शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
5
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
6
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
7
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
8
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
9
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
10
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
11
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
12
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
13
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
14
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
15
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
16
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
17
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
18
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
19
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
20
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात

पाणी योजनांवरून हल्लाबोल

By admin | Updated: December 15, 2015 23:24 IST

तासगाव पंचायत समिती सभा : शासनाच्या विभागांकडून हलगर्जीपणा

तासगाव : तासगाव तालुक्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतीच्या पाणी योजनांसाठी दुप्पट वीजबिल वसूल केले जात आहे. प्रादेशिकच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाकडून आणि शासनाकडून हालगर्जीपणा केला जात आहे, अशा शब्दात टंचाई आणि पाणी योजनांवरून पंचायत समितीच्या सदस्यांनी मासिक सभेत हल्लाबोल केला. राज्य शासनाच्या अनेक विभागाकडील अधिकाऱ्यांकडून सदस्यांच्या मागण्यांबाबत हालगर्जीपणा केला जात असल्याचा आरोपही यावेळी संतप्त सदस्यांनी केला.सभापती सुनीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा झाली. गटविकास अधिकारी सतीश गाढवे, उपसभापती अशोक घाईल यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विसापूर, पुणदी योजनांतून पाणी मिळत नाही. पाणी पाहिजे असल्यास दुप्पट वीजबिलाची वसुली केली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. पुणदी उपसा योजनेत सावळजचा समावेश नसल्याबाबत अधिकाऱ्यांकडून दिशाभूल केली जात आहे. सावळजच्या ग्रामस्थांनी पैसे भरले म्हणून पाणी दिले असेल तर, योजनेत नसलेल्या सर्वच गावांना असे पाणी देणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करून सावळजला पुणदी योजनेचे पाणी मिळायलाच हवे, अशी मागणी व्यक्त केली. पुणदी योजनेचे पाणी घेण्यासाठी पुणदीसह ताकारी योजनेचे दुहेरी वीजबिल शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.सदस्य विश्वास पाटील, प्रभाकर पाटील, शिवाजी पाटील यांनीही पाणी प्रश्नाबाबत शासन गाफील असल्याचा आरोप केला. तालुक्यातील पाणी योजना बंदअवस्थेत असल्यामुळे द्राक्षबागांसाठी टँकर सुरू करावे लागत आहेत. प्रादेशिक योजनांतील १४ गावांनी शंभर टक्के पाणीपट्टी भरली आहे. तरीही अन्य गावांच्या वसुलीअभावी मणेराजुरी, विसापूर योजना बंद झाली आहे. टंचाई निधीतून शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. शासनाकडील सार्वजनिक बांधकाम, महावितरणसह अन्य विभागांकडून नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या जात नाहीत. सदस्यांनी मागणी केलेली कामे तीन वर्षांपासून मार्गी लागलेली नाहीत. काही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामात हालगर्जीपणा केला जात आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उपसभापती अशोक घाईल, सदस्य शिवाजी पाटील यांनी केली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तासगाव ते वासुंबे रस्ता आणि तासगाव ते आरवडे रस्ता असल्याचा आरोप सदस्य जयवंत माळी यांनी केला. (वार्ताहर)सभेतील प्रमुख निर्णय, ठराव तासगाव तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर कराअनधिकृत नळ कनेक्शनधारकांसाठी ७० अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीमअनधिकृत नळकनेक्शनधारक आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा निर्णय.पाणी योजनांची पाणीपट्टी माफ करा