शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
5
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
6
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
7
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
8
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
9
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
10
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
11
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
12
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
13
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
14
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
15
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
16
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
17
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
18
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
19
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
20
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
Daily Top 2Weekly Top 5

कर्नाटक सीमाभागात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:04 IST

मिरज : कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने सीमाभागातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, कोयना धरणातून पाणी सोडण्याची ...

मिरज : कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने सीमाभागातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडण्याच्या कर्नाटक जलसंपदा विभागाच्या मागणीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने, अथणी व कागवाड तालुक्यातील ग्रामस्थ हवालदिल आहेत.शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील बंधाºयापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडली आहे. येथे तीव्र पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक पाटबंधारे विभागाने महाराष्टÑ जलसंपदा विभागाकडे केली आहे. महाराष्टÑात दूधगंगा धरण बांधताना, कर्नाटकाला उन्हाळ्यात पाणी देण्याचा करार केला आहे. गतवर्षी कोयना व वारणा धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात आले होते. यावर्षीही सीमाभागात पाणीटंचाई आहे. तसेच कोयना धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. कर्नाटकच्या मागणीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकातून जत व अक्कलकोट तालुक्यात पाणी देण्यात येणार आहे. कर्नाटकात उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असल्याने, नदीच्या दोन्ही काठावरील कुडची, उगार, जुगुळ, शिरगुप्पी, ऐनापूर, कृष्णाकित्तूर यांसह अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठल्याने जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजनेसाठी कृष्णा नदीचे पाणी अडविण्यात आले असून, सांगली जिल्ह्यात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर सुरू असताना, कर्नाटक हद्दीत अथणी व कागवाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.लोकसभा निवडणूक प्रचारात भाजप व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी महाराष्टÑातून कोयना धरणातून पाणी मिळविण्याची घोषणा केली होती. सर्व राजकीय पक्षांनी पाण्याचे राजकारण न करता, महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी मिळविण्याचा प्रयत्न करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. महाराष्टÑातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने, पाणी टंचाईने त्रस्त सीमाभागातील ग्रामस्थ हवालदिल आहेत.टँकरसाठीही पाणी नाहीनदी पूर्णपणे कोरडी असल्याने अथणी व कागवाड तालुक्यात ७८ गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, ३२ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकर भरण्यासाठीही पाणीसाठा उपलब्ध नसल्याने प्रशासन चिंतेत आहे. उगार, ऐनापूर, कृष्णा-कित्तुर यासह अनेक गावांत टँकरने प्रदूषित पाण्याचाच पुरवठा करण्यात येत आहे.