शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

माधवनगरसह सात गावांचा पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: December 16, 2015 00:12 IST

वीज तोडली : १७ लाखांची थकबाकी; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू

सांगली/माधवनगर : मिरज तालुक्यातील माधवनगरसह सात गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या विजेची थकबाकी १७ लाखांच्या घरात गेल्याने, महावितरणने योजनेचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून या सातही गावांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. सातही गावांनी पैसे भरण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु तरीही आणखी तीन ते चार दिवस योजना बंदच राहणार आहे.माधवनगरच्या पाणी योजनेत बुधगाव, कवलापूर, बिसूर, खोतवाडी, सांबरवाडी व कांचनपूर या गावांचा समावेश आहे. दिवाळीपासून या सातही ग्रामपंचायतींनी महावितरणकडे वीज बिलाचे पैसे वेळेत न भरल्याने सातही गावांवर पाणी पुरवठा बंद होण्याचा प्रसंग आला आहे. यापूर्वी याच कारणाने अनेकदा वीज कनेक्शन तोडल्याने पाणी पुरवठा बंद झाला होता. माधवनगर ग्रामपंचायत वीज बिलाच्या पैशाची थोडीफार तरतूद करते. पण इतर गावांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यास अनेक कारणे असून, मुख्य कारण गावातील घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली करण्यात ही गावे अयशस्वी ठरत असल्याने ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा व वीज पुरवठ्यासाठी रकमेची जुळणी होणे जिकिरीचे होऊन बसले आहे. सध्या या गावांसाठी सात गावांची शिखर परिषद असून, तिच्यामार्फत योजना चालविली जात आहे. पण आर्थिक मिळकतीचे ठोस साधन नसल्याने ही शिखर परिषद कमकुवत ठरली आहे.दोन ते तीन महिन्यांतून या गावातील पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना कृष्णा नदी जवळ असूनही पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. याला प्रशासन कारणीभूत असून ग्रामस्थांकडून वसुली वेळेत झाल्यास योजना व पाणी पुरवठा सुरळीत सुरु राहू शकते. पण योजना सुरु झाल्यापासून ते आजअखेर कोणत्याही गावाने वसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामस्थांकडे लाखो रुपयांची थकबाकी अडकून पडली आहे. काही ग्रामस्थ प्रामाणिकपणे घर व पाणीपट्टी प्रत्येकवर्षी भरतात. पण हे प्रमाणही अत्यंत कमी आहे. थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीपट्टी व वीज बिल भरायचे कसे? असा ग्रामपंचायतींनाप्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)पैशाची जुळवाजुळव सुरूसातही गावांची विजेची थकबाकी १७ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे महावितरणने पाच दिवसांपूर्वी योजनेचा वीज पुरवठा बंद केला आहे. सध्या किमान १० लाख रुपये भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरु करणार नाही, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे माधवनगर, बुधगाव व कवलापूर या तीन गावांनी प्रत्येकी तीन लाख व लहान गावांनी एक लाख रुपये जमा केले, तर दहा लाख भरता येणार आहेत. सध्या तरी आता एकाही ग्रामपंचायतीकडे एवढी रक्कम नाही. तरीही त्यांच्याकडून पैशाची जुळवाजुळव सुरु आहे. अजून तीन ते चार दिवस योजना बंदच राहणार आहे.ग्रामपंचायत : लक्ष टंचाई निधीकडेसातही ग्रामपंचायतींकडे वीज बिलाची रक्कम भरण्याची आर्थिक क्षमता नसल्याने, जिल्हा परिषदेकडे जमा होणाऱ्या टंचाई निधीकडे या ग्रामपंचायती डोळे लावून बसतात. यापूर्वी अनेकदा शासनाच्या या निधीचा लाभ सातही गावांनी घेतला आहे. शासनाकडून टंचाई निधीअंतर्गत निधी मिळेल व पाणी टंचाई संपेल, अशी अपेक्षा या ग्रामपंचायतींना आहे.