शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

कर्नाटक सीमाभागात पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 00:04 IST

मिरज : कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने सीमाभागातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, कोयना धरणातून पाणी सोडण्याची ...

मिरज : कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडल्याने सीमाभागातील गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली असून, कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी जोर धरू लागली आहे. राजापूर बंधाऱ्यातून पाणी सोडण्याच्या कर्नाटक जलसंपदा विभागाच्या मागणीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने, अथणी व कागवाड तालुक्यातील ग्रामस्थ हवालदिल आहेत.शिरोळ तालुक्यातील राजापूर येथील बंधाºयापुढे कर्नाटक हद्दीत कृष्णा नदी कोरडी पडली आहे. येथे तीव्र पाणीटंचाईमुळे कोयना धरणातून पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक पाटबंधारे विभागाने महाराष्टÑ जलसंपदा विभागाकडे केली आहे. महाराष्टÑात दूधगंगा धरण बांधताना, कर्नाटकाला उन्हाळ्यात पाणी देण्याचा करार केला आहे. गतवर्षी कोयना व वारणा धरणातून कर्नाटकाला पाणी सोडण्यात आले होते. यावर्षीही सीमाभागात पाणीटंचाई आहे. तसेच कोयना धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने कोयनेतून पाणी सोडण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. कर्नाटकच्या मागणीबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या पाण्याच्या बदल्यात कर्नाटकातून जत व अक्कलकोट तालुक्यात पाणी देण्यात येणार आहे. कर्नाटकात उगार व कुडची येथे नदीपात्रात पाण्याचा खडखडाट असल्याने, नदीच्या दोन्ही काठावरील कुडची, उगार, जुगुळ, शिरगुप्पी, ऐनापूर, कृष्णाकित्तूर यांसह अनेक गावांत पाणीटंचाई निर्माण झाली आहे. कृष्णा नदीवरील हिप्परगी धरणातील पाण्याने तळ गाठल्याने जमखंडी व बागलकोट परिसरात पाणीटंचाई आहे. उन्हाची तीव्रता वाढत असल्याने विहिरी व कूपनलिकांची पाणी पातळी खालावली आहे. म्हैसाळ, ताकारी व टेंभू योजनेसाठी कृष्णा नदीचे पाणी अडविण्यात आले असून, सांगली जिल्ह्यात सिंचनासाठी मोठ्या प्रमाणात पाण्याचा वापर सुरू असताना, कर्नाटक हद्दीत अथणी व कागवाड तालुक्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे.लोकसभा निवडणूक प्रचारात भाजप व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी महाराष्टÑातून कोयना धरणातून पाणी मिळविण्याची घोषणा केली होती. सर्व राजकीय पक्षांनी पाण्याचे राजकारण न करता, महाराष्ट्र शासनाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पाणी मिळविण्याचा प्रयत्न करावा, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. महाराष्टÑातून पाणी सोडण्याच्या मागणीबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याने, पाणी टंचाईने त्रस्त सीमाभागातील ग्रामस्थ हवालदिल आहेत.टँकरसाठीही पाणी नाहीनदी पूर्णपणे कोरडी असल्याने अथणी व कागवाड तालुक्यात ७८ गावांत पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई असून, ३२ गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. टँकर भरण्यासाठीही पाणीसाठा उपलब्ध नसल्याने प्रशासन चिंतेत आहे. उगार, ऐनापूर, कृष्णा-कित्तुर यासह अनेक गावांत टँकरने प्रदूषित पाण्याचाच पुरवठा करण्यात येत आहे.