शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
2
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
3
शिवाजी विद्यापीठात विद्यार्थीनीने वसतिगृहात टोकाचे पाऊल उचलले; नेमके कारण काय?
4
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
5
'एसआयआर'वरून विरोधकांच्या गदारोळावर निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा; पुरावा म्हणून व्हिडीओ जारी; काँग्रेस बॅकफूटवर
6
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
7
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
8
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
9
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
10
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
11
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
12
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
13
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
14
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
15
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
16
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
17
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
18
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
19
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
20
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत

जत तालुक्यातील ४० गावांत टॅँकरने पाणी

By admin | Updated: April 23, 2017 23:54 IST

दुष्काळाची दाहकता : दररोज सव्वालाख लोकांना पाणी देण्याचे आव्हान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

गजानन पाटील ल्ल संखकायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यात यंंदाही दुष्काळाचा वणवा भडकला आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट उन्हाळाच्या वाढत्या उन्हाच्या झळांबरोबर दिवसेंदिवस वाढू लागले आहे. पूर्व भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मुकी जनावरे, शेतकरी, उरली सुरली पिके या साऱ्यांची आता होरपळ सुरू आहे. सध्या ४० गावे व त्याखालील ३७५ वाड्या-वस्त्यांवर ४९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ३ शासकीय, ४६ खासगी टॅँकरने १ लाख २९ हजार ९१४ लोकांची तहान टॅँकरच्या पाण्याने भागविली जात आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एप्र्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उच्चांकी गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.दरम्यान, बागायतदार शेतकरी द्राक्षे, डाळिंब, फळबागांना टॅँकरने पाणी घालू लागला आहे. कूपनलिका व विहीर खुदाईची कामे जोरात सुरू आहेत. तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पाऊस अत्यल्प पडत असल्यामुळे पाण्याची पातळी १८०० फुटापर्यंत खाली गेली आहे. शेतीचे रब्बी व खरीप हंगाम वाया गेले आहेत. पाण्याअभावी डाळिंब, द्राक्षे, फळबागा वाळून गेल्या आहेत. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहिरीही पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. तालुक्यात यावर्षी एप्रिल महिन्यात ६५ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सध्या तालुक्यात टॅँकरची संख्या ४९ झाली आहे. कोंत्यावबोबलाद, दरीबडची, माडग्याळ, डफळापूर, बागलवाडी, तिकोंडी, उमदी, संख, वज्रवाड, उमराणी, डफळापूर वाडीवस्ती, दरीबडची, संख वाडीवस्ती, आसंगी, जत वाडीवस्ती, संख वाडीवस्ती, कुणीकोणूर, करजगी, बेळोंडगी, अंकलगी, मोटेवाडी, आसंगी तुर्क, कुडनूर, सोरडी, माडग्याळ वाडीस्ती, रावळगुंडवाडी, दरीकोणूर, वज्रवाड, सनमडी, एकुंडी, मुचंडी या प्रमुख गावांसह ४० गावे व ३७५ वाडी-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यात १ लाख २९ हजार ९१४ लोक टॅँकरवर अवलंबून आहेत. पंचायत समितीने १२ टॅँकरचा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविला आहे, तर १३ गावांनी नव्याने टॅँकरची मागणी केली आहे.टॅँकर भरण्याचे अंतर, विजेचे भारनियमन, तांत्रिक अडचण यामुळे दिवसभरातील टॅँकरच्या खेपा काही वेळा होत नाहीत. शासन माणसी २० लिटर पाणी मंजूर करत असले तरी, प्रत्यक्षात १५ किंवा १७ लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. उर्वरित पाणी मिळविण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत दोन कोटी ४३ लाख ५१ हजार रुपये प्रस्तावित असलेला संभाव्य टंचाई कृती आराखडा करून मान्यता घेतलेला होती. येथील शेतकऱ्यांनी बागायतदार शेतीही केली आहे. विकत पाणी आणून शेतकऱ्यांनी बागा जगवल्या आहेत. मात्र आता पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाणी टंचाईमुळे परिसरात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कूपनलिका व विहीर खुदाईची कामे जोरात सुरू आहेत.मूक जनावरांचे हाल तालुक्यात पशुपालकांची संख्या मोठी आहे. ६ लाख जनावरे आहेत. शासनाने माणसी वीस लिटर याप्रमाणे टॅँकर सुरू केले आहे. मात्र त्यात जनावरांचा समावेश नाही. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या वैरणीचीही टंचाई आहे.