शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

भाजपकडून पाण्याचे राजकारण

By admin | Updated: January 24, 2017 00:53 IST

जयंत पाटील : २१ फेब्रुवारीनंतर पाणी योजना बंद होणार

सांगली : शेतकरी पाण्यासाठी आक्रोश करीत होते, तेव्हा राज्य सरकारला पाणी योजना सुरू करण्याची इच्छा झाली नाही. निवडणुका जाहीर होताच त्यांनी योजना सुरू केल्या. २१ फेब्रुवारीनंतर त्या बंदही होतील. भाजप पाण्याचा उपयोग केवळ मतांसाठीच करीत आहे, अशी टीका राष्ट्रवादी नेते आ. जयंत पाटील यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली. ते म्हणाले की, पाणी योजना सुरू करण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून शेतकरी आक्रोश करीत होते. त्यावेळी थकीत बिलाचे कारण सांगून योजना सुरू होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले होते. त्यावेळी सरकारला लोकांची कणव आली नाही. आता निवडणुकांमुळे मतांवर डोळा ठेवून योजना सुरू केल्या आहेत. लोक या सर्व गोष्टी जाणून आहेत. निवडणुका संपल्यावर पुन्हा योजनांचे पाणी बंद होणार असल्याने लोक भाजपच्या या खेळीला भुलणार नाहीत. निवडणुकांच्या तोंडावर अर्थसंकल्प जाहीर केला जाऊ नये, असे वाटत असले तरी, आता याबाबत न्यायालयाचा निर्णय झालेला आहे. न्यायालयीन निर्णयाचा आम्ही आदर करतो. अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मोठमोठ्या घोषणा केल्या जाणार, याची कल्पना आम्हाला आहे. आजवर भाजपने याच गोष्टींचे भांडवल केले आहे. घोषणांची अंमलबजावणी होत नसल्याची बाब आता लोकांच्याही लक्षात आलेली आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकांबद्दल ते म्हणाले की, तालुकास्तरावरील पदाधिकारी व नेत्यांना आम्ही काहीप्रमाणात निर्णय घेण्याचे व चर्चा करण्याचे अधिकार दिलेले आहेत. आघाडी करायची की नाही, कोणाबरोबर करायची, याबाबतचे निर्णय तालुकास्तरावरच घेतले जातील. जिल्हास्तरावर अंतिम चर्चा होणार असली तरी, तालुक्यातील नेत्यांचा निर्णय महत्त्वाचा असेल. राष्ट्रवादीतील लोक भाजपमध्ये येत असल्याबद्दलचा गाजावाजा काही नेतेमंडळी करीत आहेत. त्यात कोणतेही तथ्य नाही. राष्ट्रवादीच्या मुलाखतींच्या कार्यक्रमाला झालेली गर्दीच सर्व काही स्पष्ट करीत आहे. जातीयवादी पक्षांना रोखण्यासाठी कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी व्हावी, अशी माझी इच्छा होती. अजूनही काही ठिकाणी चर्चा सुरू आहे. (प्रतिनिधी)