शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

माधवनगरसह सात गावांचा पाणीपुरवठा बंद

By admin | Updated: December 16, 2015 00:12 IST

वीज तोडली : १७ लाखांची थकबाकी; ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू

सांगली/माधवनगर : मिरज तालुक्यातील माधवनगरसह सात गावांच्या पाणी पुरवठा योजनेच्या विजेची थकबाकी १७ लाखांच्या घरात गेल्याने, महावितरणने योजनेचा वीज पुरवठा बंद केला आहे. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून या सातही गावांचा पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरु झाली आहे. सातही गावांनी पैसे भरण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. परंतु तरीही आणखी तीन ते चार दिवस योजना बंदच राहणार आहे.माधवनगरच्या पाणी योजनेत बुधगाव, कवलापूर, बिसूर, खोतवाडी, सांबरवाडी व कांचनपूर या गावांचा समावेश आहे. दिवाळीपासून या सातही ग्रामपंचायतींनी महावितरणकडे वीज बिलाचे पैसे वेळेत न भरल्याने सातही गावांवर पाणी पुरवठा बंद होण्याचा प्रसंग आला आहे. यापूर्वी याच कारणाने अनेकदा वीज कनेक्शन तोडल्याने पाणी पुरवठा बंद झाला होता. माधवनगर ग्रामपंचायत वीज बिलाच्या पैशाची थोडीफार तरतूद करते. पण इतर गावांची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. त्यास अनेक कारणे असून, मुख्य कारण गावातील घरपट्टी व पाणीपट्टीची वसुली करण्यात ही गावे अयशस्वी ठरत असल्याने ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठा व वीज पुरवठ्यासाठी रकमेची जुळणी होणे जिकिरीचे होऊन बसले आहे. सध्या या गावांसाठी सात गावांची शिखर परिषद असून, तिच्यामार्फत योजना चालविली जात आहे. पण आर्थिक मिळकतीचे ठोस साधन नसल्याने ही शिखर परिषद कमकुवत ठरली आहे.दोन ते तीन महिन्यांतून या गावातील पाणी पुरवठा बंद झाल्याने ग्रामस्थांना कृष्णा नदी जवळ असूनही पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. याला प्रशासन कारणीभूत असून ग्रामस्थांकडून वसुली वेळेत झाल्यास योजना व पाणी पुरवठा सुरळीत सुरु राहू शकते. पण योजना सुरु झाल्यापासून ते आजअखेर कोणत्याही गावाने वसुलीकडे लक्ष न दिल्याने ग्रामस्थांकडे लाखो रुपयांची थकबाकी अडकून पडली आहे. काही ग्रामस्थ प्रामाणिकपणे घर व पाणीपट्टी प्रत्येकवर्षी भरतात. पण हे प्रमाणही अत्यंत कमी आहे. थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याने पाणीपट्टी व वीज बिल भरायचे कसे? असा ग्रामपंचायतींनाप्रश्न पडला आहे. (प्रतिनिधी/वार्ताहर)पैशाची जुळवाजुळव सुरूसातही गावांची विजेची थकबाकी १७ लाखांच्या घरात गेली आहे. त्यामुळे महावितरणने पाच दिवसांपूर्वी योजनेचा वीज पुरवठा बंद केला आहे. सध्या किमान १० लाख रुपये भरल्याशिवाय वीज पुरवठा सुरु करणार नाही, असा इशारा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिला आहे. त्यामुळे माधवनगर, बुधगाव व कवलापूर या तीन गावांनी प्रत्येकी तीन लाख व लहान गावांनी एक लाख रुपये जमा केले, तर दहा लाख भरता येणार आहेत. सध्या तरी आता एकाही ग्रामपंचायतीकडे एवढी रक्कम नाही. तरीही त्यांच्याकडून पैशाची जुळवाजुळव सुरु आहे. अजून तीन ते चार दिवस योजना बंदच राहणार आहे.ग्रामपंचायत : लक्ष टंचाई निधीकडेसातही ग्रामपंचायतींकडे वीज बिलाची रक्कम भरण्याची आर्थिक क्षमता नसल्याने, जिल्हा परिषदेकडे जमा होणाऱ्या टंचाई निधीकडे या ग्रामपंचायती डोळे लावून बसतात. यापूर्वी अनेकदा शासनाच्या या निधीचा लाभ सातही गावांनी घेतला आहे. शासनाकडून टंचाई निधीअंतर्गत निधी मिळेल व पाणी टंचाई संपेल, अशी अपेक्षा या ग्रामपंचायतींना आहे.