शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

पाणी योजनांवरून हल्लाबोल

By admin | Updated: December 15, 2015 23:24 IST

तासगाव पंचायत समिती सभा : शासनाच्या विभागांकडून हलगर्जीपणा

तासगाव : तासगाव तालुक्यात शेतीच्या आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. शेतीच्या पाणी योजनांसाठी दुप्पट वीजबिल वसूल केले जात आहे. प्रादेशिकच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रशासनाकडून आणि शासनाकडून हालगर्जीपणा केला जात आहे, अशा शब्दात टंचाई आणि पाणी योजनांवरून पंचायत समितीच्या सदस्यांनी मासिक सभेत हल्लाबोल केला. राज्य शासनाच्या अनेक विभागाकडील अधिकाऱ्यांकडून सदस्यांच्या मागण्यांबाबत हालगर्जीपणा केला जात असल्याचा आरोपही यावेळी संतप्त सदस्यांनी केला.सभापती सुनीता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीची सभा झाली. गटविकास अधिकारी सतीश गाढवे, उपसभापती अशोक घाईल यांच्यासह सर्व खातेप्रमुख उपस्थित होते. तालुक्यात शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. विसापूर, पुणदी योजनांतून पाणी मिळत नाही. पाणी पाहिजे असल्यास दुप्पट वीजबिलाची वसुली केली जात असल्याचा आरोप सदस्यांनी केला. पुणदी उपसा योजनेत सावळजचा समावेश नसल्याबाबत अधिकाऱ्यांकडून दिशाभूल केली जात आहे. सावळजच्या ग्रामस्थांनी पैसे भरले म्हणून पाणी दिले असेल तर, योजनेत नसलेल्या सर्वच गावांना असे पाणी देणार आहात का? असा प्रश्न उपस्थित करून सावळजला पुणदी योजनेचे पाणी मिळायलाच हवे, अशी मागणी व्यक्त केली. पुणदी योजनेचे पाणी घेण्यासाठी पुणदीसह ताकारी योजनेचे दुहेरी वीजबिल शेतकऱ्यांच्या माथी मारले जात असल्याची टीकाही चंद्रकांत पाटील यांनी केली.सदस्य विश्वास पाटील, प्रभाकर पाटील, शिवाजी पाटील यांनीही पाणी प्रश्नाबाबत शासन गाफील असल्याचा आरोप केला. तालुक्यातील पाणी योजना बंदअवस्थेत असल्यामुळे द्राक्षबागांसाठी टँकर सुरू करावे लागत आहेत. प्रादेशिक योजनांतील १४ गावांनी शंभर टक्के पाणीपट्टी भरली आहे. तरीही अन्य गावांच्या वसुलीअभावी मणेराजुरी, विसापूर योजना बंद झाली आहे. टंचाई निधीतून शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही सदस्यांनी यावेळी व्यक्त केली. शासनाकडील सार्वजनिक बांधकाम, महावितरणसह अन्य विभागांकडून नागरिकांच्या समस्या मार्गी लावल्या जात नाहीत. सदस्यांनी मागणी केलेली कामे तीन वर्षांपासून मार्गी लागलेली नाहीत. काही विभागाच्या अधिकाऱ्यांकडून कामात हालगर्जीपणा केला जात आहे. अशा अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी उपसभापती अशोक घाईल, सदस्य शिवाजी पाटील यांनी केली. तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून तासगाव ते वासुंबे रस्ता आणि तासगाव ते आरवडे रस्ता असल्याचा आरोप सदस्य जयवंत माळी यांनी केला. (वार्ताहर)सभेतील प्रमुख निर्णय, ठराव तासगाव तालुका तात्काळ दुष्काळ जाहीर कराअनधिकृत नळ कनेक्शनधारकांसाठी ७० अधिकारी, कर्मचाऱ्यांची टीमअनधिकृत नळकनेक्शनधारक आढळल्यास संबंधितांवर कारवाईचा निर्णय.पाणी योजनांची पाणीपट्टी माफ करा