शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

जत तालुक्यातील ४० गावांत टॅँकरने पाणी

By admin | Updated: April 23, 2017 23:54 IST

दुष्काळाची दाहकता : दररोज सव्वालाख लोकांना पाणी देण्याचे आव्हान, शेतकऱ्यांना आर्थिक फटका

गजानन पाटील ल्ल संखकायम दुष्काळी असलेल्या जत तालुक्यात यंंदाही दुष्काळाचा वणवा भडकला आहे. पिण्याच्या पाण्याचे संकट उन्हाळाच्या वाढत्या उन्हाच्या झळांबरोबर दिवसेंदिवस वाढू लागले आहे. पूर्व भागात पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. मुकी जनावरे, शेतकरी, उरली सुरली पिके या साऱ्यांची आता होरपळ सुरू आहे. सध्या ४० गावे व त्याखालील ३७५ वाड्या-वस्त्यांवर ४९ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. ३ शासकीय, ४६ खासगी टॅँकरने १ लाख २९ हजार ९१४ लोकांची तहान टॅँकरच्या पाण्याने भागविली जात आहे. आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार एप्र्रिल महिन्याच्या मध्यापर्यंत उच्चांकी गावांना टॅँकरने पाणीपुरवठा सुरू आहे.दरम्यान, बागायतदार शेतकरी द्राक्षे, डाळिंब, फळबागांना टॅँकरने पाणी घालू लागला आहे. कूपनलिका व विहीर खुदाईची कामे जोरात सुरू आहेत. तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या पाच वर्षांपासून पाऊस अत्यल्प पडत असल्यामुळे पाण्याची पातळी १८०० फुटापर्यंत खाली गेली आहे. शेतीचे रब्बी व खरीप हंगाम वाया गेले आहेत. पाण्याअभावी डाळिंब, द्राक्षे, फळबागा वाळून गेल्या आहेत. तसेच गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहिरीही पाण्याअभावी कोरड्या पडल्या आहेत. तालुक्यात यावर्षी एप्रिल महिन्यात ६५ गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. सध्या तालुक्यात टॅँकरची संख्या ४९ झाली आहे. कोंत्यावबोबलाद, दरीबडची, माडग्याळ, डफळापूर, बागलवाडी, तिकोंडी, उमदी, संख, वज्रवाड, उमराणी, डफळापूर वाडीवस्ती, दरीबडची, संख वाडीवस्ती, आसंगी, जत वाडीवस्ती, संख वाडीवस्ती, कुणीकोणूर, करजगी, बेळोंडगी, अंकलगी, मोटेवाडी, आसंगी तुर्क, कुडनूर, सोरडी, माडग्याळ वाडीस्ती, रावळगुंडवाडी, दरीकोणूर, वज्रवाड, सनमडी, एकुंडी, मुचंडी या प्रमुख गावांसह ४० गावे व ३७५ वाडी-वस्त्यांवर टॅँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. तालुक्यात १ लाख २९ हजार ९१४ लोक टॅँकरवर अवलंबून आहेत. पंचायत समितीने १२ टॅँकरचा प्रस्ताव तहसीलदारांकडे पाठविला आहे, तर १३ गावांनी नव्याने टॅँकरची मागणी केली आहे.टॅँकर भरण्याचे अंतर, विजेचे भारनियमन, तांत्रिक अडचण यामुळे दिवसभरातील टॅँकरच्या खेपा काही वेळा होत नाहीत. शासन माणसी २० लिटर पाणी मंजूर करत असले तरी, प्रत्यक्षात १५ किंवा १७ लिटर पाणी नागरिकांना मिळत आहे. उर्वरित पाणी मिळविण्यासाठी रानोमाळ भटकंती करावी लागत आहे. प्रशासनाने ३१ मार्च २०१७ अखेरपर्यंत दोन कोटी ४३ लाख ५१ हजार रुपये प्रस्तावित असलेला संभाव्य टंचाई कृती आराखडा करून मान्यता घेतलेला होती. येथील शेतकऱ्यांनी बागायतदार शेतीही केली आहे. विकत पाणी आणून शेतकऱ्यांनी बागा जगवल्या आहेत. मात्र आता पाण्याची तीव्र टंचाई भासत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. पाणी टंचाईमुळे परिसरात शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कूपनलिका व विहीर खुदाईची कामे जोरात सुरू आहेत.मूक जनावरांचे हाल तालुक्यात पशुपालकांची संख्या मोठी आहे. ६ लाख जनावरे आहेत. शासनाने माणसी वीस लिटर याप्रमाणे टॅँकर सुरू केले आहे. मात्र त्यात जनावरांचा समावेश नाही. त्यामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या वैरणीचीही टंचाई आहे.