शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार का? कच्च्या तेलाच्या दरात मोठी घसरण
3
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
4
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
5
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
6
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
7
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
8
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
9
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
10
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
11
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
12
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
13
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
14
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
15
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
16
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
17
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
18
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
19
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
20
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत

शिराळ्यातील १७ गावांत पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : तालुक्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील १७ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : तालुक्यात पाणीटंचाईचे संकट उभे राहिले आहे. तालुक्यातील १७ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, तालुक्यातील सात गावांतून टॅंकरची मागणी करण्यात आली आहे. आठ गावांतील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

शिवणी व रेठरे धरणातील पाणीसाठा संपला आहे. तालुक्यातील काळोखेवाडी, जाळकेवाडी, खराळे, वाकाईवाडी, बेरडेवाडी, येसलेवाडी, करूंगली या गावांतून टॅंकरची मागणी करण्यात आली आहे. आठ गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने रांजणवाडी, बेगडेवाडी, शिंदवाडी, खेड, बेलदारवाडी, रेड, शिरसटवाडी, कांबळेवाडी या गावांतील विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.

मादळगाव, यादवमळा करमाळे, येळापूर, काळोखेवाडी, कुंभाडेवाडी या गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने तात्पुरती नळ पाणीपुरवठा योजना करण्यात येणार आहे. मोरणा धरणात वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आल्याने शेतऱ्यांना दिलासा मिळाला आहे. रेठरे धरणातील उपयुक्त पाणीसाठा संपला असून, शिवणी धरणात १० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे, तर कार्वे धरणात १८ टक्के पाणीसाठा आहे.

वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी आमदार मानसिंगराव नाईक, कार्यकारी अभियंता वारणा कालवे विभाग इस्लामपूर डी. डी. शिंदे, कार्यकारी अभियंता सांगली पाटबंधारे ज्योती देवकर, उपविभागीय अभियंता लालासाहेब मोरे, शाखा अधिकारी सी. बी. यादव, शाखा अभियंता एस. डी. देसाई, एस. के. पाटील यांनी नियोजन करून सुरुवातीला अंत्री तलावात पाणी सोडण्यात आले होते. आणखी पाणी घेण्याची गरज आहे. तरच वाकुर्डे बुद्रुक उपसा जलसिंचन योजनेचे पाणी मोरणा धरणातून मांगले गावापर्यंत जाणार आहे.

चाैकट

२२ पाझर तलाव कोरडे

तालुक्यातील २२ पाझर तलाव कोरडे पडले आहेत. आठ पाझर तलावांतील पाणीसाठा २० टक्के राहिला आहे. विहिरीतील पाणीसाठा कडक ऊन पडत असल्यामुळे झपाट्याने कमी होत आहे. तालुक्यात ५३० कूपनलिका असून, त्यातील ४३ बंद आहेत.