शहरं
Join us  
Trending Stories
1
Gambhira Bridge Collapse : भयानक Video! गुजरातमध्ये गंभीरा पूल कोसळला, अनेक वाहने पाण्यात पडली; तिघांचा मृत्यू, शोध सुरु 
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये भारतानं पाकिस्तानला मूर्ख बनवलं अन् त्यांना कळलंही नाही! 'त्या'वेळी नेमकं काय झालेलं?
3
"फडणवीसजी, तुमच्या राज्यात गरीब आणि दुर्बलांचे असे हाल आहेत", संजय राऊतांनी व्हिडीओ दाखवला
4
जगातील सर्वात श्रीमंत देश बनू शकतो पाकिस्तान? 'या' नैसर्गिक खजिन्यापुढे चीन-अमेरिकाही काहीच नाही
5
Video: प्रसिद्ध गायकाविरोधात पोलिसांची कारवाई, बांद्रा वरळी सी-लिंकवर केला जीवघेणा स्टंट
6
भयंकर! ३२ वर्षीय प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; दोन आठवड्यानंतर घरात आढळला मृतदेह, चाहत्यांना धक्का
7
Trump Tariff: धमक्यांवर धमक्या, ट्रम्प यांची आता औषध कंपन्यांना धमकी; "अमेरिकेतच औषधं बनवा, अन्यथा..."
8
'चीन, पाकिस्तान आणि बांगलादेशची एकी भारतासाठी धोकादायक', CDS प्रमुख चौहान यांचं मुद्द्यावर बोट
9
मेट्रो प्रकल्पाला गती देण्यासाठी २५० परप्रांतीय मजूर मुंबईत दाखल; काहींना विमानाने मुंबईत आणले
10
ही तर सोनमपेक्षा एक पाऊल पुढे! बॉयफ्रेंडसाठी पतीला विष दिलं अन् कुणालाही कळण्याआधी केला खेळ खल्लास!
11
Stock Market Today: ७६ अंकांनी घसरून उघडला सेन्सेक्स; ३ सेक्टर्समध्ये तेजी, का अस्थिर आहे मार्केट?
12
भारत बंद होण्याआधीच इंडिया आघाडीचा चक्का जाम; बिहारमध्ये निवडणूक आयोगाविरोधात रस्ते बंद, रेल्वे रोखल्या
13
Pension Scheme: वृद्धापकाळात दरमहा ₹२०,५०० चं पेन्शन देईल ही स्कीम; पाहा याचे जबरदस्त ५ फायदे
14
Alia Bhatt : अभिनेत्री आलिया भटच्या माजी पर्सनल असिस्टंटला अटक; ७६ लाखांच्या फसवणुकीचा गंभीर आरोप
15
"मृणालची इमेज खराब होणार नाही अशी आशा", अजय देवगणसोबतचा डान्स पाहून केलं ट्रोल
16
लेकीला वाचवण्यासाठी आईने घरही विकलं, तरीही...; कोण आहे निमिषा प्रिया? येमेनमध्ये होणार फाशीची शिक्षा
17
लग्नाच्या पहिल्या रात्रीच पती नपुंसक असल्याचे समजले, तिने मोठ्या जावेला सांगितले, मग दीर आला...
18
Sanjay Gaikwad : आमदार संजय गायकवाडांचा राडा, आमदार निवास कँटिनमधील कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण
19
स्मृती ईराणींचा राजकारणातून अभिनयाकडे युटर्न, १७ वर्षांनंतरच्या कमबॅकवर म्हणाल्या- 'पार्ट टाइम अ‍ॅक्ट्रेस'
20
लग्नाच्या ३ वर्षांतच पायल रोहतगीचा होणार घटस्फोट? ७ वर्ष लहान कुस्तीपटूशी थाटलेला संसार

सिद्धनाथ तलावातील पाणी रब्बी पिकांना

By admin | Updated: December 26, 2014 00:20 IST

पिकांना जीवदान : तीन वर्षांनंतर कालव्यातून पाणी; शेतकऱ्यांत समाधान--लोकमतचा प्रभाव

दरीबडची : सिद्धनाथ (ता. जत) येथील लघु पाटबंधारे तलावातील पाणी कालव्यातून तीन वर्षांनंतर प्रथमच रब्बी हंगामातील पिकासाठी सोडण्यात येणार आहे. यावर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने तलाव पूर्ण क्षमतेने भरला होता. पाणी कालव्यात सोडण्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मधून प्रसिद्ध करण्यात आले होते. दरीबडची, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द या तीनही गावातील १२७८ हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे. पाणी सोडल्यामुळे रब्बी हंगामातील पिकांना जीवदान मिळणार आहे. पाण्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे.पूर्व भागातील सिद्धनाथ येथील लघुपाटबंधारे तलाव १९७२ मध्ये बांधण्यात आला. तलावाची साठवण क्षमता १०२.७३ द.ल.घ.फू. इतकी आहे. तलावापासून ८ किलोमीटर लांबीचा कालवा खोदण्यात आला आहे. तलावापासून ३ कि.मी. कालव्याचे अस्तरीकरण झाले आहे. यावर्षी मान्सून पावसाने दमदार हजेरी लावल्याने तीन वर्षानंतर प्रथमच तलाव सप्टेंबर महिन्यामध्ये पूर्ण क्षमतेने भरला आहे.कालव्याच्या पाण्याने दरीबडची येथील ३८६ हेक्टर, सिद्धनाथ येथील ५५० हेक्टर, जालिहाळ खुर्द येथील ३४२ हेक्टर क्षेत्र तलावामुळे ओलिताखाली येते. पाणी व्यवस्थापन विठ्ठल पाणी वापर संस्थेच्या माध्यमातून केले जाते. रब्बी हंगामातील पिकांची पेरणी वेळेवर झाली आहे. पुरेशी ओल, अनुकूल हवामान यामुळे पिकांची उगवण चांगली झाली आहे. ज्वारी, मका, गहू ही पिके जोमात आली आहेत. सध्या विजेचा पुरवठा अनियमित आहे. तसेच विहीर, कूपनलिकेतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. रब्बी हंगामातील पिकांना पाण्याची गरज आहे. तलावातील पाणी सोडल्यास पिकांना फायदा होणार आहे.याबाबत ‘सिद्धनाथ तलावाचे पाणी कालव्यात सोडा’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’मधून वृत्त प्रसिद्ध होताच शेतकऱ्यांची ही मागणी व ‘लोकमत’च्या वृत्ताची दखल घेत कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. सिद्धनाथ, दरीबडची गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या विंधन विहिरी आहेत. पिण्याचे पाणी आरक्षित ठेवून पाणी सोडले जाणार आहे. ‘लोकमत’च्या वृत्तामुळे कालव्यात पाणी सोडण्यात आले आहे. त्याबाबत शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. (वार्ताहर)फळबागांना फायदादरीबडची, सिद्धनाथ, जालिहाळ खुर्द या तीन गावांमध्ये द्राक्षे, डाळिंब फळबागेचे क्षेत्र अधिक आहे. कालव्यातील पाण्याचा फायदा बागांना होणार आहे. सध्या डाळिंब बागा बहरत आहेत, तर द्राक्षबागा लिंबोळीच्या आकारातील आहेत. कालव्यातील पाण्याने विहीर, कूपनलिकांना पाणी वाढणार आहे. भूमिगत पाण्याची पातळी वाढणार आहे.