शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
4
मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
6
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
7
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
8
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
9
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
10
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
12
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
13
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
14
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
15
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
16
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
17
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
18
Mumbai: नियोजनाच्या अभावामुळे विक्रोळीत वाहतूककोंडी
19
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
20
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या

माधवनगरसह सात गावांचा पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: December 16, 2015 00:12 IST

वीज तोडली : १७ लाखांची थकबाकी; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू

सांगली/माधवनगर : मिरज तालुक्यातील माधवनगरसह सात गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या विजेची थकबाकी १७ लाखांच्या घरात गेल्याने, महावितरणने योजनेचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून या सातही गावांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. सातही गावांनी पैसे भरण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु तरीही आणखी तीन ते चार दिवस योजना बंदच राहणार आहे.माधवनगरच्या पाणी योजनेत बुधगाव, कवलापूर, बिसूर, खोतवाडी, सांबरवाडी व कांचनपूर या गावांचा समावेश आहे. दिवाळीपासून या सातही ग्रामपंचायतींनी महावितरणकडे वीज बिलाचे पैसे वेळेत न भरल्याने सातही गावांवर पाणी पुरवठा बंद होण्याचा प्रसंग आला आहे. यापूर्वी याच कारणाने अनेकदा वीज कनेक्शन तोडल्याने पाणी पुरवठा बंद झाला होता. माधवनगर ग्रामपंचायत वीज बिलाच्या पैशाची थोडीफार तरतूद करते. पण इतर गावांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यास अनेक कारणे असून, मुख्य कारण गावातील घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली करण्यात ही गावे अयशस्वी ठरत असल्याने ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा व वीज पुरवठ्यासाठी रकमेची जुळणी होणे जिकिरीचे होऊन बसले आहे. सध्या या गावांसाठी सात गावांची शिखर परिषद असून, तिच्यामार्फत योजना चालविली जात आहे. पण आर्थिक मिळकतीचे ठोस साधन नसल्याने ही शिखर परिषद कमकुवत ठरली आहे.दोन ते तीन महिन्यांतून या गावातील पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना कृष्णा नदी जवळ असूनही पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. याला प्रशासन कारणीभूत असून ग्रामस्थांकडून वसुली वेळेत झाल्यास योजना व पाणी पुरवठा सुरळीत सुरु राहू शकते. पण योजना सुरु झाल्यापासून ते आजअखेर कोणत्याही गावाने वसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामस्थांकडे लाखो रुपयांची थकबाकी अडकून पडली आहे. काही ग्रामस्थ प्रामाणिकपणे घर व पाणीपट्टी प्रत्येकवर्षी भरतात. पण हे प्रमाणही अत्यंत कमी आहे. थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीपट्टी व वीज बिल भरायचे कसे? असा ग्रामपंचायतींनाप्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)पैशाची जुळवाजुळव सुरूसातही गावांची विजेची थकबाकी १७ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे महावितरणने पाच दिवसांपूर्वी योजनेचा वीज पुरवठा बंद केला आहे. सध्या किमान १० लाख रुपये भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरु करणार नाही, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे माधवनगर, बुधगाव व कवलापूर या तीन गावांनी प्रत्येकी तीन लाख व लहान गावांनी एक लाख रुपये जमा केले, तर दहा लाख भरता येणार आहेत. सध्या तरी आता एकाही ग्रामपंचायतीकडे एवढी रक्कम नाही. तरीही त्यांच्याकडून पैशाची जुळवाजुळव सुरु आहे. अजून तीन ते चार दिवस योजना बंदच राहणार आहे.ग्रामपंचायत : लक्ष टंचाई निधीकडेसातही ग्रामपंचायतींकडे वीज बिलाची रक्कम भरण्याची आर्थिक क्षमता नसल्याने, जिल्हा परिषदेकडे जमा होणाऱ्या टंचाई निधीकडे या ग्रामपंचायती डोळे लावून बसतात. यापूर्वी अनेकदा शासनाच्या या निधीचा लाभ सातही गावांनी घेतला आहे. शासनाकडून टंचाई निधीअंतर्गत निधी मिळेल व पाणी टंचाई संपेल, अशी अपेक्षा या ग्रामपंचायतींना आहे.