शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

जत तालुक्यातील ४० गावांत टॅँकरने पाणी

By admin | Updated: April 23, 2017 23:54 IST

दुष्काळाची दाहकता : दररोज सव्वालाख लोकांना पाणी देण्याचे आव्हान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

गजानन पाटील ल्ल संखकायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यात यंंदाही दुष्काळाचा वणवा भडकला आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट उन्हाळाच्या वाढत्या उन्हाच्या झळांबरोबर दिवसेंदिवस वाढू लागले आहे. पूर्व भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मुकी जनावरे, शेतकरी, उरली सुरली पिके या साऱ्यांची आता होरपळ सुरू आहे. सध्या ४० गावे व त्याखालील ३७५ वाड्या-वस्त्यांवर ४९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ३ शासकीय, ४६ खासगी टॅँकरने १ लाख २९ हजार ९१४ लोकांची तहान टॅँकरच्या पाण्याने भागविली जात आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एप्र्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उच्चांकी गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.दरम्यान, बागायतदार शेतकरी द्राक्षे, डाळिंब, फळबागांना टॅँकरने पाणी घालू लागला आहे. कूपनलिका व विहीर खुदाईची कामे जोरात सुरू आहेत. तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पाऊस अत्यल्प पडत असल्यामुळे पाण्याची पातळी १८०० फुटापर्यंत खाली गेली आहे. शेतीचे रब्बी व खरीप हंगाम वाया गेले आहेत. पाण्याअभावी डाळिंब, द्राक्षे, फळबागा वाळून गेल्या आहेत. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहिरीही पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. तालुक्यात यावर्षी एप्रिल महिन्यात ६५ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सध्या तालुक्यात टॅँकरची संख्या ४९ झाली आहे. कोंत्यावबोबलाद, दरीबडची, माडग्याळ, डफळापूर, बागलवाडी, तिकोंडी, उमदी, संख, वज्रवाड, उमराणी, डफळापूर वाडीवस्ती, दरीबडची, संख वाडीवस्ती, आसंगी, जत वाडीवस्ती, संख वाडीवस्ती, कुणीकोणूर, करजगी, बेळोंडगी, अंकलगी, मोटेवाडी, आसंगी तुर्क, कुडनूर, सोरडी, माडग्याळ वाडीस्ती, रावळगुंडवाडी, दरीकोणूर, वज्रवाड, सनमडी, एकुंडी, मुचंडी या प्रमुख गावांसह ४० गावे व ३७५ वाडी-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यात १ लाख २९ हजार ९१४ लोक टॅँकरवर अवलंबून आहेत. पंचायत समितीने १२ टॅँकरचा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविला आहे, तर १३ गावांनी नव्याने टॅँकरची मागणी केली आहे.टॅँकर भरण्याचे अंतर, विजेचे भारनियमन, तांत्रिक अडचण यामुळे दिवसभरातील टॅँकरच्या खेपा काही वेळा होत नाहीत. शासन माणसी २० लिटर पाणी मंजूर करत असले तरी, प्रत्यक्षात १५ किंवा १७ लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. उर्वरित पाणी मिळविण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत दोन कोटी ४३ लाख ५१ हजार रुपये प्रस्तावित असलेला संभाव्य टंचाई कृती आराखडा करून मान्यता घेतलेला होती. येथील शेतकऱ्यांनी बागायतदार शेतीही केली आहे. विकत पाणी आणून शेतकऱ्यांनी बागा जगवल्या आहेत. मात्र आता पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाणी टंचाईमुळे परिसरात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कूपनलिका व विहीर खुदाईची कामे जोरात सुरू आहेत.मूक जनावरांचे हाल तालुक्यात पशुपालकांची संख्या मोठी आहे. ६ लाख जनावरे आहेत. शासनाने माणसी वीस लिटर याप्रमाणे टॅँकर सुरू केले आहे. मात्र त्यात जनावरांचा समावेश नाही. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या वैरणीचीही टंचाई आहे.