शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

सांगली जिल्ह्यात दीड लाख लोकांना ६० टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:41 IST

सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून ७० गावांसह ४६६ ...

सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून ७० गावांसह ४६६ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४२ हजार लोकसंख्येला ६० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मार्चअखेर १६९ टँकर सुरु करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाराटंचाई भीषण असली तरी, छावण्या अथवा चारा डेपोची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी सवलती, सुविधांकडेही कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील बहुतांशी भागाकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणी टंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पाण्याअभावी हाता-तोंडाला आलेली पिकेही वाया जात आहेत. राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. पन्नासपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांत तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यांतील २४६ गावांचा समावेश आहे. अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. दुष्काळी स्थिती गंभीर होत असल्याने शासनाकडून याची दखल घेण्यात आली होती. दुष्काळसदृश आटपाडी तालुक्यात सर्वात कमी ३१ टक्के पाऊस झाला. जतमध्ये ५६.७५ टक्के, कवठेमहांकाळ ६५.८६, खानापूर ८०.१४, तासगाव ५४.७०, पलूस ९२.२६ आणि कडेगाव तालुक्यात १०६.२३ टक्के पावसाची सरासरी आहे. मिरज पूर्व भागाला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत.पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने टँकर सुरु करण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या ७० गावे, ४६६ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४२ हजार लोकसंख्येला ६० टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. जत तालुक्यातील ३० गावांना ३२ टँकरने, आटपाडीतील २२ गावांना १६ टँकरने, खानापूरच्या सहा गावांना पाच टँकरने, तासगावमधील तीन गावांना एका टँकरने, तर कवठेमहांकाळमधील नऊ गावांना सहा टँकरने पाणी दिले जात आहे.पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खासगी ८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मार्चअखेर १६९ टँकर सुरु करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम भागातून उसाचे वाडे मागवले जात आहे, परंतु ते जादा दराने खरेदी करुन जनावरांना जगविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कवडीमोल किमतीने जनावरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरु होणार का? याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.महावितरणकडून शेतकºयांची अडवणूकदुष्काळी गावातील शेती पंपांची वीज खंडित केली जाणार नाही; मात्र अनेक ठिकाणी रोहित्र दुरुस्तीसाठी बिल भरल्याशिवाय महावितरण तिकडे फिरकतच नसल्याचे चित्र आहे. शिवाय गेल्या सहा महिन्यांपासून नव्याने एकाही शेतकºयाचा विद्युत पुरवठा जोडण्यात आलेला नाही.