव तहसील कार्यालयास सादर करावेत, अशी मागणी जि. प. सदस्या सुशिला व्हनमोरे यांनी केली आहे.प्रत्येकवर्षी होणारा अनावश्यक खर्च कमी करून शासनाने जत तालुक्याला वरदान ठरणाऱ्या म्हैसाळ उपसा जलसिंचन योजनेचे अपूर्ण काम पूर्ण करून त्यातून पाणी सोडले, तर येथील शेती व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी निकालात निघणार आहे. कोट्यवधीचा खर्च, तरी टंचाई कायमएकूण बारा टँकरमध्ये चार शासकीय व आठ खासगी टँकरचा समावेश आहे. बारा टँकरसाठी प्रतिदिवस ३१ खेपा पाणी मंजूर करण्यात आले आहे. परंतु वीज दाबनियमन, नादुरुस्त टँकर व इतर तांत्रिक कारणांमुळे काहीवेळा खेपांची संख्या कमी होत आहे. १७ खासगी विहिरींचे अधिग्रहण करुन, पाणीटंचाई जाणवत असलेल्या गावात तात्पुरती उपाययोजना करण्यात आली आहे.२००९ चा अपवाद वगळता जत तालुक्यात प्रत्येकवर्षी पाणीटंचाई जाणवत आहे. पाणी टंचाईवर उपाययोजना करण्यासाठी शासनाचे प्रतिवर्षी कोट्यवधी रुपये खर्च होत आहेत. परंतु यातून कायमस्वरुपी पाणीटंचाई कमी होत नाही. पाणीटंचाई कामात शासन सतर्क आहे. टँकर मागणीचे प्रस्ताव आल्यानंतर त्या गावाचे सर्वेक्षण करून आवश्यकता असल्यास तेथे तात्काळ टँकर मंजूर करून पाणी पुरवठा केला जात आहे. - प्रमोद गायकवाडप्रांताधिकारी, जत