शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Lok Sabha Election पाण्याचे राजकारण करणाऱ्यांना माफी मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2019 23:28 IST

जत : भाजपमध्ये आला तरच पाणी देतो, असे म्हणून राजकारणासाठी पाणी अडविण्याचे पाप ज्यांनी केले, त्यांना जनता माफ करणार ...

जत : भाजपमध्ये आला तरच पाणी देतो, असे म्हणून राजकारणासाठी पाणी अडविण्याचे पाप ज्यांनी केले, त्यांना जनता माफ करणार नाही. त्यामुळे स्वाभिमानीचा विजय निश्चित आहे, असा विश्वास स्वाभिमानीचे उमेदवार विशाल पाटील यांनी व्यक्त केला.लोकसभा निवडणूक प्रचारासाठी डफळापूर (ता. जत) येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. जत तालुक्यातील दुसऱ्या दिवशीच्या दौºयाचा प्रारंभ धावडवाडी येथून झाला. हिवरे, अंकले, बाज, बेळुंखी, डफळापूर, कुडणूर, शिंगणापूर, मिरवाड, जिरग्याळ, एकुंडी, वज्रवाड, गुगवाड, बसर्गी, सिंदूर, उमराणी, खोजानवाडी, बिळूर, येळदरी या गावांचा दौरा होता.यावेळी सुरेश शिंदे, विक्रम सावंत, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष अविनाश पाटील, शेतकरी संघटनेचे प्रदीप पाटील, आप्पाराया बिराजदार, चंदूलाल शेख, महादेव पाटील, जी. के. माळी, शंकरराव गायकवाड, बी. आर. पाटील, भारत गायकवाड, हुसेन आत्तार, अजित भोसले, अब्दुल मकानदार, पोपट शिंदे, भानुदास गडदे, मनोहर भोसले, अजितराव गायकवाड, दिलावर शेख प्रचार दौºयात सहभागी झाले होते.विशाल पाटील म्हणाले, प्रतीक पाटील यांनी डफळापूरच्या बोकडतोंडी तलावात पाणी आणले होते. वसंतदादांनी म्हैसाळ प्रकल्प उभा केला. ते असते तर वीस वर्षांपूर्वीच जतला पाणी मिळाले असते.ते म्हणाले, सत्तेसाठी कुठल्याही स्तराला जायला भाजपवाले मागे- पुढे बघत नाहीत. लोकांमध्ये भांडणे लावायची, फूट पाडायची, हे त्यांचे राजकारण आहे. धनगर आरक्षण, मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण असे अनेक विषय अर्धवट राहिले आहेत. वर्षाला दोन कोटी नोकºया देतो, असे सांगणाऱ्यांनी गेल्या पाच वर्षांत एकही नोकरी दिलेली नाही. न्याय योजनेतून गरीब कुटुंबाला वर्षाला ७२ हजार रुपये देण्याची घोषणा काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. हे पैसे थेट नागरिकांच्या खात्यात जमा होणार आहेत.त्यांनी आणले किती?प्रतीक पाटील यांनी एक हजार कोटींचा निधी आणला; पण ते कधीही कुठल्याही उद्घाटनास गेले नाहीत. पण यांनी मात्र फक्त ७४ कोटी आणले आणि ७४ कोटी नारळ फोडले. जर भाजपमध्ये येणार असाल, तरच पाणी सोडतो, असे सांगत जत तालुक्यात संजय पाटील यांनी आजवर केवळ पाण्याचे राजकारणच केले. जत तालुक्यास पाणी मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक