शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

सांगली जिल्ह्यात दीड लाख लोकांना ६० टँकरने पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2019 23:41 IST

सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून ७० गावांसह ४६६ ...

सांगली : जिल्ह्यात दिवसेंदिवस दुष्काळी परिस्थिती गंभीर बनत आहे. पिण्याच्या पाण्याची मोठ्या प्रमाणावर मागणी वाढत असून ७० गावांसह ४६६ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४२ हजार लोकसंख्येला ६० टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मार्चअखेर १६९ टँकर सुरु करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चाराटंचाई भीषण असली तरी, छावण्या अथवा चारा डेपोची शेतकऱ्यांना प्रतीक्षा आहे. राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळी सवलती, सुविधांकडेही कानाडोळा केला जात असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील बहुतांशी भागाकडे पावसाने पाठ फिरवल्याने दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. वाढत्या पाणी टंचाईने जिल्ह्यातील बहुतांश गावांवर दुष्काळाची छाया गडद झाली आहे. पाण्याअभावी हाता-तोंडाला आलेली पिकेही वाया जात आहेत. राज्य शासनाने जिल्ह्यातील पाच तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. पन्नासपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांत तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि आटपाडी तालुक्यांतील २४६ गावांचा समावेश आहे. अहवाल शासनाला पाठविण्यात आला होता. दुष्काळी स्थिती गंभीर होत असल्याने शासनाकडून याची दखल घेण्यात आली होती. दुष्काळसदृश आटपाडी तालुक्यात सर्वात कमी ३१ टक्के पाऊस झाला. जतमध्ये ५६.७५ टक्के, कवठेमहांकाळ ६५.८६, खानापूर ८०.१४, तासगाव ५४.७०, पलूस ९२.२६ आणि कडेगाव तालुक्यात १०६.२३ टक्के पावसाची सरासरी आहे. मिरज पूर्व भागाला दुष्काळाचे चटके सहन करावे लागत आहेत.पाण्याचा प्रश्न गंभीर बनत असल्याने टँकर सुरु करण्याच्या मागणीत वाढ होत आहे. सध्या ७० गावे, ४६६ वाड्या-वस्त्यांवरील एक लाख ४२ हजार लोकसंख्येला ६० टँकरने पाणीपुरवठा सुरु आहे. जत तालुक्यातील ३० गावांना ३२ टँकरने, आटपाडीतील २२ गावांना १६ टँकरने, खानापूरच्या सहा गावांना पाच टँकरने, तासगावमधील तीन गावांना एका टँकरने, तर कवठेमहांकाळमधील नऊ गावांना सहा टँकरने पाणी दिले जात आहे.पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी खासगी ८९ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. मार्चअखेर १६९ टँकर सुरु करावे लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाण्यासह जनावरांच्या चाºयाचा प्रश्न निर्माण झाला आहे. पश्चिम भागातून उसाचे वाडे मागवले जात आहे, परंतु ते जादा दराने खरेदी करुन जनावरांना जगविण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकºयांनी कवडीमोल किमतीने जनावरांची विक्री करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे चारा छावण्या सुरु होणार का? याकडे शेतकºयांचे लक्ष लागले आहे.महावितरणकडून शेतकºयांची अडवणूकदुष्काळी गावातील शेती पंपांची वीज खंडित केली जाणार नाही; मात्र अनेक ठिकाणी रोहित्र दुरुस्तीसाठी बिल भरल्याशिवाय महावितरण तिकडे फिरकतच नसल्याचे चित्र आहे. शिवाय गेल्या सहा महिन्यांपासून नव्याने एकाही शेतकºयाचा विद्युत पुरवठा जोडण्यात आलेला नाही.