शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
2
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
3
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
4
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
5
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
6
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
7
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
8
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
9
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
10
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
11
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
12
Operation Sindoor Live Updates: शस्त्रसंधी झाल्यानंतर पंतप्रधान मोदींची संरक्षण मंत्र्यांसह तिन्ही दलांच्या प्रमुखांसोबत बैठक
13
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
14
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
15
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
16
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
17
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात
18
अफगाणिस्ताननेही फाडला खोटारड्या पाकिस्तानचा बुरखा; भारताविरोधात काय केला होता दावा?
19
‘बेगाने शादी मे’ मला कशाला ‘अब्दुल्ला दीवाना’ करता? राष्ट्रवादी एकत्रीकरणाचा प्रश्न फडणवीसांनी भिरकावला
20
आधी देशसेवा! लग्नाच्या दुसऱ्या दिवशी फोन आला, नवरदेवाचा पोशाख काढून ‘तो’ सीमेकडे निघाला

मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठ्याच्या हालचाली

By admin | Updated: April 4, 2016 00:24 IST

दुष्काळी उपाययोजना : रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेच्या अधिग्रहणाची शक्यता

मिरज : तीव्र पाणीटंचाईमुळे मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याबाबत विचार सुरू आहे. यासाठी प्रशासनाकडून मिरजेतील रेल्वेच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे अधिग्रहण करण्यात येण्याची शक्यता आहे. यंदा भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाईमुळे लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला आहे. सोलापुरातून दररोज रेल्वे टँकरने लातूरला पाणी नेण्यात येणार आहे. मात्र, सोलापुरात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने पाणी उपलब्ध असलेल्या मिरजेतून पाणीपुरवठ्याचा पर्याय आहे. मध्य रेल्वेची मिरजेत रेल्वेस्थानकासाठी कृष्णा नदीतून स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना आहे. दररोज ४५ लाख लिटर पाणी उपसा शुद्धिकरण क्षमता असलेल्या योजनेतून रेल्वेस्थानक व रेल्वे कर्मचारी वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. दहा वर्षांपूर्वी रेल्वेने ७ कोटी रुपये खर्चून कृष्णाघाट ते रेल्वेस्थानकापर्यंत साडेचार किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीद्वारे रेल्वेस्थानकाजवळ पाणी शुद्धिकरण व वितरण यंत्रणा उभारली आहे. पश्चिम महाराष्ट्रात केवळ मिरजेतच रेल्वेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. मिरजेत दररोज येणाऱ्या व जाणाऱ्या ६५ लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस व पॅसेंजर रेल्वेत पाणी भरण्यात येते. मिरजेत रेल्वे व कर्मचारी वसाहतीसाठी दररोज १० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. सुमारे ४५ लाख लिटर क्षमतेच्या रेल्वेच्या पाणी पुरवठा योजनेतून दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करता येणे शक्य असल्याने मिरजेतून लातूरला रेल्वे टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रस्ताव आहे. यासाठी प्रशासनाकडून मिरजेतील रेल्वेच्या पाणी योजनेच्या अधिग्रहणाची शक्यता आहे. मिरजेतून लातूर ३४३ किलोमीटर एवढ्या अंतरावर असल्याने मिरजेतून लातूरला पाणी पोहोचविण्यासाठी सात तास लागणार आहेत. लातूरसह पाणीटंचाई असलेल्या अन्य ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी मिरजेतील रेल्वे पाणीपुरवठा योजनेचा वापर करण्यात येणार आहे. वारणा व कोयना धरणातून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने उन्हाळ्यात दोन महिने पुरेल एवढा पाणी साठा मिरजेत आहे. म्हैसाळ योजनेव्दारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने लगतच्या कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्याच्या व शेतीसाठी पाणी टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. मिरजेतून दररोज दोन रेल्वे टँकरने लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची तयारी आहे. वित्तीय तूट मर्यादेतच सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणी करमाळा किंवा पंढरपूर रेल्वेस्थानकातून लातूरला नेण्यासाठी तांत्रिक अडचणी आहेत. यासाठी धरणापासून रेल्वेस्थानकापर्यंत जलवाहिनीची व्यवस्था करावी लागणार असल्याने पंढरपुरातून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या मिरजेतून रेल्वेने तातडीने व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करता येणे शक्य आहे. भाजप नेते मकरंद देशपांडे यांनी मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.