शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठ्याच्या हालचाली

By admin | Updated: April 4, 2016 00:24 IST

दुष्काळी उपाययोजना : रेल्वेच्या पाणीपुरवठा योजनेच्या अधिग्रहणाची शक्यता

मिरज : तीव्र पाणीटंचाईमुळे मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याबाबत विचार सुरू आहे. यासाठी प्रशासनाकडून मिरजेतील रेल्वेच्या स्वतंत्र पाणीपुरवठा योजनेचे अधिग्रहण करण्यात येण्याची शक्यता आहे. यंदा भीषण दुष्काळामुळे मराठवाड्यात तीव्र पाणीटंचाईमुळे लातूर शहराला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय झाला आहे. सोलापुरातून दररोज रेल्वे टँकरने लातूरला पाणी नेण्यात येणार आहे. मात्र, सोलापुरात पाण्याची उपलब्धता कमी असल्याने पाणी उपलब्ध असलेल्या मिरजेतून पाणीपुरवठ्याचा पर्याय आहे. मध्य रेल्वेची मिरजेत रेल्वेस्थानकासाठी कृष्णा नदीतून स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना आहे. दररोज ४५ लाख लिटर पाणी उपसा शुद्धिकरण क्षमता असलेल्या योजनेतून रेल्वेस्थानक व रेल्वे कर्मचारी वसाहतीला पाणीपुरवठा करण्यात येतो. दहा वर्षांपूर्वी रेल्वेने ७ कोटी रुपये खर्चून कृष्णाघाट ते रेल्वेस्थानकापर्यंत साडेचार किलोमीटर लांबीच्या जलवाहिनीद्वारे रेल्वेस्थानकाजवळ पाणी शुद्धिकरण व वितरण यंत्रणा उभारली आहे. पश्चिम महाराष्ट्रात केवळ मिरजेतच रेल्वेची स्वतंत्र पाणीपुरवठा योजना आहे. मिरजेत दररोज येणाऱ्या व जाणाऱ्या ६५ लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस व पॅसेंजर रेल्वेत पाणी भरण्यात येते. मिरजेत रेल्वे व कर्मचारी वसाहतीसाठी दररोज १० लाख लिटर पाण्याची आवश्यकता आहे. सुमारे ४५ लाख लिटर क्षमतेच्या रेल्वेच्या पाणी पुरवठा योजनेतून दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करता येणे शक्य असल्याने मिरजेतून लातूरला रेल्वे टँकरने पाणीपुरवठा करण्याबाबत प्रस्ताव आहे. यासाठी प्रशासनाकडून मिरजेतील रेल्वेच्या पाणी योजनेच्या अधिग्रहणाची शक्यता आहे. मिरजेतून लातूर ३४३ किलोमीटर एवढ्या अंतरावर असल्याने मिरजेतून लातूरला पाणी पोहोचविण्यासाठी सात तास लागणार आहेत. लातूरसह पाणीटंचाई असलेल्या अन्य ठिकाणी पाणी पुरवठ्यासाठी मिरजेतील रेल्वे पाणीपुरवठा योजनेचा वापर करण्यात येणार आहे. वारणा व कोयना धरणातून कृष्णा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत असल्याने उन्हाळ्यात दोन महिने पुरेल एवढा पाणी साठा मिरजेत आहे. म्हैसाळ योजनेव्दारे सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत असल्याने लगतच्या कवठेमहांकाळ व जत तालुक्यात पिण्याच्या व शेतीसाठी पाणी टंचाईची तीव्रता कमी झाली आहे. मिरजेतून दररोज दोन रेल्वे टँकरने लातूरला पाणीपुरवठा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाची तयारी आहे. वित्तीय तूट मर्यादेतच सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणातील पाणी करमाळा किंवा पंढरपूर रेल्वेस्थानकातून लातूरला नेण्यासाठी तांत्रिक अडचणी आहेत. यासाठी धरणापासून रेल्वेस्थानकापर्यंत जलवाहिनीची व्यवस्था करावी लागणार असल्याने पंढरपुरातून दोन तासांच्या अंतरावर असलेल्या मिरजेतून रेल्वेने तातडीने व शुद्ध पाणीपुरवठा सुरू करता येणे शक्य आहे. भाजप नेते मकरंद देशपांडे यांनी मिरजेतून लातूरला रेल्वेने पाणीपुरवठा करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.