शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

पाण्याची शुद्धता वाऱ्यावरच

By admin | Updated: July 26, 2014 00:31 IST

गढूळ, मातीमिश्रित पाणीपुरवठा : आवश्यक तपासणी नाही

सांगली : सांगली-मिरज-कुपवाड शहरातील पाच लाख लोकसंख्येला पुरवठा होणाऱ्या पिण्याच्या पाण्याची शुद्धता कोणत्याही कसोटीवर खरी उतरण्याची शक्यता नाही. महापालिकेकडून दररोज पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत जातात. काही मोजक्याच चाचण्या करून अहवाल दिला जाते, पण या चाचणीत पाणी दूषित निघतच नाही. उलट नागरिकांना मात्र कधी मातीमिश्रित, तर कधी दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे पाण्याच्या शुद्धतेविषयी नागरिकही साशंक आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सांगली व कुपवाड शहराला मातीमिश्रित पाण्याचा पुरवठा झाला. नळाला लालभडक पाणी आल्याने महापालिकेच्या शुद्धीकरण यंत्रणेचे पितळ उघडे पडले. त्यात नगरसेवकांनी जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करून प्रशासनाच्या कारभाराचे वाभाडे काढले. माळबंगला येथील जलशुद्धीकरण केंद्रातील तीनपैकी दोन बेड बंद होते. एका बेडवरून पाणी शुद्ध करून पुरवठा होत होता. हा प्रकार गेले कित्येक दिवस सुरू आहे. माळबंगला येथील शुद्धीकरण केंद्राच्या दुरुस्तीचे काम सुरू असल्याने एक क्लॅरिफायर व एक फिल्टर बेड बंद आहे. त्याचे काम प्रगतीपथावर असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. वास्तविक दुरुस्तीचे काम गेल्या काही महिन्यांपासून हाती घेण्यात आले आहे. म्हणजेच काम सुरू झाल्यापासून सांगलीकरांना अशुद्ध पाण्याचा पुरवठा झाला, असेच म्हणावे लागेल. तरीही पाण्याचे नमुने कधीच दूषित आढळले नाहीत. जून महिन्यात केलेल्या चाचणीत एकदाही दूषित पाणी आढळले नसल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मातीमिश्रित गढूळ पाणी नागरिकांच्या गळी उतरवूनही, प्रशासन मात्र हे पाणी पिण्यालायक असल्याचे सांगत आहे. वास्तविक महापालिकेकडून दररोज वेगवेगळ्या भागातील पाण्याचे नमुने शासकीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले जातात. सांगलीत १० ते ११ जागी, तर मिरजेत पाच ठिकाणचे नमुने घेतले जातात. पंधरा ते सोळा नमुन्यांपैकी सात ते आठ नमुनेच प्रयोगशाळेकडे जातात. महिन्याची सरासरी पाहिल्यास, दरमहा पाण्याचे २५० नमुने प्रयोगशाळेकडे जात आहेत. महापालिकेकडे पाणी तपासणीची कसलीही यंत्रणा नसल्यामुळे नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे जिल्हा शासकीय प्रयोगशाळेतच पाण्याच्या नमुन्यांची तपासणी होते. प्रयोगशाळेत शुद्ध पाण्यासाठी प्रमाणकानुसार ६५ तपासण्या करण्याची गरज आहे. वस्तुत: केवळ वीसच तपासण्या केल्या जातात. त्यामुळे शहरात होणारा पाणीपुरवठा शुद्ध होतो का, असा प्रश्न समोर उभा आहे. (प्रतिनिधी)